शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:47 IST

त्या कारणाने यंदा विदर्भातही १० जूननंतर दमदार पावसाची आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला.

संदीप मानकरअमरावती- पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत जलसंपदा विभागाने घेतलेल्या २ जूनपर्यंतच्या अहवालानुसार सरासरी ४०.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्याकारणाने यंदा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा १ जून रोजी मान्सून केरळमध्ये पोहचला आणि स्थिरस्थावर झाला. त्या कारणाने यंदा विदर्भातही १० जूननंतर दमदार पावसाची आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी  मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया उर्ध्व वर्धा या मोठ्या प्रकल्पात  ४८.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३०.०२ टक्के, अरुणावती सर्वात कमी ९.७८ टक्के, बेंबळा प्रकल्पात सर्वाधिक ५४.९० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ४०.०५ टक्के, वान ४४.५५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ४९.३९ टक्के, पेनटाकळी ४१.८२ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात १६.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नऊ मोठ्या प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा १३९९.९१ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ५६५.१८ दलघमी असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली. २४ मध्यम प्रकल्पांत फक्त ३५ टक्केच पाणीसाठामोठ्या प्रकल्पाच्या तुलनेत २४ मध्यम प्रकल्पांत सरासरी फक्त ३५.२८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु पावसाळा दोन आठवड्यावर येऊन ठेपल्याने यंदा प्रकल्प  पुन्हा शंभर टक्के भरतील अशी अपेक्षा आहे. गत वर्षी बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्याकारणाने प्रकल्पातून रबीला सिंचनाकरिता पाणी देता आले. ४७७ लघु प्रकल्पांत मात्र २०.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक असून पाचही जिल्ह्यांतील एकूण ५११ प्रकल्पांत सरासरी ३२.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची नोंद सिंचन विभागाने घेतली आहे.