शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

४७५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

अमरावती/ संदीप मानकर जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत ...

अमरावती/ संदीप मानकर

जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत त्यांना वीज जोडणी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

एचव्हीडीएस (उच्चदाब वितरण प्रणाली) अंतर्गत ३१ मार्च २०१८ पूर्वी ३ हजार ९०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरीता अर्ज केले. त्यापैकी आतापर्यंत ३४२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अद्यापही ४७५ शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज जोडणी न मिळाल्याने ते संबंधित महावितरण कार्यालयात येरझारा घालत आहेत. पैसे भरूनही लाभ मिळत नसेल, तर शेती कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ज्या वीज जोडणीचे अंतर ६०० मीटरपर्यंत आहे, अशा ठिकाणीच महावितरणाला अडचण निर्माण होत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने शेतात उच्चदाब वाहिनी टाकणे तसेच विद्युत पोल व ट्रान्सफाॅर्मर लावण्यास अडचणी येत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्णत्वास जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

एजी २०-२० पॉलिसी

महावितरणच्या एजी २०-२० पॉलिसी अंतर्गत १ एप्रिल २०१८ नंतर २७०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता महावितरणकडे पैसे भरून अर्ज केले. त्यापैकी ३० मीटरच्या आता लघुदाब वाहिनी व ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध आहे. अशा ८०० ग्राहकांना आतापर्यंत वीज जोडणीचा लाभ मिळाला. मात्र, ज्यांचे लघुदाब वाहिनी अंतर २०० मीटरपेक्षा जास्त आहे, अशा १९०० ग्राहकांना अद्यापही कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब महावितरणच्या आकडेवारीतून समोर आली.

बॉक्स:

ग्राहकांनी खर्च केला तर वीज जोडणीचा लाभ

लघुदाब वाहिनीचे अंतर जर ट्रान्सफाॅर्मरपासून २०० मीटर असेल व ज्या ग्राहकांनी याचा खर्च जर स्वत: केला, तर आतापर्यंत ३० ग्राहकांना याचा लाभ तातडीने देण्यात आला. एक कनेक्शनला साधारणत: ४० हजार रुपये खर्च येतो. मात्र, ज्यांच्याकडे खर्च करण्याची क्षमता नाही, अशा ग्राहकांना उच्चदाब वाहिनीवरून कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी, याकरिता महावितरणने मुख्य कार्यालयाला १५० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याची तरतूद झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

कोट

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्यांनी पैसे भरले, असे फक्त ४७५ ग्राहक राहिले आहेत. पावसाळ्यामुळे कामात व्यत्यय येत आहे. ती कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होतील. १ एप्रिलनंतर ज्यांचे कनेक्शन ३० मीटरच्या आता आहे, अशा ८०० जणांना सात दिवसांच्या आत महावितरणने कनेक्शन दिले आहेत.

- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण