शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

४७५ अंगणवाडी, बालवाडी केंद्रात नाही पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यातील २ हजार ६३९ अंगणवाडी व बालवाडीपैकी २ हजार ६९३ ठिकाणीच पाण्याची सुविधा आहे; मात्र अजूनही ...

अमरावती : जिल्ह्यातील २ हजार ६३९ अंगणवाडी व बालवाडीपैकी २ हजार ६९३ ठिकाणीच पाण्याची सुविधा आहे; मात्र अजूनही ४७५ अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे केंद्राबाहेरील बोअरवेल किंवा सार्वजनिक नळावरून तहान भागवावी लागत आहे. अशातच आता जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी केंद्राला नळ जोडणी देण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये २ हजार ६३९ अंगणवाडी व बालवाडी केंद्रे आहेत. या ठिकाणी संबंधित गावांतील चिमुकल्यांना पोषण आहार दिला जातो. हा आहार शिजविण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्याकरिता ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्ररीत्या सुविधा नाही, अशा ठिकाणी केंद्रालगतच्या बोअरवेल, हँडपंप किंवा सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागते. आजघडीला जिल्ह्यात २६३९ पैकी २१६४ केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे; मात्र १४ तालुक्यांपैकी १० तालुक्यांतील ४७५ अंगणवाडी व बालवाडी केंद्रांमध्ये पाणी समस्या आहे. परिणामी, बाहेरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जल जीवन मिशन अंर्तगत या केंद्रांना पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र नळ जोडणी देण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे.

बॉक़्स

तालुकानिहाय नळ जोडणी नसलेली केंद्रे

अचलपूर १३, अमरावती ८, अंजनगाव सुर्जी ८२, भातकुली ६१, चांदूर बाजार १६, चांदूर रेल्वे २, दर्यापूर १६४, चिखलदरा ३७, धारणी ६०, नांदगाव खंडेश्वर ३२, मोर्शी, तिवसा, धामणगाव रेल्वे आणि वरूड निरंक.

कोट

अंगणवाडी केंद्रांना पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगातून नळ जोडणी करून देण्याची कार्यवाही संबंधित ग्रामपंचायतीने करावी, अशा सूचना दिलेल्या आहेत.

श्रीराम कुलकर्णी, डेप्युटी सीईओ, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग.