शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

सहकारातील ४७० संस्था अवसायनात

By admin | Updated: December 17, 2015 00:30 IST

बिनकामाच्या व ठावठिकाणा नसणाऱ्या तसेच कागदोपत्री असणाऱ्या ४७० सहकारी संस्था, अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश उपनिबंधक कार्यालयाने बजावले आहेत.

गजानन मोहोड अमरावतीबिनकामाच्या व ठावठिकाणा नसणाऱ्या तसेच कागदोपत्री असणाऱ्या ४७० सहकारी संस्था, अवसायनात काढण्याचे अंतिम आदेश उपनिबंधक कार्यालयाने बजावले आहेत. १ जुलै २०१५ पासून जिल्ह्यातील २ हजार ३४६ सहकारी संस्थांचे सर्वेक्षण केले असता धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्याच्या सहकार विभागाद्वारा जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधकाच्या कार्यक्षेत्रातील सर्व सहकारी संस्थांच्या सर्वेक्षणाची विशेष मोहीम १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१५ या कालावधीत राबविण्यात आली. जिल्ह्यात दोन हजार ३४६ नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत. या सहकारी संस्थांचे ८४ टक्के कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारा आॅक्टोबर २०१५ पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये बंदस्थितीत, कार्यस्थगित व कागदोपत्रीच असलेल्या ३६५ संस्था आढळून आल्यात. तसेच नोंदणीकृत पत्त्यावर नसलेल्या व ठावठिकाणा नसलेल्या १०५ संस्था आढळून आल्यात. यापैकी ४७० संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत. यापैकी ४३६ संस्था अवसायनात काढण्याचे अंतरिम आदेश काढण्यात आले आहेत तर ८ संस्थांचे अंतिम आदेश काढण्यात आले आहेत.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ (क) मधील तरतूदीनुसार या सहकारी संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या संस्था अवसायनात घेऊनत्यांची संख्या कमी केल्यामुळे सहकार विभागास नियोजनबध्द पध्दतीने कार्यरत संस्थांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देता येईल. जिल्ह्यात कृषी बँक, कृषी पतसंस्था, कर्मचारी पतसंस्था, पणनसंस्था, नागरी बँका, नागरी पतसंस्था, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती आहेत.