शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वर्षभरात ५० वाघांचा मृत्यू

By admin | Updated: November 4, 2014 22:32 IST

वाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह

महाराष्ट्रातील चार वाघांचा समावेश : नऊ घटनांत कातडी जप्तसुरेश सवळे - चांदूरबाजारवाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह इतर अवयव जप्त करण्यात आले. त्यातील तीन घटना महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडे वारीनुसार २०१४ मध्ये आॅक्टोबर अखेरपर्यंत ५० वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. सर्वाधिक १२ वाघांचा मृत्यू मध्यप्रदेशात झाला आहे. त्या खालोखाल तामिळनाडूत ९, उत्तराखंडमध्ये ६, आसाममध्ये ५, महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये प्रत्येकी ४ वाघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वर्षभरात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर रेंजमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. हे प्रकरण तपासात आहे.२४ जून आणि १९ जुलै रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी उमरेड-करांडला अभयारण्यात एका वाघाचे अस्तित्व संपुष्टात आले. कर्नाटकमधील सर्वाधिक १५ आणि महाराष्ट्रातील १० वाघांची संख्या घटली. वाघांची शिकार आणि कातडीसह अवयवांची तस्करी ही गंभीर समस्या बनली आहे. यावर्षी राज्यात आतापर्यंत तीन ठिकाणांहून वाघांची कातडी जप्त करण्यात आली. १३ आणि १७ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातून, २७ जुलैला भंडारा जिल्ह्यातून ही कातडी जप्त करण्यात आली. वाघांची शिकार करुन कातडी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे. स्थानिकांना वाघाच्या कातडीची किंमत दहा-वीस हजार रुपये मिळालग तरीही पुरेशी असते. पण आंरराष्ट्रीय बाजारपेठेत याच कातडीची मोठी रक्कम मिळू शकते. त्यामुळेच बडे तस्कर या व्यवसायात गुंतले आहेत. चीन हा वाघांच्या अवयवांचा प्रमुख खरेदीदार देश आहे. कातडी ही वैभवाचे चिन्ह म्हणून तर इतर अवयव हे औषधी गुणधर्मासाठी खरेदी केले जातात, असे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले. कायद्याचे उल्लंघन करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांना भरपूर मागणी आणि प्रचंड पैसा मिळत असल्याने वन्य प्राण्यांची सर्रास शिकार होत आहे. वन विभागाच्यावतीने शिकारीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या ५० वाघांचा आतापर्यंत मृत्यू झाला त्यापैकी ४ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अहवालात म्हटले आहे.