शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

४७५ शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीज जोडण्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

अमरावती/ संदीप मानकर जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत ...

अमरावती/ संदीप मानकर

जिल्ह्यातील ४७५ शेतकरी तीन वर्षांपासून कृषिपंपाच्या वीज जोडणीची प्रतीक्षा करीत आहेत. महावितरणकडे अर्ज करूनही या कालावधीत त्यांना वीज जोडणी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

एचव्हीडीएस (उच्चदाब वितरण प्रणाली) अंतर्गत ३१ मार्च २०१८ पूर्वी ३ हजार ९०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरीता अर्ज केले. त्यापैकी आतापर्यंत ३४२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अद्यापही ४७५ शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज जोडणी न मिळाल्याने ते संबंधित महावितरण कार्यालयात येरझारा घालत आहेत. पैसे भरूनही लाभ मिळत नसेल, तर शेती कशी करावी, असा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ज्या वीज जोडणीचे अंतर ६०० मीटरपर्यंत आहे, अशा ठिकाणीच महावितरणाला अडचण निर्माण होत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने शेतात उच्चदाब वाहिनी टाकणे तसेच विद्युत पोल व ट्रान्सफाॅर्मर लावण्यास अडचणी येत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ही कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्णत्वास जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बॉक्स

एजी २०-२० पॉलिसी

महावितरणच्या एजी २०-२० पॉलिसी अंतर्गत १ एप्रिल २०१८ नंतर २७०० वीज ग्राहक शेतकऱ्यांनी कृषिपंपाला वीज जोडणी मिळण्याकरिता महावितरणकडे पैसे भरून अर्ज केले. त्यापैकी ३० मीटरच्या आता लघुदाब वाहिनी व ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध आहे. अशा ८०० ग्राहकांना आतापर्यंत वीज जोडणीचा लाभ मिळाला. मात्र, ज्यांचे लघुदाब वाहिनी अंतर २०० मीटरपेक्षा जास्त आहे, अशा १९०० ग्राहकांना अद्यापही कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळाली नसल्याची धक्कादायक बाब महावितरणच्या आकडेवारीतून समोर आली.

बॉक्स:

ग्राहकांनी खर्च केला तर वीज जोडणीचा लाभ

लघुदाब वाहिनीचे अंतर जर ट्रान्सफाॅर्मरपासून २०० मीटर असेल व ज्या ग्राहकांनी याचा खर्च जर स्वत: केला, तर आतापर्यंत ३० ग्राहकांना याचा लाभ तातडीने देण्यात आला. एक कनेक्शनला साधारणत: ४० हजार रुपये खर्च येतो. मात्र, ज्यांच्याकडे खर्च करण्याची क्षमता नाही, अशा ग्राहकांना उच्चदाब वाहिनीवरून कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी, याकरिता महावितरणने मुख्य कार्यालयाला १५० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याची तरतूद झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

कोट

३१ मार्च २०१८ पूर्वी ज्यांनी पैसे भरले, असे फक्त ४७५ ग्राहक राहिले आहेत. पावसाळ्यामुळे कामात व्यत्यय येत आहे. ती कामे ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण होतील. १ एप्रिलनंतर ज्यांचे कनेक्शन ३० मीटरच्या आता आहे, अशा ८०० जणांना सात दिवसांच्या आत महावितरणने कनेक्शन दिले आहेत.

- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण