शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

पाण्यात ४० टक्के रासायनिक प्रदूषण

By admin | Updated: December 30, 2014 23:25 IST

जिल्ह्याभरातील पाणी स्त्रोत नमुन्यांच्या तपासणीत नायट्रेटची अधिक मात्रा आढळून आल्याने ४० टक्के पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तुरळक प्रमाणात फ्लोराईड,

वैभव बाबरेकर - अमरावतीजिल्ह्याभरातील पाणी स्त्रोत नमुन्यांच्या तपासणीत नायट्रेटची अधिक मात्रा आढळून आल्याने ४० टक्के पाणी रासायनिकदृष्ट्या दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तुरळक प्रमाणात फ्लोराईड, क्लोराईड, हार्डनेस, अल्कलिनिटी व टरबिरीटीसुद्धा असल्याने जिल्ह्यावासीयांच्या आरोग्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे. पाणी हे जीवनाचे अमूल्य घटक असून पाणी अशुध्दतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यात हजारो पाणी स्त्रोतातून सुमारे ३० लाख नागरिक पाणीपुरवठा होतो. मात्र, हे पाणी शुध्द असेल याची हमी देता येणार नाही. पाणी शुद्धतेसाठी केंद्र व राज्य सरकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यासाठी शासनाकडून पाणी तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्यात सुरु करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी निसर्गात होणाऱ्या बदलात पाणी स्त्रोतांची काय स्थिती आहे त्याकरिता शासनाकडून जिल्ह्यातील पाच ठिकाणी उपविभागीय प्रयोगशाळा सुरु आहेत. ग्रामीण भागात नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, मोर्शी, धारणी व अचलपूर येथे उपविभागीय प्रयोगशाळेत अनुजीव व रासायन तपासणी करण्यात येते. अमरावती शहरातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जून २०१३ ते एप्रिल २०१४ पर्यंत ५ हजार ४६ पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ३ हजार ७७३ नमुने दूषित आढळून आले आहे. हे प्रमाण ७४ टक्के आहे. या वर्षात २२०० पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्टे प्रयोगशाळेला आहे.