शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

३.७३ लाख हेक्टर बाधित, २५४ कोटींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:01 IST

यंदाच्या खरिपातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या सोंगणी व मळणीचा हंगाम सुरू असताना दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास पळविला. सोंगणी केलेले सोयाबीन शेतातच सडले. ज्या शेतात सोंगणी व्हायची होती, त्या शेतातील उभे सोयाबीन जागीच सडले. गंजीमधील सोयाबीनच्या शेंगांना बीजे फुटली.

ठळक मुद्देपंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल : ३.७५ लाख शेतकऱ्यांना फटका, २.१२ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनचे नुकसान

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने खरिपासोबतच ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा ३ लाख ७५ हजार ३९८ शेतकऱ्यांना फटका बसला. या आपत्तीसाठी शेतकऱ्यांना एनडीआरएफची मदत मिळण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने २५४ कोटी ४० लाख ४३ हजार ४८४ रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे.यंदाच्या खरिपातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या सोंगणी व मळणीचा हंगाम सुरू असताना दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. सोंगणी केलेले सोयाबीन शेतातच सडले. ज्या शेतात सोंगणी व्हायची होती, त्या शेतातील उभे सोयाबीन जागीच सडले. गंजीमधील सोयाबीनच्या शेंगांना बीजे फुटली. दाण्यांवर बुरशी आल्याने प्रतवारी खराब झाली, कपाशीचे बोंडे दहा दिवसांच्या पावसामुळे सडली. कापूस ओला झाला. सरकीला बीजांकुर फुटले. ज्वारीची कणसे काळी पडली, कणसामधील दाण्यांना कोंब फुटले, या नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण व संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ आॅक्टोबर रोजी दिले. यासाठी ६ नोव्हेंबर डेडलाइन देण्यात आली. मात्र, नुकसानाची तीव्रता पाहता, पंचनाम्याला तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. अखेर ११ नोव्हेंबरला संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली व याबाबतचा संयुक्त अहवाल सोमवारी रात्री उशिरा शासनाला पाठविण्यात आला. यामध्ये ९४ टक्के शेतकºयांच्या पिकांचे ७८ टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, खरिपाचे ३ लाख ७३ हजार १९ हेक्टर क्षेत्रात ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. हे नुकसान एनडीआरएफच्या निकषानुसार शासन मदतीस पात्र आहे. यासाठी दोन हेक्टर मर्यादेत ६८०० रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे २५३ कोटी ६५ लाख ३५ हजार ८६४ रुपयांचा अपेक्षित निधी लागणार आहे. अवकाळी पावसामुळे २,१२,३२९.४४ हेक्टरवरील सोयाबीन, १,३५,४७२.७० हेक्टरवरील कपाशी, ११,०३६.९७ हेक्टरवरील ज्वारी, २,७०६.२३ हेक्टरवरील तूर, ५०६३ हेक्टरवरील मका, ५,५३८ हेक्टरवरील धान, १२६ हेक्टरवरील उडीद व ७४७ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.‘एनडीएरएफ’च्या निकषानुसार दोन हेक्टर क्षेत्रमर्यादेत जिरायती शेतीला ६८०० रुपये, बागायती पिकांना १३ हजार ५०० रुपये व बहुवार्र्षिक पिकांना १८००० रुपये प्रतिहेक्टर या प्रमाणात मदत मिळू शकते. यासाठी अपेक्षित निधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविलेला आहे.२,६५,०८३ हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार फक्त दोन हेक्टर क्षेत्र मदतीस पात्र राहणार आहे. त्यामुळे जिरायतीच्या एकूण बाधित क्षेत्राच्या २ लाख ६५ हजार ८३ हेक्टर क्षेत्राला ही मदत मिळणार आहे. याव्यतिरिक्त नुकसान झालेले १ लाख ७ हजार ९६६ हेक्टर क्षेत्र हे दोन हेक्टर मर्यादेहून जास्त असल्याने मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बागायती पिकांमध्ये दोन हेक्टरखालील ३८६ हेक्टर क्षेत्रासाठी मदत मिळू शकते. मात्र, ६५ हेक्टर क्षेत्राला शासन मिळणार नाही. बहुवार्षीक फळपिकांमध्ये ४५ हेक्टरसाठी शासन मदत मिळण्याची शक्यात आहे, तर ३३ हेक्टरमध्ये शासन मदत मिळणार नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती