शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

४९ कोटींची पाणीपुरवठा योजना लोकवर्गणीत अडकली

By admin | Updated: June 16, 2015 00:28 IST

शहरातील साडेआठ लाख लोकसंख्येला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने

३० टक्के वाटा कोण भरणार ? : महापालिकेने जबाबदारी झटकलींअमरावती : शहरातील साडेआठ लाख लोकसंख्येला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नगरोत्थानअंतर्गत ४९ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळविली आहे. मात्र, ३० टक्के लोकवर्गणीच्या वाट्यामुळे तूर्तास ती अडकली आहे. तिजोरीत ठणठणाट असल्याने महापालिकेने नकार दिला तर जीवन प्राधिकरण बोर्डाने अद्यापही मंजुरी प्रदान केली नसल्याने ही योजना अडकली असल्याचे वास्तव पुढे आले आहे.शहराचा वाढता विस्तार बघता ही योजना शहरवासींयासाठी अतिशय फलश्रूती ठरणारी आहे. ४४ कोटींची योजना वेळेत सुरु झाली नसल्याने ती आता ४९ कोटींवर पोहचली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे दौऱ्यावर असताना वाढीव पाणीपुरवठा योजेनेसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या निधीला मंजुरी प्रदान केली आहे. या योजनेसाठी लोकवर्गणीची ३० टक्के रक्कम ही महापालिका प्रशासनाने अदा करावी, असे पत्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंत्यांनी आयुक्तांच्या नावे पाठविले. परंतु महापालिका तिजोरीत ठणठणाट असल्याचे कारण पुढे करुन प्रशासनाने लोकवर्गणीची ३० टक्के रक्कम मजीप्राने भरावी, असे कळविले आहे. त्यामुळे लोकवर्गणीचे १५ कोटी रुपये मजीप्राने भरण्याची हमी देखील घेतली आहे. जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची त्याकरिता मंजुरी आवश्यक असल्याने ती अद्यापही मिळाली नाही. (प्रतिनिधी)नवीन योजनेत या कामांचा आहे समावेशबडनेरा, भीमटेकडी, नागपुरी गेट व कॅम्प येथे नवीन जलकुंभाची निर्मितीमोर्शीच्या सिंभोरा येथील सहा पंप बदलविणे१९२ कि.मी. ची जुनी जलवाहिनी बदलविणेनवीन नागरी वस्त्यांमध्ये १०० कि.मी.च्या जलवाहिन्या टाकणेतपोवन येथे ३२ दशलक्ष लिटरचे नवे शुद्धिकरण केंद्र साकारणे