शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ५० वाघांचा मृत्यू

By admin | Updated: November 4, 2014 22:32 IST

वाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह

महाराष्ट्रातील चार वाघांचा समावेश : नऊ घटनांत कातडी जप्तसुरेश सवळे - चांदूरबाजारवाघांची शिकार आणि अवयवांच्या तस्करीच्या वाढत्या घटनांनी देशातील व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. देशात वर्षभरात ५० वाघांचा बळी गेला आहे. ९ घटनांमध्ये वाघांच्या कातडीसह इतर अवयव जप्त करण्यात आले. त्यातील तीन घटना महाराष्ट्रातील आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) आकडे वारीनुसार २०१४ मध्ये आॅक्टोबर अखेरपर्यंत ५० वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. सर्वाधिक १२ वाघांचा मृत्यू मध्यप्रदेशात झाला आहे. त्या खालोखाल तामिळनाडूत ९, उत्तराखंडमध्ये ६, आसाममध्ये ५, महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये प्रत्येकी ४ वाघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात वर्षभरात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर रेंजमध्ये एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. हे प्रकरण तपासात आहे.२४ जून आणि १९ जुलै रोजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी उमरेड-करांडला अभयारण्यात एका वाघाचे अस्तित्व संपुष्टात आले. कर्नाटकमधील सर्वाधिक १५ आणि महाराष्ट्रातील १० वाघांची संख्या घटली. वाघांची शिकार आणि कातडीसह अवयवांची तस्करी ही गंभीर समस्या बनली आहे. यावर्षी राज्यात आतापर्यंत तीन ठिकाणांहून वाघांची कातडी जप्त करण्यात आली. १३ आणि १७ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातून, २७ जुलैला भंडारा जिल्ह्यातून ही कातडी जप्त करण्यात आली. वाघांची शिकार करुन कातडी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याचा व्यवसाय चांगलाच बहरला आहे. स्थानिकांना वाघाच्या कातडीची किंमत दहा-वीस हजार रुपये मिळालग तरीही पुरेशी असते. पण आंरराष्ट्रीय बाजारपेठेत याच कातडीची मोठी रक्कम मिळू शकते. त्यामुळेच बडे तस्कर या व्यवसायात गुंतले आहेत. चीन हा वाघांच्या अवयवांचा प्रमुख खरेदीदार देश आहे. कातडी ही वैभवाचे चिन्ह म्हणून तर इतर अवयव हे औषधी गुणधर्मासाठी खरेदी केले जातात, असे एका वरिष्ठ वनाधिकाऱ्याने सांगितले. कायद्याचे उल्लंघन करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाघ आणि इतर वन्यप्राण्यांच्या अवयवांना भरपूर मागणी आणि प्रचंड पैसा मिळत असल्याने वन्य प्राण्यांची सर्रास शिकार होत आहे. वन विभागाच्यावतीने शिकारीच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ज्या ५० वाघांचा आतापर्यंत मृत्यू झाला त्यापैकी ४ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे व्याघ्र संवर्धन प्राधिकरण अहवालात म्हटले आहे.