शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

३६ कोटींचे व्याज शासन भरणार

By admin | Updated: May 12, 2016 00:07 IST

शासनाने २९ जुलै २०१५ च्या आदेशान्वये सन २०१४-१५ च्या पुनर्गठन केलेल्या ३,५०३ कोटी खरीप पीककर्जापैकी ....

जून २०१६ चा देय हप्ता : पुनर्गठनाच्या पहिल्या हप्त्याला एक वर्षाची मुदतवाढगजानन मोहोड अमरावतीशासनाने २९ जुलै २०१५ च्या आदेशान्वये सन २०१४-१५ च्या पुनर्गठन केलेल्या ३,५०३ कोटी खरीप पीककर्जापैकी जून २०१६ देय असलेल्या पहिल्या वार्षिक हप्त्याच्या ७०० कोटींपैकी थकीत ३०० कोटींची परतफेड करण्यास १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे. व्याजाची ३६ कोटींची रक्कम शासनामार्फत बँकांकडे भरणा करण्यात येणार आहे. मूळ पुनर्गठनाच्या कालावधीतही एक वर्षाची वाढ करण्याचा निर्णय शासनाने ९ मे रोजी घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सन २०१५-१६ या वर्षातील खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार ७४७ व दुसऱ्या टप्प्यातील ११ हजार ८६२ अशा एकूण २७,६०९ गावांतील शेतकऱ्यांच्या सुमारे ५ हजार कोटी रुपयांच्या पीककर्जाचे २९ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार पुनर्गठन करण्यात येणार आहे. पीककर्जाचे प्रथम वर्षाचे संपूर्ण व्याज व दुसऱ्या वर्षापासून चार वर्षाचे म्हणजेच २०१७ ते २०२१ वर्षाचे ६ टक्के दराने व्याज शासन भरणार आहे. शासनाने १० मार्च २०१६ च्या निर्णयान्वये सहकार विभागाशी संबंधित शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती व सहकारी कर्जाच्या पुनर्गठनाच्या उपाययोजना ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांसाठी घेतल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन सन २०१५-१६ या वर्षातील पीककर्जाचे पाच वर्षाच्या कालावधीसाठी व्याजासहित पुनर्गठन करण्याबाबत ११ मार्च, २६ एप्रिलच्या परिपत्रकानुसार सर्व सहकारी, व्यापारी बँकांना निर्देश दिले आहेत. खरीप २०१४ हंगामामध्ये कर्ज घेणाऱ्या व खरीप २०१५ मध्ये नुकसान झालेले शेतकरी जून २०१६ मध्ये देय पहिला हप्ता बँकांना अदा करु शकणार नाहीत.या शेतकऱ्यांना २०१६-१७ या वर्षात कर्जपुरवठा होण्याच्या दृष्टीने शासनाचा हा निर्णय दिलासा देणारा ठरणारा आहे. पीककर्जाचा पहिला हप्ता जून २०१७ मध्ये देयसहकार आयुक्तांनी शासनाला सादर अहवालानुसार राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांमार्फत टंचाईग्रस्त भागातील पाच हजार कोटी रुपयांच्या अल्पमुदती कर्जाचे पुनर्गठन होण्याची शक्यता आहे. तथापि या रकमेत वाढ होण्याची शक्यता असून या कर्जाची परतफेड सन २०१६-१७ या वर्षापासून पाच वर्षांत करायची असल्याने या कर्जाचा पहिला हप्ता जून २०१७ मध्ये देय होणार आहे. खरीप २०१५ मधील पुनर्गठनास पात्र शेतकऱ्यांना लाभखरीप २०१५ मध्ये १ लाख ७८ लाख ४७६ शेतकऱ्यांना १४२३ कोटी ५८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले होते. यापैकी ७१ हजार ६०७ शेतकऱ्यांनी ६७५ कोटी ८३ लाखांचा भरणा केला आहे. यामध्ये १ लाख ६ हजार ८६९ शेतकऱ्यांचे ७४८ कोटी रुपयांचे कर्ज पुनर्गठनास पात्र होते. यापैकी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज पुनर्गठनाचा लाभ घेतला त्यांचा पहिला हप्ता जून २०१६ देय होता. त्या शेतकऱ्यांना या व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. मागील वर्षीच्या शेतकरी सभासदांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यांचा परतफेडीचा पहिला हप्ता जून २०१६ मध्ये देय होता. या हप्त्याला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली व पहिल्या हप्त्याचे व्याज शासन भरणार आहे. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)