शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

४७५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

अमरावती/ संदीप मानकर जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत ...

अमरावती/ संदीप मानकर

जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत त्यांना वीज जोडणी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

एचव्हीडीएस (उच्चदाब वितरण प्रणाली) अंतर्गत ३१ मार्च २०१८ पूर्वी ३ हजार ९०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरीता अर्ज केले. त्यापैकी आतापर्यंत ३४२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अद्यापही ४७५ शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज जोडणी न मिळाल्याने ते संबंधित महावितरण कार्यालयात येरझारा घालत आहेत. पैसे भरूनही लाभ मिळत नसेल, तर शेती कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ज्या वीज जोडणीचे अंतर ६०० मीटरपर्यंत आहे, अशा ठिकाणीच महावितरणाला अडचण निर्माण होत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने शेतात उच्चदाब वाहिनी टाकणे तसेच विद्युत पोल व ट्रान्सफाॅर्मर लावण्यास अडचणी येत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्णत्वास जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

एजी २०-२० पॉलिसी

महावितरणच्या एजी २०-२० पॉलिसी अंतर्गत १ एप्रिल २०१८ नंतर २७०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता महावितरणकडे पैसे भरून अर्ज केले. त्यापैकी ३० मीटरच्या आता लघुदाब वाहिनी व ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध आहे. अशा ८०० ग्राहकांना आतापर्यंत वीज जोडणीचा लाभ मिळाला. मात्र, ज्यांचे लघुदाब वाहिनी अंतर २०० मीटरपेक्षा जास्त आहे, अशा १९०० ग्राहकांना अद्यापही कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब महावितरणच्या आकडेवारीतून समोर आली.

बॉक्स:

ग्राहकांनी खर्च केला तर वीज जोडणीचा लाभ

लघुदाब वाहिनीचे अंतर जर ट्रान्सफाॅर्मरपासून २०० मीटर असेल व ज्या ग्राहकांनी याचा खर्च जर स्वत: केला, तर आतापर्यंत ३० ग्राहकांना याचा लाभ तातडीने देण्यात आला. एक कनेक्शनला साधारणत: ४० हजार रुपये खर्च येतो. मात्र, ज्यांच्याकडे खर्च करण्याची क्षमता नाही, अशा ग्राहकांना उच्चदाब वाहिनीवरून कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी, याकरिता महावितरणने मुख्य कार्यालयाला १५० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याची तरतूद झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

कोट

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्यांनी पैसे भरले, असे फक्त ४७५ ग्राहक राहिले आहेत. पावसाळ्यामुळे कामात व्यत्यय येत आहे. ती कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होतील. १ एप्रिलनंतर ज्यांचे कनेक्शन ३० मीटरच्या आता आहे, अशा ८०० जणांना सात दिवसांच्या आत महावितरणने कनेक्शन दिले आहेत.

- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण