शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

४ हजार हेक्टर गहू बाधित

By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST

जिल्ह्यात १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४ हजार हेक्टरमधील ओंबीवर आलेला गहू भुईसपाट..

लोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यात १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४ हजार हेक्टरमधील ओंबीवर आलेला गहू भुईसपाट झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. या अन्वये बाधित क्षेत्रातील किमान ५० टक्के नुकसान गृहीत धरल्यास गहू पिकाचे ५ कोटी ४० लाखांवर नुकसान झाले. सोबत संत्रा, आंबा, कपाशी व भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वादळासह पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषी विभागाद्वारा पाहणी सुरू आहे, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कृषी विभागाद्वारा पाहणी सुरू नाही. अधिकारी व कर्मचारी हे जलयुक्त शिवार अभियानाच्या १३ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणाला व रात्री ‘गाव मुक्कामाला’ राहणार आहे. परिणामी अधिकारी व कर्मचाऱ्याची वानवा असल्यामुळे शेतीपीक नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले नाही, ही वस्तूस्थिती आहे. ओंबीवर आलेला गहू जमिनीवर पडल्याने बाधित क्षेत्रामधील गव्हाचा दाणा बारीक पडणार आहे. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर झाले. हरभऱ्याचे फारसे नुकसान नाही. या पावसाचा हरभऱ्याला फायदा होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. कापणीवर व मळणीवर आलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कापणी झालेल्या तुरीच्या गंजी ओल्या झाल्यात. वादळामुळे झाडावरील संत्रा फळे पडली आहे. आंब्या मोहोराचे व भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपानंतर रबीचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जिल्हाधिकारी करणार पाहणीवादळवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले. ओंबीवर आलेला गहू जमिनदोस्त झाला. संत्र्याची फळे पडली. या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी शनिवार १४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी किरण गित्ते करणार असल्याची माहिती आमदार अनिल बोंडे यांनी दिली.सर्वेक्षणास कर्मचाऱ्याअभावी खोळंबाजलयुक्त शिवार अभियानासाठी अन्य विभागासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची गुरूवारला बैठक, प्रशिक्षण व रात्री ‘गाव मुक्काम’ असल्याने हे कर्मचारी व्यस्त आहेत. परिणामी नुकसान क्षेत्राची पाहणी करण्यासाठी कर्मचारी नसल्याने सर्वेक्षणाचा खोळंबा झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यानापिकीचे सत्र सुरू आहे. मागील वर्षी अति पावसाने यंदा पावसाअभावी पीक उद्धवस्त झाले. रबीवर आशा असताना वादळवाऱ्यासह पावसाने गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे.