शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

मार्चअखेर ४८३ गावांना कोरड, ‘मे’मध्ये काय होणार?

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: February 7, 2024 21:56 IST

पावसाच्या तुटीचा परिणाम : प्रशासनाद्वारा ५०८ उपाययोजनांची मात्रा, १३ कोटींचा निधी

अमरावती: पावसाची तूट राहिल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे १३ तालुक्यांच्या भूजल पातळीत तूट आलेली आहे. जलस्रोत, उद्भव आतापासूनच कोरडे पडू लागले आहे, त्यामुळे मार्चअखेर किमान ४८३ गावांना कोरड लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने ५०८ उपाययोजनांची मात्रा योजली आहे. यावर किमान १२.७१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.

यंदा मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब झाला. त्यानंतरही ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिला. त्यामुळे जिल्ह्यात चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यांत ३१ टक्के पावसाची तूट राहिली. अशा परिस्थितीत जानेवारी अखेरपासून जलस्रोत कोरडे पडायले लागले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या स्मरणपत्रानंतर जरा उशिरानेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केलेला आहे.

जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत राहणाऱ्या पाणीटंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात ४८३ गावांना पाणीटंचाईची झळ लागण्याची शक्यता आहे. शिवाय मेळघाटात उंचावरील काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. आता रब्बी हंगामासाठी भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. याचाही परिणाम होऊन नजीकचे जलस्रोताच्या पातळीत कमी येणार आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीdroughtदुष्काळ