शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

४६९ पतसंस्था अडचणीत

By admin | Updated: March 28, 2017 00:04 IST

जिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यापैकी २०३४ ठेवीदारांना १७५ कोटी ३० लाखांची रक्कम देय आहे.

सहकार विभागाचा अहवाल : २०३४ ठेवीदारांना १७५ कोेटी रक्कम देय अमरावती : जिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यापैकी २०३४ ठेवीदारांना १७५ कोटी ३० लाखांची रक्कम देय आहे. तर ९६२ कर्जदारांकडून २०२ कोटी ११ लाखांचे कर्ज येणे असल्याचा सहकार विभागाचा अहवाल आहे.अचलपूर अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक ४ नोव्हेंबर २००८ मध्ये अवसायनात काढण्यात आली. त्यावेळी ८५७ कोटी १३ लाखांच्या ठेवी होत्या. यामध्ये एक लाखाच्या आतील ४४२८ ग्राहकांच्या ५३० कोटी ८२ लाखांच्या ठेवी आहेत. एक लाखांवरील २१५ ग्राहकांच्या ३२६ कोटी ३१ लाखांच्या ठेवी आहेत. तसेच अवसायन तारखेस ८८६ कोटी ६२ लाखांचे कर्ज येणे बाकी असल्याचे अहवालात नमूद आहे. यापैकी सप्टेंबर २०१६ अखेर डीआयसीजीसीद्वारे मंजूर ५३० कोटी ८२ लाखांच्या रकमेपैकी ४८७ कोटी ८६ लाखांची रक्कम वितरित करण्यात आली. अवसायन दिनांकापासून १८१ कोटी ३३ लाखांची वसुली करण्यात आली. अडचणीत आलेल्या एकूण दोन संस्था आदेशित करण्यात येऊन ६१ कोटी ५५ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. यापैकी तीन पतसंस्थांशी संबंधित ५७ व्यक्तींवर गुन्हे नोंदविले आहेत. ३१ मार्च २०१६ अखेर ३९६ कर्जदारांकडून ३४कोटी ४७ लाखांची वसुली करण्यात आली तर ९६२ कर्जदारांकडून २०२ कोटी ११ लाखांचे कर्ज येणे शिल्लक आहे. यामुळे या संस्था अडचणीत आल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन संस्थांकडे ६१.५५ लाखांची जबाबदारी निश्चितअडचणीतील पतसंस्थांपैकी कलम ८८ अन्वये दोन संस्थांकडे ६१ कोटी ५५ लाखांची शिल्लक वसुलपात्र रक्कम आहे. यामध्ये शेंदुरजनाघाट येथील लोकसेवा नागरी सहकारी संस्थेची चौकशी पूर्ण झाली. यामध्ये सात व्यक्तींवर १३ कोटी १६ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. वरुड येथील अर्बन क्रेडीट को आॅपरेटिव्ह संस्थांमधील ३ व्यक्तींवर ४८ कोटी ३९ लाखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. वरुडच्या समृद्धी पतसंस्थेचा अहवाल निरंक आहे. शासनाच्या अर्थसहाय्यापैकी ८.१७ लाखांची वसुली बाकीशासनाने यातीन संस्थांना २०० कोटी बिनव्याजी अर्थसहाय्य केले होते. यापैकी ४५.२३ लाखांचे अर्थसहाय्य ठेवीदारांना वाटप करण्यात आले. शासनाने संस्थेला दिलेल्या अर्थसहाय्यापैकी ८ कोटी १७ लाखांची वसुली फेब्रुवारी २०१७ अखेर व्हावयाची आहे. वसूल करायची एकूण रक्कम ३७ कोटी ६ लाख रुपये आहे. तीन संस्था अवसायनात, ५७ व्यक्तींवर गुन्हे दाखलजिल्ह्यातील ४६९ पतसंस्था अडचणीत आहेत. त्यापैकी वरुड तालुक्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. येथे सन २०१६ अखेर या तीन्ही पतसंस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत व ५७ व्यक्तींना अटक करण्यात आली होती. हीप्रकरणे दिवाणी न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. यासंस्थांची नोंदणी रद्द करून त्या अवसायनात काढण्यात आल्या आहेत.