शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

नऊ वर्षांत ४५ हजार व्यावसायिकांकडे २५४ कोटी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:36 IST

पीएम मुद्रा लोन योजना : व्यवसाय सुरू पण किस्त भरण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासनाने एखादी योजना आणली की तिचा फायदा घेण्यापेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. शासन आज ना उद्या कर्ज माफ करेल, या उद्देशाने कर्जाचे हप्ते भरले जात नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत जाते. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेलाही याचा फटका बसला आहे.

या योजनेत जिल्ह्यात शिशू, किशोर व तरुण अशा एकूण ४४,९९१ खातेदारांनी २५४.२५ कोटींचे कर्ज घेतले, उद्योग उभारले. मात्र, वेळेवर किस्त भरणा होत नसल्याचे दिसून येते. ६ एप्रिल २०१५ रोजी या योजनेचा शुभारंभ झाला होता. या योजनेद्वारे सूक्ष्म व लहान व्यवसायांना १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. याला मुद्रा कर्ज म्हणतात. या योजनेसाठी तारण घेतले जात नाही. सर्वांनी व्यवसाय उभारावे व स्वतःची उन्नती साधावी, हा या योजनेमागचा उद्देश आहे.

मुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही.

या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे.

मुद्रा योजनेचे कर्ज तीनशिशू कर्ज: मुद्रा योजनेत छोट्या व्यावसायिकाला मोठे करण्यासाठी ५० हजारांचे कर्ज देण्याची तरतूद आहे. ३२४९२ खातेदारांना नऊ वर्षात ११०.२७ कोटींचे कर्ज दिले आहे.

किशोर कर्ज : व्यवसायाला उभारी देताना ५१ हजार ते पाच लाखांपर्यंतचे कर्ज बँकांद्वारा देण्यात येते. जिल्ह्यात या प्रकारात १२०६८ खातेदारांना १०९.८५ कोटींचे कर्ज दिले आहे.

तरुण कर्ज : मुद्रा लोन योजनेत पाच ते १० लाखांपर्यंत कर्ज बँकांद्वारा दिले जाते. ४३१ तरुणांनी ३४.१२ कोटींचे कर्ज बँकांद्वारा घेतले आहे. अनेक जण किस्त वेळेवर भरला जात नाही.

२५४ कोटींचे वाटपया योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे गहाणखत घेतले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ४४९९१ खातेदारांनी आतापर्यंत म्हणजेच नऊ वर्षांत २५४.२५ कोटींचे कर्ज मुद्रा योजनेत घेतले आहे. बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस दिल्यास खातेदारांकडून सहकार्य मिळत नाही.

थकबाकी वाढली, बँकांसमोर आव्हानप्रधानमंत्री मुद्रा योजनेत जिल्ह्यात ४४,९९१ खातेदारांना २५४.२५ कोटींचे कर्ज दिले आहे. मात्र, या खातेदारांकडून कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले जात नाहीत. त्यामुळे हे कर्ज कसे वसूल करावे, हा प्रश्न विविध बँकांसमोर आहे.

काही खातेदारांद्वारा नियमित भरणामुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही. या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती