शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

१५८८ गावांत ४ लाख ५६ हजार ६२१ होणार कार्यात्मक नळजोळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST

अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यील १५८८ गावांत ४ लाख ५६ हजार ६२१ कार्यात्मक नळजोडणी ...

अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यील १५८८ गावांत ४ लाख ५६ हजार ६२१ कार्यात्मक नळजोडणी होणार असून, उद्दिष्ट विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई प्रतिदिन किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५८८ गावांसाठी एकूण ४ लाख ५६ हजार ६२१ कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावाला नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन पाणीटंचाईचा प्रश्न सोडविता येईल, याविषयी लक्ष वेधण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत गावांत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. सावळकर आदी उपस्थित होते.

--------------

मार्च २०२२ पर्यंत योजना पूर्ण करावी लागेल

स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिल्यावर योजना पूर्ण करण्यास जास्तीत जास्त १८ महिने ३६ महिन्यांचा कालावधी आहे. मिशन अंतर्गत योजनांचे कार्यारंभ आदेश मार्च २०२२ पूर्वी देण्यात यावेत. त्यानंतर कार्यारंभ आदेश देता येणार नाही. चांदूर बाजार तालुक्यात १९ गावे पाणीपुरवठा योजना, अचलपूर व चांदूर बाजारसाठी २४ गावे, चांदूर बाजार, अमरावती, भातकुली व अचलपूर१०५ गावे, अमरावती नांदगाव पेठ ३३ गावे, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर १४४ गावे, चिखलदरा तालुक्यात गौरखेडा बाजार ३५ गावे, शहापूर ३ गावे, मोर्शी तालुक्यात ७० गावे पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण केली जाणार आहे

---------------------------

सारांक्ष बातमी घेणे

मृत वारसांना धनादेश प्रदान

बैठकीत टाकरखेडा शंभू येथील वीज पडून व पुरात वाहून मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह निधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी अपघाती निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.