शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जिल्ह्यात ५०६ गावांत ४५ हजार हेक्टर सिंचन सुविधा

By admin | Updated: November 1, 2016 00:15 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने दोन वर्ष पूर्ण केली आहे.

पालकमंत्री : राज्य शासनाच्या द्विवर्ष पूर्र्तीनिमित्त पत्रपरिषदअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने दोन वर्ष पूर्ण केली आहे. लोकाभिमुख शासन असा कारभार सांभाळताना शेतकरी सुखी राहावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार या योजनेची मुहर्तमेढ रोवली. परिणामी सिंचनाचा गंध नसलेल्या अनेक भागांत दोन वर्षांत या योजनेमुळे सिंचनक्षमता वाढीस लागली आहे. जिल्ह्यातही ५०८ गावांत ४५ हजार हेक्टर सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याचा दावा राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी येथे सोमवारी पत्रपरिषदेतून केला.राज्य शासनाने दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमिवर ना. पोटे हे येथील शासकीय विश्रामभवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ना. पोटे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दोन वर्षांत झालेल्या विविध विकास कामांची यादी सादर करताना जिल्ह्यातही भरीव कामगिरी झाल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १०,७०१ कृषी वीजपंपाना जोडणी देण्यात आली आहे. नव्या आठ हजार अर्जदारांना मार्च २०१७ पर्यत वीजजोडणी योजना राबविली जाणार आहे. जन सुविधांसाठी ९०० पाणंद रस्त्यांची निर्मिती करून जवळपास एक लाख ३५ हजार शेतकऱ्यांना शेतांमध्ये मशागतीसाठी व पीक काढण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ७३ टक्के शेतकऱ्यांना १३.५० कोटी रुपयांचे खरीप पीककर्ज वाटप केले. २ लाख ५२ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाला. शेतमालाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी सोयाबीन, कापूस, तूर, हरभऱ्यासाठी नाफेडमार्फत हमीभाव शासकीय खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुशेषांतर्गत ३२ सिंचन प्रकल्पांसाठी सुमारे २,५०० ऐक्टर आर. जमीन संपादित करण्यात आली आहे. धडक सिंचन योजनेंतर्गत १५०० विहिरी निर्माण केल्या आहेत. अन्न सुरेक्षेंतर्गत २ रुपये किलो गहू व ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ हे चार लाख शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठीही राजीव गांधी जीवनदायी योजनेत आमूलाग्र बदल करून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सरूकरण्यात आली आहे. मेळघाटातील आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीने देता याव्यात, यासाठी ४३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्गम भागात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून तीन हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. वीजपुरवठा करणे शक्य नसलेल्या भागात सौर कृषी पंप योजना सुरु करुन १७०० शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वाटप करण्यात आले. सर्वांसाठी घरकुल या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी दोन हजार शेतकऱ्यांना २०२२ पर्यत घरकूल दिले जाईल. संत्रा उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी कोकाकोला कंपनीसोबत करार करून वरुड येथे संत्रा उद्योग प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याची वाटचाल टेक्सटाईल पार्ककडे सुरू झाली असून सहा प्रकल्पांमधून ५० हजार लोकांना रोजगाराचे दालन उपलब्ध होईल, अशी ग्वाही पालकमंत्री पोटे यांनी दिली. अमरावती शहरासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत १०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विद्यापीठनजीक माजी राज्यपाल रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे १० एकर जमिनीवर स्मारक साकारले जाणार आहे. त्याकरिता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीेस हे आग्रही असल्याचे ना. पोटे म्हणाले. पत्रपरिषदेला भाजपाचे शहराध्यक्ष जयंत डेहनकर, महिला आघाडी प्रमुख नीता मोकलकर, भाजयुमोचे अध्यक्ष विवेक कलोती, डॉ. प्रणव कुळकर्णी, एमआयडीसी असोशियनचे किरण पातुरकर, सतीश करेसिया आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)