शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : नाफेडच्या ४६ केंद्रांना टाळे, खासगीत व्यापाऱ्यांनी पाडले भाव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 21, 2023 18:31 IST

हे षडयंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

अमरावती :   हरभरा खरेदीसाठी नाफेडचे पोर्टलच जिल्हात दोन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने ४६ खरेदी केंद्रांना टाळे लागले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले. बाजार समित्यांमध्ये पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत. हे षडयंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

केंद्र शासनाने हरभऱ्यासाठी यंदा ५३३५ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात खासगीमध्ये हा भाव मिळत नसल्याने नाफेडद्वारे डीएमओच्या दहा, व्हीसीएमएफच्या १० व अन्य सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनीच्या १६ अशा एकूण ४६ केंद्रांमध्ये साधारणपणे पाच लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. नाफेडद्वारा जिल्ह्यातील एकूण हरभरा उत्पादनाच्या २५ टक्के हरभरा खरेदीचे लक्ष्यांक देण्यात आले होते व ही खरेदी झाल्याने आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना खासगीमध्ये हरभरा विक्रीशिवाय पर्यात उरला नाही. यामध्ये दर पडल्याने आता शेतकऱ्यांची लूट होत आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहे. त्यामुळे रब्बीवरच या सर्व शेतकऱ्यांची मदार होती. मात्र, हरभऱ्याला सुरुवातीपासूनच भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च पदरी पडणार की नाही, अशी शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निदर्शने

जिल्ह्यात हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी शुक्रवारी जिल्हा विपणन कार्यालयात निदर्शने केली. अवकाळी वातावरणाने शेतकरी केंद्रांवर हरभरा आणू शकले नाहीत, त्याममुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.