शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

फळ पिकांच्या विमा रकमेत ५० टक्के कपात

By admin | Updated: November 1, 2014 01:26 IST

बदलत चाललेल्या तापमानामुळे आणि वेगाच्या वाऱ्यामुळे होणारे फळपिकांचे नुकसान व सबंधित शेतकऱ्यांना बसणारा आर्थीक फटका...

अमरावती : बदलत चाललेल्या तापमानामुळे आणि वेगाच्या वाऱ्यामुळे होणारे फळपिकांचे नुकसान व सबंधित शेतकऱ्यांना बसणारा आर्थीक फटका लक्षात घेवून कृषी विभागाने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा यंदाही सुरु ठेवणयाचा निर्णय घेतला. मात्र यावेळी विविध फळ पिकांसाठी पूर्वी ठरविण्यात आलेल्या विमा संरक्षण रकमेत तब्बल ५० टक्यापर्यंत कात्री लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे विमा कंपन्यांच्या दबावापुढे कृषी विभागाने विशेष: विदर्भ व इतर काही ठिकाणच्या सुमारे १२ जिल्ह्याना उद्दिष्ट दिले आहे.संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरु, द्राक्ष, केळी, आंबा आणि काजू फळपिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी हवामानावर आधारित फळपीक योजनेचा पहिला टप्पा राज्यभरात राबविण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. यंदा दुसऱ्या टप्यातही फळपीक विमा योजना सुरु ठेवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. त्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर २०१४ रोजी शासन निर्णयानुसार ही बाब लक्षात घेता शासनाने दिलेल्या सूचनेनुसार कृषी विभागाने संत्रा, मोसंबी (आंबिया बहर) द्राक्ष, पेरु, केळी, आंबा, डाळींब ,काजू फळांचा हवामानावर आधारित योजनेत समावेश होईल. कृषी विभागाची पक्षपाती भूमिका अधिसूचित महसूल मंडळामध्ये फळपीक विमा योजना राबविण्याच्या दृष्टीने संबंधित कामही जोमाने सुरु झाले, परंतु तेवढ्यात फळपीक विमा योजना राबविण्याची जबाबदारी असणाचा विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यात पूर्वीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतली. विमा कंपन्यांनी टाकलेल्या दबावामुळे कृषी विभागाने कोणताही मागचा पुढचा विचार लक्षात न घेता १६ आॅक्टोबर रोजी विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपास करण्याचा सुधारित निर्णय घेऊन टाकला. यामध्ये शेतकऱ्यांचे हित न जोपासता केवळ विमा कंपन्याच्या मर्जीसाठी एक महिन्यापूर्वीचा शासन निर्णय बदलवून हा शासन निर्णय घेतला आहे. यातही विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती विभागातील बुलडाणा, नागपूर, विभागातील नागपूर, वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे.