शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

नऊ वर्षांत ४५ हजार व्यावसायिकांकडे २५४ कोटी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:36 IST

पीएम मुद्रा लोन योजना : व्यवसाय सुरू पण किस्त भरण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासनाने एखादी योजना आणली की तिचा फायदा घेण्यापेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. शासन आज ना उद्या कर्ज माफ करेल, या उद्देशाने कर्जाचे हप्ते भरले जात नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत जाते. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेलाही याचा फटका बसला आहे.

या योजनेत जिल्ह्यात शिशू, किशोर व तरुण अशा एकूण ४४,९९१ खातेदारांनी २५४.२५ कोटींचे कर्ज घेतले, उद्योग उभारले. मात्र, वेळेवर किस्त भरणा होत नसल्याचे दिसून येते. ६ एप्रिल २०१५ रोजी या योजनेचा शुभारंभ झाला होता. या योजनेद्वारे सूक्ष्म व लहान व्यवसायांना १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. याला मुद्रा कर्ज म्हणतात. या योजनेसाठी तारण घेतले जात नाही. सर्वांनी व्यवसाय उभारावे व स्वतःची उन्नती साधावी, हा या योजनेमागचा उद्देश आहे.

मुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही.

या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे.

मुद्रा योजनेचे कर्ज तीनशिशू कर्ज: मुद्रा योजनेत छोट्या व्यावसायिकाला मोठे करण्यासाठी ५० हजारांचे कर्ज देण्याची तरतूद आहे. ३२४९२ खातेदारांना नऊ वर्षात ११०.२७ कोटींचे कर्ज दिले आहे.

किशोर कर्ज : व्यवसायाला उभारी देताना ५१ हजार ते पाच लाखांपर्यंतचे कर्ज बँकांद्वारा देण्यात येते. जिल्ह्यात या प्रकारात १२०६८ खातेदारांना १०९.८५ कोटींचे कर्ज दिले आहे.

तरुण कर्ज : मुद्रा लोन योजनेत पाच ते १० लाखांपर्यंत कर्ज बँकांद्वारा दिले जाते. ४३१ तरुणांनी ३४.१२ कोटींचे कर्ज बँकांद्वारा घेतले आहे. अनेक जण किस्त वेळेवर भरला जात नाही.

२५४ कोटींचे वाटपया योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे गहाणखत घेतले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ४४९९१ खातेदारांनी आतापर्यंत म्हणजेच नऊ वर्षांत २५४.२५ कोटींचे कर्ज मुद्रा योजनेत घेतले आहे. बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस दिल्यास खातेदारांकडून सहकार्य मिळत नाही.

थकबाकी वाढली, बँकांसमोर आव्हानप्रधानमंत्री मुद्रा योजनेत जिल्ह्यात ४४,९९१ खातेदारांना २५४.२५ कोटींचे कर्ज दिले आहे. मात्र, या खातेदारांकडून कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले जात नाहीत. त्यामुळे हे कर्ज कसे वसूल करावे, हा प्रश्न विविध बँकांसमोर आहे.

काही खातेदारांद्वारा नियमित भरणामुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही. या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती