शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

फळ पिकांच्या विमा रकमेत ५० टक्के कपात

By admin | Updated: November 1, 2014 01:26 IST

बदलत चाललेल्या तापमानामुळे आणि वेगाच्या वाऱ्यामुळे होणारे फळपिकांचे नुकसान व सबंधित शेतकऱ्यांना बसणारा आर्थीक फटका...

अमरावती : बदलत चाललेल्या तापमानामुळे आणि वेगाच्या वाऱ्यामुळे होणारे फळपिकांचे नुकसान व सबंधित शेतकऱ्यांना बसणारा आर्थीक फटका लक्षात घेवून कृषी विभागाने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा यंदाही सुरु ठेवणयाचा निर्णय घेतला. मात्र यावेळी विविध फळ पिकांसाठी पूर्वी ठरविण्यात आलेल्या विमा संरक्षण रकमेत तब्बल ५० टक्यापर्यंत कात्री लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे विमा कंपन्यांच्या दबावापुढे कृषी विभागाने विशेष: विदर्भ व इतर काही ठिकाणच्या सुमारे १२ जिल्ह्याना उद्दिष्ट दिले आहे.संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरु, द्राक्ष, केळी, आंबा आणि काजू फळपिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी हवामानावर आधारित फळपीक योजनेचा पहिला टप्पा राज्यभरात राबविण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. यंदा दुसऱ्या टप्यातही फळपीक विमा योजना सुरु ठेवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. त्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर २०१४ रोजी शासन निर्णयानुसार ही बाब लक्षात घेता शासनाने दिलेल्या सूचनेनुसार कृषी विभागाने संत्रा, मोसंबी (आंबिया बहर) द्राक्ष, पेरु, केळी, आंबा, डाळींब ,काजू फळांचा हवामानावर आधारित योजनेत समावेश होईल. कृषी विभागाची पक्षपाती भूमिका अधिसूचित महसूल मंडळामध्ये फळपीक विमा योजना राबविण्याच्या दृष्टीने संबंधित कामही जोमाने सुरु झाले, परंतु तेवढ्यात फळपीक विमा योजना राबविण्याची जबाबदारी असणाचा विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यात पूर्वीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतली. विमा कंपन्यांनी टाकलेल्या दबावामुळे कृषी विभागाने कोणताही मागचा पुढचा विचार लक्षात न घेता १६ आॅक्टोबर रोजी विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपास करण्याचा सुधारित निर्णय घेऊन टाकला. यामध्ये शेतकऱ्यांचे हित न जोपासता केवळ विमा कंपन्याच्या मर्जीसाठी एक महिन्यापूर्वीचा शासन निर्णय बदलवून हा शासन निर्णय घेतला आहे. यातही विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती विभागातील बुलडाणा, नागपूर, विभागातील नागपूर, वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे.