शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अमरावती : नाफेडच्या ४६ केंद्रांना टाळे, खासगीत व्यापाऱ्यांनी पाडले भाव

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 21, 2023 18:31 IST

हे षडयंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

अमरावती :   हरभरा खरेदीसाठी नाफेडचे पोर्टलच जिल्हात दोन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने ४६ खरेदी केंद्रांना टाळे लागले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले. बाजार समित्यांमध्ये पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत. हे षडयंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

केंद्र शासनाने हरभऱ्यासाठी यंदा ५३३५ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात खासगीमध्ये हा भाव मिळत नसल्याने नाफेडद्वारे डीएमओच्या दहा, व्हीसीएमएफच्या १० व अन्य सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनीच्या १६ अशा एकूण ४६ केंद्रांमध्ये साधारणपणे पाच लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. नाफेडद्वारा जिल्ह्यातील एकूण हरभरा उत्पादनाच्या २५ टक्के हरभरा खरेदीचे लक्ष्यांक देण्यात आले होते व ही खरेदी झाल्याने आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना खासगीमध्ये हरभरा विक्रीशिवाय पर्यात उरला नाही. यामध्ये दर पडल्याने आता शेतकऱ्यांची लूट होत आहे.

गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहे. त्यामुळे रब्बीवरच या सर्व शेतकऱ्यांची मदार होती. मात्र, हरभऱ्याला सुरुवातीपासूनच भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च पदरी पडणार की नाही, अशी शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निदर्शने

जिल्ह्यात हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी शुक्रवारी जिल्हा विपणन कार्यालयात निदर्शने केली. अवकाळी वातावरणाने शेतकरी केंद्रांवर हरभरा आणू शकले नाहीत, त्याममुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.