शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

१०० दिवसांत रबीचे चार टक्केच कर्जवाटप; पश्चिम विदर्भाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 16:48 IST

यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले.

अमरावती : यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले. विशेष म्हणजे शेतक-यांची म्हणविणा-या जिल्हा बँकेसह ग्रामीण बँकेचे वाशीम वगळता चार जिल्ह्यांत रबीचे कर्जवाटप निरंक आहे. शेतमालास किमान हमीभावही नाही अन्  हंगामासाठी कर्जवाटपही नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.अत्यल्प पावसामुळे खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झाल्याचा थेट परिणाम रबी हंगामावर झाला. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा अमरावती विभागातील रबीचे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र नापेर राहिले. ज्या शेतक-यांजवळ संरक्षित सिंचनाची सुविधा आहे, त्यांनादेखील बँका कर्ज नाकारत असल्याचे चित्र दुर्देवी आहे. अमरावती विभागात यंदाच्या रबी हंगामासाठी बँकांना ६९७ कोटी ९९ लाखांचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले. त्या तुलनेत आतापर्यंत बँकांनी फक्त २,८९२ शेतक-यांना २९ कोटी ८६ लाखांचे कर्जवाटप केले, याची टक्केवारी केवळ ४ एवढी आहे.जिल्हा बँकांना यंदा १९० कोटी ५३ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत फक्त ५५० शेतक-यांना एक कोटी ४९ लाख ९२ हजारांचे कर्जवाटप केले. ही ०.७९ टक्केवारी आहे. शेतक-यांची म्हणविणारी जिल्हा बँक शेतक-यांनाच कशी नाडवते, हे त्याचे उदाहरण आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ४७० कोटींचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत १,१४३ शेतक-यांना ११ कोटी ६६ लाखांचे वाटप केले, तर ग्रामीण बँकांना ३४ कोटी ४३ लाखांचे लक्ष्यांक असताना सद्यस्थितीत फक्त वाशिम जिल्ह्यात ८८ शेतक-यांना ६२ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. शेतकरी बँकाचे उबंरठे झिजवीत असताना बँका कर्ज नाकारत असल्याची विभागाची शोकांतिका आहे.२.३० लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेतशासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. यासाठी विभागातील  नऊ लाख ७२ हजार १३७ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले. त्या तुलनेत आतापर्यत जाहीर १३ ग्रीन लिस्ट मध्ये सात लाख ४१ हजार ६०२ शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. यामध्ये जिल्हा बँकेच्या तीन लाख ९५ हजार ९१८ शेतकºयांचे १,७५८ कोटी ३६ लाखांचे तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या तीन लाख ४५ हजार ९८४ शेतक-यांचे १९९६ कोटी २५ लाखांचे कर्ज माफ झाले. अद्याप दोन लाख ३० हजार ५३५ शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी