शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचे ४४ हजार परीक्षार्थी

By admin | Updated: March 1, 2016 00:10 IST

विद्यार्थ्याच्या करिअर मधील महत्त्वाचा पहिला टप्पा असलेली इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार १ मार्चपासून सुरू होत आहे.

पहिला पेपर मराठीचा : जिल्ह्यात पाच भरारी पथकेअमरावती : विद्यार्थ्याच्या करिअर मधील महत्त्वाचा पहिला टप्पा असलेली इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार १ मार्चपासून सुरू होत आहे. अमरावती विभागातून सुमारे १ लाख ७७ हजार २८० नियमित तर १० हजार ५१९ पुनर्परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विभागात सर्वाधिक ४४ हजार ५५१ नियमित विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील आहेत. परीक्षार्थ्यांसाठी जिल्ह्यात १९४ परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. अलीकडे विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचा ट्रेंड सुरू झाला असला तरी दहावीच्या परीक्षेचे महत्त्व अद्यापही कायम आहे. १ ते २९ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. विभागातून ८२ हजार ४३७ मुली आणि ९४ हजार ८४३ मुले ही परीक्षा देतील. पाचही जिल्ह्यातून ७ हजार ६७५ मुले आणि २ हजार ८४४ मुली पुनर्परीक्षार्थी आहेत. मंगळवारी मराठी विषयाच्या पेपरने दहावीच्या परीक्षेचा श्रीगणेशा होईल. उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवण्यासाठी विभागात ७३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. भरारी पथकांचा कॉपीवर ‘वॉच’बोर्डाच्या परीक्षेदरम्यान हमखास होणारे कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विविध परीक्षा केंद्रांवर भेटी देण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शहरी भागातील कॉपीचे प्रमाण या उपाययोजनांमुळे कमी झाले आहे. परंतु ग्रामीण भागातील कॉपीचे प्रकार थांबविण्यावर मंडळाचा सर्वाधिक भर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत परीक्षा केंद्रांमध्ये सातने वाढ झाली आहे. परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी मंडळाने केली आहे. विद्यार्थ्यांना दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाईल. परीक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सीईओ, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दहावीच्या परीक्षेसाठी एव्हाना घरोघरी लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. यंदा विज्ञानचे दोन पेपरगतवर्षी दहावी परीक्षार्थ्यांसाठी विज्ञान या विषयासाठी एकच पेपर घेण्यात आला. यंदा मात्र विज्ञान- १ आणि विज्ञान- २ असे दोन स्वतंत्र पेपर घेण्यात येणार आहेत. यंदाच्या परीक्षा प्रक्रियेमधील हा महत्त्वाचा बदल आहे. विभागातील ६८३ केंद्रावरून १,८७,७९९ विद्यार्थी १० वीची परीक्षा देणार आहेत. गुणवत्ता वाढीस लागल्याने कॉपीला आळा बसला आहे. कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार आहे.- संजय यादगिरे,सचिव, शिक्षण मंडळ, अमरावती