शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अमरावती महापालिकेच्या डोक्यावर ३६० कोटींच्या थकबाकीचा डोंगर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 11:41 IST

दरमहिन्याला होऊ लागली वाढ : कंत्राटदारांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासन घायाळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महानगरपालिकेचे एकूण दायित्व तब्बल ३६० कोटींच्या घरात पोहोचले आहे. ते मार्च २०२४ मध्ये ३२६.६२ कोटी होते. मात्र, गेल्या तीन महिन्यांतदेखील पुरेशी थकबाकी वा देयके दिली न गेल्याने जूनअखेर त्यात ३४ ते ३५ कोटींची भर पडली आहे. अर्थात मनपा प्रशासनाकडे तब्बल ३६० कोटी रुपये थकले आहेत.

सुमारे ३६० कोटी रुपयांपैकी तब्बल १०१ कोटी रुपये प्रशासनाला महापालिकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, निवृत्तांना त्यांच्या वेतनासह सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम द्यायची आहे. तर महावितरण, मजीप्राची ४४ कोटी रुपये द्यायचे आहेत. मनपाच्या स्वउत्पन्नाला आलेली मर्यादा, रखडलेला शासननिधी व आस्थापना खर्चात झालेली वाढ दायित्वात भर घालणारी ठरली आहे.

असे आहे दायित्वकार्यरत, निवृत्त अधिकारी कर्मचारी वेतन, थकबाकी ७४.११ कोटीसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान, अर्जित रजा : १९. ६५ कोटी डीसीपीएस योजनेतील महापालिकेचा हिस्सा : ७.०६ कोटीएनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड : २८.०८ कोटीविद्युत व पाणीपुरवठा देयक : ४४ कोटीस्वच्छता, बांधकाम कंत्राटदार, पुरवठादार : ४३ कोटीअकोली भूसंपादन : ४१.५८ कोटीपाणीपुरवठा निर्भय योजना : ४९.८८ कोटीपाणीपुरवठा टप्पा क्रमांक २: ८.५२ कोटी रुपये

जुन्या स्वच्छता कंत्राटदारांकडून आंदोलनमार्च २०२४ पर्यंत जुन्या स्वच्छता कंत्राटदारांचे सुमारे १६ कोटी रुपये मनपाकडे थकीत आहेत. जूनपर्यंत त्यातदेखील वाढ झाली आहे. जुने स्वच्छता कंत्राट जानेवारी २०२४ मध्ये संपुष्टात आले असताना त्यांनी निविदा भरतेवेळी जमा केलेली १०.५० कोटी रुपये सुरक्षा ठेव त्यांना परत करण्यात आलेली नाही. ती रक्कम कुठे खर्चिली गेली, त्याचा हिशेब प्रशासनाकडे नाही. थकीत देयके व एसडीसाठी जुने स्वच्छता कंत्राटदार वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत.

बांधकाम कंत्राटदारांचे २५ कोटी थकलेबांधकाम कंत्राटदारांचे देखील सुमारे २५ कोटी २३ लाख २० हजार ६०० रुपये महापालिकेकडे थकीत आहेत, तर दोन कोटी रुपये पुरवठादारांचे थकले आहेत. ही मार्च २०२४ ची आकडेवारी असून त्यात तीन महिन्यांनंतर मोठी वाढ झाली आहे.

मजीप्रा, महावितरणचे ४४ कोटी रुपये थकीतमनपाकडे मजीप्राचे अर्थात पाणीपुरवठ्याचे १३ कोटी रुपयांची देयके थकली आहेत. तर दुसरीकडे महावितरणची तब्बल ३१ कोटी कोटी रुपयांची रुपयांची देयके महापालिका प्रशासन देऊ शकली नाही. महावितरणने एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित केला की, एक- दोन कोटी रुपये देऊन वेळ मारून नेली जाते. महावितरणने यापूर्वीदेखील शहरातील विद्युत पुरवठा अनेकदा देयक न भरल्याने खंडित केला आहे. महावितरण वारंवार थकीत देयकासाठी नोटीस पाठवित असते.

"मार्च २०२४ पर्यंत महापालिकेवर एकूण ३२६ कोटी ६२ लाख रुपयांचे दायित्व होते. १५ व्या वित्त आयोगाचा निधी न आल्याने अनेक देयके थांबली. त्यामुळे जूनअखेर एकूण दायित्वात काही कोटींनी वाढ झाली आहे. त्यातील १०० कोटी रुपये कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांना देय आहेत."- डॉ. हेमंत ठाकरे, मुख्य लेखा अधिकारी 

टॅग्स :Amravatiअमरावती