शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

४३ ग्रामपंचायतींना दलित वस्ती विकासासाठी वाटा

By admin | Updated: May 18, 2015 00:09 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींकरिता दलित वस्तीचा विकास ....

शासनाचे अनुदान : विकासाला मिळणार चालना अमरावती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने जिल्ह्यातील ४३ ग्रामपंचायतींकरिता दलित वस्तीचा विकास करण्यासाठी १४ मे रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सुमारे १ कोटी ५१ लाख रूपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. यामुळे वरील ग्रामपंचायतीमधील दलित वस्तीतील विविध विकासकामे मार्गी लागणार आहेत.सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करण्यासाठी योजना राबविण्यात येते. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासन निधी उपलब्ध करून देते. मात्र त्याशिवाय या वस्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने यंदाही राज्य शासनाने अमरावती जिल्ह्यासाठी सुमारे १ कोटी ५१ लाख रूपयांचा विशेष निधी मंजूर करून तो जिल्हा परिषद वित्त विभागाला उपलब्ध करून दिला आहे. राज्य शासनाने दलित वस्ती विकासासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत विशेष निधीसाठी सुमारे १ कोटी ९६ लाख रूपयांचा प्रस्ताव सादर केला होता. यापैकी राज्य शासनाने सुमारे दीड कोटी रूपये मंजूर केले आहे. या निधीमुळे विकासकामांना चालणार मिळणार आहे. प्राप्त निधीतून संबंधित ४३ ग्रामपंचायतींना विविध कामांसाठी प्राप्त प्रस्तावानुसार निधीचे वितरण केले जाणार आहे. सदर निधीतून रस्ता काँक्रीटीकरण, सभागृह, वालकंपाऊड, सौंदर्यीकरण, समाज मंदिर, स्मशानभूमीचा रस्ता आदी विकासकामे केली जाणार आहेत.या ग्रामपंचातींचा आहे समावेशराज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून ग्रामपंचायतींचा विकास होणार आहे. यामध्ये अचलपूरमधील कोल्हा, रासेगाव, येसुर्णा, मल्हारा, भुरडघाट, गौरखेडा, सावळी दातोरा, दर्यापूर तालुक्यातील खल्लार, कळाशी, भामोद, येवदा, वडनेर गंगाई, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कमालपूर, निमखेडबाजार, मुऱ्हा, पांढरी, कसबेगव्हाण, धारणी तालुक्यातील धारर्णी, सालई, गोडवाडी, धाराकोट, बैरागड, आकी, चिखलदरा तालुक्यातील सिमोरी, भंडोरा, चुर्णी, पलस्या, दहिंद्री, गांगरखेडा, काटकुंभ, वरूड तालुक्यातील आमनेर, खानापूर मेंढी, रोशनखेडा, सावंगी बेल, शहापूर, वघाळ, वाडेगाव, तिवसा घाट, मोर्शी तालुक्यातील आष्टगाव, खेड, भातकुली तालुक्यातील बुधागड, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील खिरसाणा या गावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने सुमारे १ कोटी ९६ लाख रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे विशेष निधीसाठी पाठविला होता. त्यापैकी जवळपास दीड कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे दलित वस्तीमधील विकासकामांना चालना मिळणार आहे.- सरिता मकेश्र्वर, सभापती समाजकल्याण समिती जिल्हा परिषद.सामाजिक न्याय विभागाने जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला विशेष सहाय्य निधी ग्रामपंचायतनिहाय सुमारे १ कोटी ५१ लाख रूपये उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबत लेखी पत्रसुद्धा प्राप्त झाले आहे.- भाऊराव चव्हाण,समाजकल्याण अधिकारी, जि.प.