शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

१५८८ गावांत ४ लाख ५६ हजार ६२१ होणार कार्यात्मक नळजोळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST

अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यील १५८८ गावांत ४ लाख ५६ हजार ६२१ कार्यात्मक नळजोडणी ...

अमरावती : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यील १५८८ गावांत ४ लाख ५६ हजार ६२१ कार्यात्मक नळजोडणी होणार असून, उद्दिष्ट विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले.

केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई प्रतिदिन किमान ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५८८ गावांसाठी एकूण ४ लाख ५६ हजार ६२१ कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावाला नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन पाणीटंचाईचा प्रश्न सोडविता येईल, याविषयी लक्ष वेधण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत गावांत होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. आमदार देवेंद्र भुयार, आमदार बळवंत वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.डी. सावळकर आदी उपस्थित होते.

--------------

मार्च २०२२ पर्यंत योजना पूर्ण करावी लागेल

स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना कार्यारंभ आदेश दिल्यावर योजना पूर्ण करण्यास जास्तीत जास्त १८ महिने ३६ महिन्यांचा कालावधी आहे. मिशन अंतर्गत योजनांचे कार्यारंभ आदेश मार्च २०२२ पूर्वी देण्यात यावेत. त्यानंतर कार्यारंभ आदेश देता येणार नाही. चांदूर बाजार तालुक्यात १९ गावे पाणीपुरवठा योजना, अचलपूर व चांदूर बाजारसाठी २४ गावे, चांदूर बाजार, अमरावती, भातकुली व अचलपूर१०५ गावे, अमरावती नांदगाव पेठ ३३ गावे, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर १४४ गावे, चिखलदरा तालुक्यात गौरखेडा बाजार ३५ गावे, शहापूर ३ गावे, मोर्शी तालुक्यात ७० गावे पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण केली जाणार आहे

---------------------------

सारांक्ष बातमी घेणे

मृत वारसांना धनादेश प्रदान

बैठकीत टाकरखेडा शंभू येथील वीज पडून व पुरात वाहून मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते सानुग्रह निधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी अपघाती निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.