शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

नऊ वर्षांत ४५ हजार व्यावसायिकांकडे २५४ कोटी थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 15:36 IST

पीएम मुद्रा लोन योजना : व्यवसाय सुरू पण किस्त भरण्यास विलंब

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शासनाने एखादी योजना आणली की तिचा फायदा घेण्यापेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. शासन आज ना उद्या कर्ज माफ करेल, या उद्देशाने कर्जाचे हप्ते भरले जात नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत जाते. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मुद्रा योजनेलाही याचा फटका बसला आहे.

या योजनेत जिल्ह्यात शिशू, किशोर व तरुण अशा एकूण ४४,९९१ खातेदारांनी २५४.२५ कोटींचे कर्ज घेतले, उद्योग उभारले. मात्र, वेळेवर किस्त भरणा होत नसल्याचे दिसून येते. ६ एप्रिल २०१५ रोजी या योजनेचा शुभारंभ झाला होता. या योजनेद्वारे सूक्ष्म व लहान व्यवसायांना १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. याला मुद्रा कर्ज म्हणतात. या योजनेसाठी तारण घेतले जात नाही. सर्वांनी व्यवसाय उभारावे व स्वतःची उन्नती साधावी, हा या योजनेमागचा उद्देश आहे.

मुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही.

या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे.

मुद्रा योजनेचे कर्ज तीनशिशू कर्ज: मुद्रा योजनेत छोट्या व्यावसायिकाला मोठे करण्यासाठी ५० हजारांचे कर्ज देण्याची तरतूद आहे. ३२४९२ खातेदारांना नऊ वर्षात ११०.२७ कोटींचे कर्ज दिले आहे.

किशोर कर्ज : व्यवसायाला उभारी देताना ५१ हजार ते पाच लाखांपर्यंतचे कर्ज बँकांद्वारा देण्यात येते. जिल्ह्यात या प्रकारात १२०६८ खातेदारांना १०९.८५ कोटींचे कर्ज दिले आहे.

तरुण कर्ज : मुद्रा लोन योजनेत पाच ते १० लाखांपर्यंत कर्ज बँकांद्वारा दिले जाते. ४३१ तरुणांनी ३४.१२ कोटींचे कर्ज बँकांद्वारा घेतले आहे. अनेक जण किस्त वेळेवर भरला जात नाही.

२५४ कोटींचे वाटपया योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे गहाणखत घेतले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील ४४९९१ खातेदारांनी आतापर्यंत म्हणजेच नऊ वर्षांत २५४.२५ कोटींचे कर्ज मुद्रा योजनेत घेतले आहे. बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस दिल्यास खातेदारांकडून सहकार्य मिळत नाही.

थकबाकी वाढली, बँकांसमोर आव्हानप्रधानमंत्री मुद्रा योजनेत जिल्ह्यात ४४,९९१ खातेदारांना २५४.२५ कोटींचे कर्ज दिले आहे. मात्र, या खातेदारांकडून कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले जात नाहीत. त्यामुळे हे कर्ज कसे वसूल करावे, हा प्रश्न विविध बँकांसमोर आहे.

काही खातेदारांद्वारा नियमित भरणामुद्रा योजनेमध्ये काही खातेदारांद्वारा नियमितपणे कर्जाचा भरणा करण्यात येत असला तरी बहुतेक खातेदारांद्वारा मात्र भरणा होत नाही. शिवाय नोटीसला उत्तरही देत नाही व सहकार्य करीत नाही. या योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आलेली आहे. प्रामाणिक व नियमित खातेदारांना आता कर्जाची मर्यादा २० लाख रुपये करण्यात आलेली आहे. मात्र, कर्जाचा भरणा नियमित करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती