शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

३,७७८ उमेदवार अपात्र!; निवडणूक खर्च, जातवैधता प्रमाणपत्र सादर नाही

By admin | Updated: February 16, 2016 23:57 IST

जिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे ..

गजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे व विजयी उमेदवारांनी सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, अशा ३ हजार ७७८ उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाकडे विहित मुदतीत हे सादर न केल्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमान्वये अपात्रतेची कारवाई होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा, खर्च सादर करण्याचा कालावधी आणि पद्धतीचा वापर केला जातो. आयोगाच्या ७ फेब्रुवारी १९९५ च्या आदेशांनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा ग्रापंच्या उमेदवारांना पाच वर्षांकरिता अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. ही कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना ५ जून २०१० व १९ नोव्हेंबर २०१० च्या आदेशाप्रमाणे सक्षम अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाने प्रदान केले आहेत.प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखलअमरावती : जिल्ह्यात मागील वर्षी ५५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व १९६ पोटनिवडणुका पार पडल्यात. यामध्ये १० हजार ८३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली. यापैकी ८ हजार ७३ उमेदवारांनी निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर केला. मात्र, २ हजार ७५९ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम व आयोगाच्या आदेशान्वये अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक प्रकरणेजातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांची सर्वाधिक १६८ संख्या नांदगाव तालुक्यातील आहे. वरुड १३२, मोर्शी १०७, धामणगाव १४७, अमरावती २७, भातकुली २१, चांदूररेल्वे ५९, तिवसा १२, मोर्शी ४६, अचलपूर ७, दर्यापूर २९८, अंजनगाव ४९, चिखलदरा १२ व धारणी येथील ५५ अशी उमेदवारांची संख्या आहे. खर्च सादर नसलेल्या प्रकरणांची सद्यस्थिती मे ते जुलै २०१५ मध्ये मुदती संपणाऱ्या ५८१ ग्रा.पं.च्या निवडणुकीत २ हजार ६०२ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ मध्ये मुदती संपणाऱ्या १११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १३३ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मुदती संपणाऱ्या ५८ ग्रा. पं. च्या निवडणूकीत २४ उमेदवारांनी अद्याप खर्च सादर केला नाही.८ तालुक्यातील १,४७२ प्रकरणे आदेशाच्या प्रक्रियेत मागील वर्षी म्हणजे सन २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व विहित मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या ८ तालुक्यांमधील १,४७२ प्रकरणांत सुनावणी होऊन प्रकरणे आदेशासाठी ठेवण्यात आली आहेत. उर्वरित १,२८७ प्रकरणे पंजीबद्ध करण्यात आली असून कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालायातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विभागाने सांगितले. असा आहे अधिनियम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक संपल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे अनिवार्य आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ (अ) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या राखीव प्रभागातील विजयी उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. १,०९९ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र अप्राप्त जिल्ह्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापूर्वी एप्रिल २०१५ मधील निवडणुकीतील विजयी उमेदवारांपैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या १०१९ उमेदवारांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासन कारवाई करीत आहे.