शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
4
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
5
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
6
रतन टाटांचा श्वान महिन्याला कमावतो इतके रुपये; एकूण संपत्ती पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही
7
सरकारकडून मदतीच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक, आकडे फुगवून दाखवले- शरद पवार गटाचा आरोप
8
"तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर
9
ओबीसी तरुणांच्या जीवाची सरकारला थोडीजरी काळजी असेल तर...; विजय वडेट्टीवार यांचे रोखठोक मत
10
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
11
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
12
“महायुती सरकारने राज्यात लाडका गुंड योजना सुरू करावी”; घायवळ प्रकरणावरून वडेट्टीवारांचा टोला
13
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
14
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
15
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
16
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
17
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
18
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
19
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
20
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?

४७५ अंगणवाडी, बालवाडी केंद्रात नाही पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यातील २ हजार ६३९ अंगणवाडी व बालवाडीपैकी २ हजार ६९३ ठिकाणीच पाण्याची सुविधा आहे; मात्र अजूनही ...

अमरावती : जिल्ह्यातील २ हजार ६३९ अंगणवाडी व बालवाडीपैकी २ हजार ६९३ ठिकाणीच पाण्याची सुविधा आहे; मात्र अजूनही ४७५ अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे केंद्राबाहेरील बोअरवेल किंवा सार्वजनिक नळावरून तहान भागवावी लागत आहे. अशातच आता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्राला नळ जोडणी देण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये २ हजार ६३९ अंगणवाडी व बालवाडी केंद्रे आहेत. या ठिकाणी संबंधित गावांतील चिमुकल्यांना पोषण आहार दिला जातो. हा आहार शिजविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याकरिता ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्ररीत्या सुविधा नाही, अशा ठिकाणी केंद्रालगतच्या बोअरवेल, हँडपंप किंवा सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागते. आजघडीला जिल्ह्यात २६३९ पैकी २१६४ केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे; मात्र १४ तालुक्यांपैकी १० तालुक्यांतील ४७५ अंगणवाडी व बालवाडी केंद्रांमध्ये पाणी समस्या आहे. परिणामी, बाहेरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जल जीवन मिशन अंर्तगत या केंद्रांना पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र नळ जोडणी देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे.

बॉक़्स

तालुकानिहाय नळ जोडणी नसलेली केंद्रे

अचलपूर १३, अमरावती ८, अंजनगाव सुर्जी ८२, भातकुली ६१, चांदूर बाजार १६, चांदूर रेल्वे २, दर्यापूर १६४, चिखलदरा ३७, धारणी ६०, नांदगाव खंडेश्वर ३२, मोर्शी, तिवसा, धामणगाव रेल्वे आणि वरूड निरंक.

कोट

अंगणवाडी केंद्रांना पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगातून नळ जोडणी करून देण्याची कार्यवाही संबंधित ग्रामपंचायतीने करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत.

श्रीराम कुलकर्णी, डेप्युटी सीईओ, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग.