शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

१०० दिवसांत रबीचे चार टक्केच कर्जवाटप; पश्चिम विदर्भाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 16:48 IST

यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले.

अमरावती : यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले. विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणविणा-या जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेचे वाशीम वगळता चार जिल्ह्यांत रबीचे कर्जवाटप निरंक आहे. शेतमालास किमान हमीभावही नाही अन्  हंगामासाठी कर्जवाटपही नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाल्याचा थेट परिणाम रबी हंगामावर झाला. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा अमरावती विभागातील रबीचे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र नापेर राहिले. ज्या शेतक-यांजवळ संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, त्यांनादेखील बँका कर्ज नाकारत असल्याचे चित्र दुर्देवी आहे. अमरावती विभागात यंदाच्या रबी हंगामासाठी बँकांना ६९७ कोटी ९९ लाखांचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. त्या तुलनेत आतापर्यंत बँकांनी फक्त २,८९२ शेतक-यांना २९ कोटी ८६ लाखांचे कर्जवाटप केले, याची टक्केवारी केवळ ४ एवढी आहे.जिल्हा बँकांना यंदा १९० कोटी ५३ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत फक्त ५५० शेतक-यांना एक कोटी ४९ लाख ९२ हजारांचे कर्जवाटप केले. ही ०.७९ टक्केवारी आहे. शेतक-यांची म्हणविणारी जिल्हा बँक शेतक-यांनाच कशी नाडवते, हे त्याचे उदाहरण आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ४७० कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,१४३ शेतक-यांना ११ कोटी ६६ लाखांचे वाटप केले, तर ग्रामीण बँकांना ३४ कोटी ४३ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत फक्त वाशिम जिल्ह्यात ८८ शेतक-यांना ६२ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. शेतकरी बँकाचे उबंरठे झिजवीत असताना बँका कर्ज नाकारत असल्याची विभागाची शोकांतिका आहे.२.३० लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेतशासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. यासाठी विभागातील  नऊ लाख ७२ हजार १३७ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्या तुलनेत आतापर्यत जाहीर १३ ग्रीन लिस्ट मध्ये सात लाख ४१ हजार ६०२ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. यामध्ये जिल्हा बँकेच्या तीन लाख ९५ हजार ९१८ शेतकºयांचे १,७५८ कोटी ३६ लाखांचे तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या तीन लाख ४५ हजार ९८४ शेतक-यांचे १९९६ कोटी २५ लाखांचे कर्ज माफ झाले. अद्याप दोन लाख ३० हजार ५३५ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी