शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती महापालिकेच्या डोक्यावर ३६० कोटींच्या थकबाकीचा डोंगर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 11:41 IST

दरमहिन्याला होऊ लागली वाढ : कंत्राटदारांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासन घायाळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरपालिकेचे एकूण दायित्व तब्बल ३६० कोटींच्या घरात पोहोचले आहे. ते मार्च २०२४ मध्ये ३२६.६२ कोटी होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांतदेखील पुरेशी थकबाकी वा देयके दिली न गेल्याने जूनअखेर त्यात ३४ ते ३५ कोटींची भर पडली आहे. अर्थात मनपा प्रशासनाकडे तब्बल ३६० कोटी रुपये थकले आहेत.

सुमारे ३६० कोटी रुपयांपैकी तब्बल १०१ कोटी रुपये प्रशासनाला महापालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, निवृत्तांना त्यांच्या वेतनासह सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम द्यायची आहे. तर महावितरण, मजीप्राची ४४ कोटी रुपये द्यायचे आहेत. मनपाच्या स्वउत्पन्नाला आलेली मर्यादा, रखडलेला शासननिधी व आस्थापना खर्चात झालेली वाढ दायित्वात भर घालणारी ठरली आहे.

असे आहे दायित्वकार्यरत, निवृत्त अधिकारी कर्मचारी वेतन, थकबाकी ७४.११ कोटीसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान, अर्जित रजा : १९. ६५ कोटी डीसीपीएस योजनेतील महापालिकेचा हिस्सा : ७.०६ कोटीएनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड : २८.०८ कोटीविद्युत व पाणीपुरवठा देयक : ४४ कोटीस्वच्छता, बांधकाम कंत्राटदार, पुरवठादार : ४३ कोटीअकोली भूसंपादन : ४१.५८ कोटीपाणीपुरवठा निर्भय योजना : ४९.८८ कोटीपाणीपुरवठा टप्पा क्रमांक २: ८.५२ कोटी रुपये

जुन्या स्वच्छता कंत्राटदारांकडून आंदोलनमार्च २०२४ पर्यंत जुन्या स्वच्छता कंत्राटदारांचे सुमारे १६ कोटी रुपये मनपाकडे थकीत आहेत. जूनपर्यंत त्यातदेखील वाढ झाली आहे. जुने स्वच्छता कंत्राट जानेवारी २०२४ मध्ये संपुष्टात आले असताना त्यांनी निविदा भरतेवेळी जमा केलेली १०.५० कोटी रुपये सुरक्षा ठेव त्यांना परत करण्यात आलेली नाही. ती रक्कम कुठे खर्चिली गेली, त्याचा हिशेब प्रशासनाकडे नाही. थकीत देयके व एसडीसाठी जुने स्वच्छता कंत्राटदार वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत.

बांधकाम कंत्राटदारांचे २५ कोटी थकलेबांधकाम कंत्राटदारांचे देखील सुमारे २५ कोटी २३ लाख २० हजार ६०० रुपये महापालिकेकडे थकीत आहेत, तर दोन कोटी रुपये पुरवठादारांचे थकले आहेत. ही मार्च २०२४ ची आकडेवारी असून त्यात तीन महिन्यांनंतर मोठी वाढ झाली आहे.

मजीप्रा, महावितरणचे ४४ कोटी रुपये थकीतमनपाकडे मजीप्राचे अर्थात पाणीपुरवठ्याचे १३ कोटी रुपयांची देयके थकली आहेत. तर दुसरीकडे महावितरणची तब्बल ३१ कोटी कोटी रुपयांची रुपयांची देयके महापालिका प्रशासन देऊ शकली नाही. महावितरणने एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित केला की, एक- दोन कोटी रुपये देऊन वेळ मारून नेली जाते. महावितरणने यापूर्वीदेखील शहरातील विद्युत पुरवठा अनेकदा देयक न भरल्याने खंडित केला आहे. महावितरण वारंवार थकीत देयकासाठी नोटीस पाठवित असते.

"मार्च २०२४ पर्यंत महापालिकेवर एकूण ३२६ कोटी ६२ लाख रुपयांचे दायित्व होते. १५ व्या वित्त आयोगाचा निधी न आल्याने अनेक देयके थांबली. त्यामुळे जूनअखेर एकूण दायित्वात काही कोटींनी वाढ झाली आहे. त्यातील १०० कोटी रुपये कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांना देय आहेत."- डॉ. हेमंत ठाकरे, मुख्य लेखा अधिकारी 

टॅग्स :Amravatiअमरावती