शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

४७५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

अमरावती/ संदीप मानकर जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत ...

अमरावती/ संदीप मानकर

जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत त्यांना वीज जोडणी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

एचव्हीडीएस (उच्चदाब वितरण प्रणाली) अंतर्गत ३१ मार्च २०१८ पूर्वी ३ हजार ९०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरीता अर्ज केले. त्यापैकी आतापर्यंत ३४२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अद्यापही ४७५ शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज जोडणी न मिळाल्याने ते संबंधित महावितरण कार्यालयात येरझारा घालत आहेत. पैसे भरूनही लाभ मिळत नसेल, तर शेती कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ज्या वीज जोडणीचे अंतर ६०० मीटरपर्यंत आहे, अशा ठिकाणीच महावितरणाला अडचण निर्माण होत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने शेतात उच्चदाब वाहिनी टाकणे तसेच विद्युत पोल व ट्रान्सफाॅर्मर लावण्यास अडचणी येत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्णत्वास जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

एजी २०-२० पॉलिसी

महावितरणच्या एजी २०-२० पॉलिसी अंतर्गत १ एप्रिल २०१८ नंतर २७०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता महावितरणकडे पैसे भरून अर्ज केले. त्यापैकी ३० मीटरच्या आता लघुदाब वाहिनी व ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध आहे. अशा ८०० ग्राहकांना आतापर्यंत वीज जोडणीचा लाभ मिळाला. मात्र, ज्यांचे लघुदाब वाहिनी अंतर २०० मीटरपेक्षा जास्त आहे, अशा १९०० ग्राहकांना अद्यापही कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब महावितरणच्या आकडेवारीतून समोर आली.

बॉक्स:

ग्राहकांनी खर्च केला तर वीज जोडणीचा लाभ

लघुदाब वाहिनीचे अंतर जर ट्रान्सफाॅर्मरपासून २०० मीटर असेल व ज्या ग्राहकांनी याचा खर्च जर स्वत: केला, तर आतापर्यंत ३० ग्राहकांना याचा लाभ तातडीने देण्यात आला. एक कनेक्शनला साधारणत: ४० हजार रुपये खर्च येतो. मात्र, ज्यांच्याकडे खर्च करण्याची क्षमता नाही, अशा ग्राहकांना उच्चदाब वाहिनीवरून कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी, याकरिता महावितरणने मुख्य कार्यालयाला १५० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याची तरतूद झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

कोट

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्यांनी पैसे भरले, असे फक्त ४७५ ग्राहक राहिले आहेत. पावसाळ्यामुळे कामात व्यत्यय येत आहे. ती कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होतील. १ एप्रिलनंतर ज्यांचे कनेक्शन ३० मीटरच्या आता आहे, अशा ८०० जणांना सात दिवसांच्या आत महावितरणने कनेक्शन दिले आहेत.

- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण