शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

३,७७८ उमेदवार अपात्र!; निवडणूक खर्च, जातवैधता प्रमाणपत्र सादर नाही

By admin | Updated: February 16, 2016 23:57 IST

जिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे ..

गजानन मोहोड अमरावतीजिल्ह्यात सन २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर करणे व विजयी उमेदवारांनी सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, अशा ३ हजार ७७८ उमेदवारांनी सक्षम प्राधिकरणाकडे विहित मुदतीत हे सादर न केल्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियमान्वये अपात्रतेची कारवाई होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा, खर्च सादर करण्याचा कालावधी आणि पद्धतीचा वापर केला जातो. आयोगाच्या ७ फेब्रुवारी १९९५ च्या आदेशांनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणुकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा ग्रापंच्या उमेदवारांना पाच वर्षांकरिता अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. ही कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना ५ जून २०१० व १९ नोव्हेंबर २०१० च्या आदेशाप्रमाणे सक्षम अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाने प्रदान केले आहेत.प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखलअमरावती : जिल्ह्यात मागील वर्षी ५५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व १९६ पोटनिवडणुका पार पडल्यात. यामध्ये १० हजार ८३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली. यापैकी ८ हजार ७३ उमेदवारांनी निवडणूक खर्च विहित मुदतीत सादर केला. मात्र, २ हजार ७५९ उमेदवारांनी विहित मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम व आयोगाच्या आदेशान्वये अपात्रतेची कारवाई करण्यासाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक प्रकरणेजातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांची सर्वाधिक १६८ संख्या नांदगाव तालुक्यातील आहे. वरुड १३२, मोर्शी १०७, धामणगाव १४७, अमरावती २७, भातकुली २१, चांदूररेल्वे ५९, तिवसा १२, मोर्शी ४६, अचलपूर ७, दर्यापूर २९८, अंजनगाव ४९, चिखलदरा १२ व धारणी येथील ५५ अशी उमेदवारांची संख्या आहे. खर्च सादर नसलेल्या प्रकरणांची सद्यस्थिती मे ते जुलै २०१५ मध्ये मुदती संपणाऱ्या ५८१ ग्रा.पं.च्या निवडणुकीत २ हजार ६०२ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ मध्ये मुदती संपणाऱ्या १११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १३३ उमेदवारांनी विहित मुदतीत खर्च सादर केला नाही. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये मुदती संपणाऱ्या ५८ ग्रा. पं. च्या निवडणूकीत २४ उमेदवारांनी अद्याप खर्च सादर केला नाही.८ तालुक्यातील १,४७२ प्रकरणे आदेशाच्या प्रक्रियेत मागील वर्षी म्हणजे सन २०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व विहित मुदतीत खर्च सादर न करणाऱ्या ८ तालुक्यांमधील १,४७२ प्रकरणांत सुनावणी होऊन प्रकरणे आदेशासाठी ठेवण्यात आली आहेत. उर्वरित १,२८७ प्रकरणे पंजीबद्ध करण्यात आली असून कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालायातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक विभागाने सांगितले. असा आहे अधिनियम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (ब) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक संपल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर करणे अनिवार्य आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१ (अ) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या राखीव प्रभागातील विजयी उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. १,०९९ उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र अप्राप्त जिल्ह्यात नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतींच्या राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जातवैधता प्रमाणपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापूर्वी एप्रिल २०१५ मधील निवडणुकीतील विजयी उमेदवारांपैकी जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या १०१९ उमेदवारांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासन कारवाई करीत आहे.