शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार हेक्टर गहू बाधित

By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST

जिल्ह्यात १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४ हजार हेक्टरमधील ओंबीवर आलेला गहू भुईसपाट..

लोकमत विशेषअमरावती : जिल्ह्यात १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४ हजार हेक्टरमधील ओंबीवर आलेला गहू भुईसपाट झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. या अन्वये बाधित क्षेत्रातील किमान ५० टक्के नुकसान गृहीत धरल्यास गहू पिकाचे ५ कोटी ४० लाखांवर नुकसान झाले. सोबत संत्रा, आंबा, कपाशी व भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वादळासह पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषी विभागाद्वारा पाहणी सुरू आहे, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कृषी विभागाद्वारा पाहणी सुरू नाही. अधिकारी व कर्मचारी हे जलयुक्त शिवार अभियानाच्या १३ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणाला व रात्री ‘गाव मुक्कामाला’ राहणार आहे. परिणामी अधिकारी व कर्मचाऱ्याची वानवा असल्यामुळे शेतीपीक नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले नाही, ही वस्तूस्थिती आहे. ओंबीवर आलेला गहू जमिनीवर पडल्याने बाधित क्षेत्रामधील गव्हाचा दाणा बारीक पडणार आहे. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर झाले. हरभऱ्याचे फारसे नुकसान नाही. या पावसाचा हरभऱ्याला फायदा होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. कापणीवर व मळणीवर आलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कापणी झालेल्या तुरीच्या गंजी ओल्या झाल्यात. वादळामुळे झाडावरील संत्रा फळे पडली आहे. आंब्या मोहोराचे व भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपानंतर रबीचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जिल्हाधिकारी करणार पाहणीवादळवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले. ओंबीवर आलेला गहू जमिनदोस्त झाला. संत्र्याची फळे पडली. या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी शनिवार १४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी किरण गित्ते करणार असल्याची माहिती आमदार अनिल बोंडे यांनी दिली.सर्वेक्षणास कर्मचाऱ्याअभावी खोळंबाजलयुक्त शिवार अभियानासाठी अन्य विभागासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची गुरूवारला बैठक, प्रशिक्षण व रात्री ‘गाव मुक्काम’ असल्याने हे कर्मचारी व्यस्त आहेत. परिणामी नुकसान क्षेत्राची पाहणी करण्यासाठी कर्मचारी नसल्याने सर्वेक्षणाचा खोळंबा झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यानापिकीचे सत्र सुरू आहे. मागील वर्षी अति पावसाने यंदा पावसाअभावी पीक उद्धवस्त झाले. रबीवर आशा असताना वादळवाऱ्यासह पावसाने गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे.