शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पश्चिम विदर्भात यंदा नैसर्गिक आपत्तीचे ४४ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 16:43 IST

७,५३९ हेक्टर क्षेत्र बाधित : ४५ गंभीर जखमी, लहान-मोठी १०४ जनावरे मृत  

अमरावती : यंदा जून कोरडाच गेला. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले. या ७५ दिवसांदरम्यान पश्चिम विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे ४४ व्यक्ती मृत पावले. यापैकी ३६ प्रकरणांत १.४४ कोटींची मदत देण्यात आली. अद्याप ८ प्रकरणे प्रलंबित आहेत. याच अवधीत लहान-मोठी १०४ जनावरे दगावली आहेत. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे ७,५३९ हेक्टर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले.

विभागात १६ ऑगस्टपर्यंत नैसर्गिक आपत्तीचे सर्वाधिक १६ जणांचा मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात झालेले आहे. अमरावती जिल्ह्यात १०, अकोला ७, बुलडाणा ८ व वाशीम जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये ११ व्यक्ती पुरात वाहून गेल्याने, तर २३ जण वीज पडून ठार झालेत. आपत्तीच्या इतर कारणांनी १० व्यक्ती मृत झाल्या आहेत. यासाठी अमरावती जिल्ह्यात २० लाख, अकोला २० लाख, यवतमाळ ६४ लाख, बुलडाणा २८ लाख, तर वाशीम जिल्ह्यात १२ अशीे एकूण एक कोटी ४४ लाखांची मदत शासनातर्फे देण्यात आली आहे.

विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे ११७ जनावरे दगावली. यामध्ये मोठी दुधाळ ५९ जनावरे, २८ लहान दुधाळ, तर ओढकाम करणारी २५ मोठी व १३ लहान जनावरांचा समावेश आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात एकूण २४ जनावरे नैसर्गिक आपत्तीत मृत पावली, अकोला जिल्ह्यात १०, यवतमाळ जिल्ह्यात ३५, बुलडाणा जिल्ह्यात ३४ व वाशीम जिल्ह्यात १३ जनावरांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणात एकूण १९.५७ लाखांची शासकीय मदत देण्यात आलेली आहे. या कालावधीत नदी-नाल्यांना पूर आल्याने तसेच शेतात पाणी साचल्याने ७,५३९ हेक्टरमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापैकी ४,०२२ हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक ४,१२३ हेक्टर क्षेत्र बुलडाणा, तर ३,३१९ हेक्टर क्षेत्र अकोला जिल्ह्यातील आहे.

 ३,९४४ घरांची, १०० गोठ्यांची पडझडपावसाळ्याच्या या अडीच महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागात ३,९४४ घरांची पडझड झाली. यासाठी ६.५७ लाखांचे सानुग्रह अनुदान बाधितांना देण्यात आले आहे. यामध्ये पूर्णत: पडझड झालेली २५३ घरांचा समावेश आहे. अंशत: ३६६७ व नष्ट झालेल्या झोपड्यांची संख्या १७ आहे. तसेच वाशीम वगळता अन्य चार जिल्ह्यांतील १०० गोठ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या व्यतिरिक्त २ सार्वजनिक मालमत्ता व ७९ खासगी मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.

टॅग्स :Natural Calamityनैसर्गिक आपत्ती