शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

पाच लाख क्विंटल तूर बाकी

By admin | Updated: June 6, 2017 00:10 IST

तूर खरेदी केंद्रांना शासनाने १० जूनपर्यत मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवर डीएमओव्दारा तूर खरेदी सुरू करण्यात आली.

शेडबाहेरील तुरीची खरेदी : २३,३१२ शेतकऱ्यांना टोकनलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तूर खरेदी केंद्रांना शासनाने १० जूनपर्यत मुदतवाढ दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवर डीएमओव्दारा तूर खरेदी सुरू करण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार सध्या बाजार समितीच्या आवारात परंतु उघड्यावर असलेल्या तुरीची खरेदी व मोजणी सुरू आहे. त्यानंतर टोकन दिलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या घरी असलेली तूर यार्डात बोलावण्यात येऊन खरेदी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत २३, ३९४ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आलेले आहे. या शेतकऱ्यांची पाच लाख सात हजार बारा व्किंटल तुरीची खरेदी बाकी आहे.यापूर्वी सुरू असलेल्या केंद्रांची मुदत ३१ मे रोजी संपल्याने तूर खरेदी बंद होती. मात्र राज्य शासनाचे विनंतीवरून केंद्र शासनाने पुन्हा १० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्वच १२ ही केंद्रांवरील तूर खरेदी सुरू होती. मात्र रविवारी मोर्शी व अंजनगाव सुर्जी केंद्रात उघड्यावर ठेवण्यात आलेली तूर खरेदी झाल्याने येथील खरेदी बंद होती.शासनाचे आदेशानुसार बाजार समिती आवारातील तूर खरेदी प्रथम करण्यात येणार आहे.व या खरेदी तुरीची उचल करण्यात येणार आहे. त्यानंतर टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची घरी असलेली तूर खरेदी करण्याचे आदले दिवसी बाजार समितीव्दारा फोन करण्यात येणार आहे. व नंतर ही तूर खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख यांनी दिली.राज्य शासनाची बाजार हस्तक्षेप योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच २७ एप्रिल पासून आतापर्यत पाच लाख ७९१ शेतकऱ्यांची १२ हजार ४४३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. तसेच रविवारी ७११ शेतकऱ्यांची ९३ हजार ३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीत टिनशेड नसल्यामुळे व सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू असल्याने तूर पावसात ओली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.खरेदी, मोजणीसाठी शिल्लक तूरजिल्ह्यात सद्यस्थितीत २३,३९४ शेतकऱ्यांची पाच लाख सात हजार १२ व्किंटल तूर खरेदी बाकी आहे. यामध्ये अचलपूर केंद्रावर २,०६४ शेतकऱ्यांची ४३ हजार ३८५, अमरावती केंद्रावर ४,३८८ केंद्रावर १,२३,३०७, अंजनगाव सुर्जी केंद्रावर २,४४८ शेतकऱ्यांची ४०,८६३, चांदूर बाजार केंद्रावर १,४८३ शेतकऱ्यांची २७,९८६, चांदूर रेल्वे केंद्रावर १,७८५ शेतकऱ्यांची ३४,३०२, दर्यापूर केंद्रावर ३,१५५ शेतकऱ्यांची ८३,००१, धामणगाव केंद्रावर १,४०१ शेतकऱ्यांची २६,२२६,धारणी केंद्रावर १०५ शेतकऱ्यांची १,४०६,मोर्शी केंद्रावर २,१९१ शेतकऱ्यांची ४४,३१८, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर २,३१७ शेतकऱ्यांची २,३१७ शेतकऱ्यांची ४४,९९६ व वरूड केंद्रावर ८६६ शेतकऱ्यांची १३,५४४ व्किंटल तूर खरेदी अद्याप बाकी आहे.