शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

अपघात विम्यात शेतकऱ्यांना ४४ लाख

By admin | Updated: March 18, 2015 00:23 IST

शासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत

लोकमत विशेषगजानन मोहोड अमरावतीशासनाच्या कृषी विभागाद्वारा राबविल्या जाणाऱ्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेत सन २०१३-१४ मध्ये प्राप्त झालेल्या ७१ पैकी ४४ प्रकरणांत शेतकरी परिवाराला ४४ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. १० मार्च २०१५ अखेर २१ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्यावतीने शेतकरी जनता अपघात विमा योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत विमा काढणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपघातात दोन्ही डोळे निकामी झाल्यास किंवा एक डोळा, एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रूपयांची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. अमरावती विभागात कृषी विभागाचे अमरावती, मोर्शी व अचलपूर असे तीन उपविभाग आहेत. अमरावती उपविभागात अपघातग्रस्त ३६ प्रकरणे दाखल करण्यात आली यापैकी २४ प्रकरणे विमा कंपनीद्वारा मंजूर करण्यात आली. ४ प्रकरणे नामंजूर तर ८ प्रकरणे विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत, मोर्शी उपविभागात २६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली. विमा कंपनीद्वारा १६ प्रकरणे मंजुर करण्यात आली. १ प्रस्ताव नाकारला, ९ प्रकरणे प्रलंबित असून २६ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.अचलपूर उपविभागात ९ अपघातग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे दाखल करण्यात आली. काय आहे शेतकरी जनता विमा योजना?शेती व्यवसाय करतांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, शॉक लागणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. अनेकदा कायमस्वरुपी अपंगत्व येते त्या परीवाराला उदरनिर्वाहासाठी आर्र्थीक लाभ मिळावा यासाठी आॅगस्ट २००४ मध्ये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना सुरू करण्यात आली, याच योजनेला २००९-१० मध्ये शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नाव देण्यात आले आहे.