शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पश्चिम विदर्भातील ५११ प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात पाच टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST

अमरावती/ संदीप मानकर पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांमध्ये १० जूनच्या अहवालानुसार २६.४६ टक्के पाणीसाठा होता. मात्र, विदर्भात मान्सूनच्या आगमनामुळे ...

अमरावती/ संदीप मानकर

पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांमध्ये १० जूनच्या अहवालानुसार २६.४६ टक्के पाणीसाठा होता. मात्र, विदर्भात मान्सूनच्या आगमनामुळे आठवड्याभरातच पाणीसाठ्यात ५.०३ टक्क्यांनी वाढ झाली असून, सद्यस्थितीत ५११ प्रकल्पांमध्ये सरासरी ३१.४९ टक्के पाणीसाठा आहे. ही नागरिकांसाठी आनंदाची बाब ठरली आहे.

यंदा पश्चिम विदर्भात १० जूननंतर मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे काही नद्यासुद्धा दुथडी भरून वाहिल्या. परिणामी उन्हाळ्यात घट झालेल्या पाणीसाठ्यात काही प्रमाणात तरी वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यंदासुद्धा चांगला पाऊस बरसणार असून, प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

१९ जूनच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, १० जून रोजी नऊ मोठ्या प्रकल्पात ३२.२४ टक्के पाणीसाठा होता. आता त्यात वाढ होऊन तो ३७.१५ टक्के झाला. २५ मध्यम प्रकल्पांत ३०.३५ टक्के पाणीसाठा होता. आता ३६.७७ टक्के झाला. ४७७ लघू प्रकल्पांत १६.९५ टक्के पाणीसाठा होता. आता मात्र वाढ होऊन २१.०२ टक्के झाला आहे. ५११ सिंचन प्रकल्पांचा प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा १०३१.४७ दलघमी आहे. त्याची सरासरी ३१.४१ टक्के आहे. पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने सध्या तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. प्रकल्प शंभर टक्के भरल्यास हजारो हेक्टरला सिंचनाचीसुद्धा सोय होणार आहे. सध्या नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३७.१५ टक्के, २५ मध्यम प्रकल्पांमध्ये ३६.७७ टक्के, तर ४७७ लघु प्रकल्पांमध्ये २१.०२ टक्के पाणीसाठा आहे.

बॉक्स:

नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थिती

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात ४४.६५ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३५.८५ टक्के, अरुणावती २८.९५ टक्के, बेंबळा ५२.५१ टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा प्रकल्प ३०.४० टक्के, वान ३३.७० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २८.७२ टक्के, पेनटाकळी २६.६१ टक्के, तर खडकपूर्णा प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे. अमरावती जिल्ह्यतील तीन मध्यम प्रकल्पात ४८ टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे, तर यवतमाळ जिल्ह्यतील दोन प्रकल्पात ४७ टक्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमध्ये ४३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.