शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

फळ पिकांच्या विमा रकमेत ५० टक्के कपात

By admin | Updated: November 1, 2014 01:26 IST

बदलत चाललेल्या तापमानामुळे आणि वेगाच्या वाऱ्यामुळे होणारे फळपिकांचे नुकसान व सबंधित शेतकऱ्यांना बसणारा आर्थीक फटका...

अमरावती : बदलत चाललेल्या तापमानामुळे आणि वेगाच्या वाऱ्यामुळे होणारे फळपिकांचे नुकसान व सबंधित शेतकऱ्यांना बसणारा आर्थीक फटका लक्षात घेवून कृषी विभागाने हवामानावर आधारित पथदर्शक फळपीक विमा यंदाही सुरु ठेवणयाचा निर्णय घेतला. मात्र यावेळी विविध फळ पिकांसाठी पूर्वी ठरविण्यात आलेल्या विमा संरक्षण रकमेत तब्बल ५० टक्यापर्यंत कात्री लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे विमा कंपन्यांच्या दबावापुढे कृषी विभागाने विशेष: विदर्भ व इतर काही ठिकाणच्या सुमारे १२ जिल्ह्याना उद्दिष्ट दिले आहे.संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरु, द्राक्ष, केळी, आंबा आणि काजू फळपिकांना विमा संरक्षण मिळवून देण्यासाठी हवामानावर आधारित फळपीक योजनेचा पहिला टप्पा राज्यभरात राबविण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. यंदा दुसऱ्या टप्यातही फळपीक विमा योजना सुरु ठेवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते. त्या पार्श्वभूमीवर १० सप्टेंबर २०१४ रोजी शासन निर्णयानुसार ही बाब लक्षात घेता शासनाने दिलेल्या सूचनेनुसार कृषी विभागाने संत्रा, मोसंबी (आंबिया बहर) द्राक्ष, पेरु, केळी, आंबा, डाळींब ,काजू फळांचा हवामानावर आधारित योजनेत समावेश होईल. कृषी विभागाची पक्षपाती भूमिका अधिसूचित महसूल मंडळामध्ये फळपीक विमा योजना राबविण्याच्या दृष्टीने संबंधित कामही जोमाने सुरु झाले, परंतु तेवढ्यात फळपीक विमा योजना राबविण्याची जबाबदारी असणाचा विमा कंपन्यांनी निवडक जिल्ह्यात पूर्वीच्या विमा संरक्षित रकमेवर हरकत घेतली. विमा कंपन्यांनी टाकलेल्या दबावामुळे कृषी विभागाने कोणताही मागचा पुढचा विचार लक्षात न घेता १६ आॅक्टोबर रोजी विमा रकमेत २५ ते ५० टक्के कपास करण्याचा सुधारित निर्णय घेऊन टाकला. यामध्ये शेतकऱ्यांचे हित न जोपासता केवळ विमा कंपन्याच्या मर्जीसाठी एक महिन्यापूर्वीचा शासन निर्णय बदलवून हा शासन निर्णय घेतला आहे. यातही विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती विभागातील बुलडाणा, नागपूर, विभागातील नागपूर, वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे.