शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

आंतरजातीय विवाह करणारी ३५१ जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:14 IST

अमरावती : सामाजिक समतेचा संदेश, जाती, जातींमधील विषमतेची दरी कमी करण्यासाठी शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाजकल्याण ...

अमरावती : सामाजिक समतेचा संदेश, जाती, जातींमधील विषमतेची दरी कमी करण्यासाठी शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविली जाते. याअंतर्गत ५० हजारांचे अर्थसहाय दिले जाते. त्यानुसार जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे २०-१९ ते २०२१ या कालावधीत ३५१ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, यात अर्थसहायासाठी शासनाकडून दीड वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्याने ही ही जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

सामाजिक न्याय विभागाकडून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविली जाते. या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी आदी मागास प्रवर्गातील, तर दुसरी व्यक्ती इतर मागास प्रवर्गातील किंवा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसोबत विवाहबद्ध झाल्यास त्या जोडप्यांना ५० हजारांचे अर्थसहाय दिले जाते. याकरिता झेडपी समाजकल्याण विभागाकडे सन २०१९-२० मध्ये २२२ आणि २०-२१ मध्ये १२९ प्रस्ताव अर्थसहाय्यासाठी दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या योजनेसाठी शासनाकडून मागील दीड वर्षापासून समाजकल्याण विभागाला निधी उपलब्ध करून दिलेला नाही. परिणामी आंतरजातीय जोडपे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु निधी नसल्याने अर्थसहाय कधी मिळणार याकरिता दररोज पात्र लाभार्थी समाजकल्याण विभागात चौकशीकरिता येत आहेत. परंतु निधीअभावी यंत्रणाही लाभार्थ्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरत आहे.

बॉक्स

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रूपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रूपयांचे अनुदान मिळते.

बॉक्स

केंद्र व राज्याकडून अनुदान

या योजनेअंतर्गत जोडप्यांना अनुदान देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के वाटा असतो.५० टक्याच्या हिस्यानुसार केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मागणीनुसार निधी उपलब्ध करून देत असते.सन २०१९-२० मध्ये योजनेसाठी अनुदान मिळाले होते. त्यानंतर मात्र अदयापर्यतही अनुदान अप्राप्त आहे.

बॉक्स

तीन वर्षात झालेले आंतरजातीय विवाह

५२८

जोडप्यांना मिळालेली मदत

०००

कोट

आंतरजातीय विवाहित जोडप्यांचे गत दोन वर्षांत ३५१ प्रस्ताव पाप्त झाले. त्याअनुषंगाने अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. निधीसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. निधी उपलब्ध होताचा लाभार्थांच्या वितरीत केला जाईल.

- सुधीर जिरापुरे,

समाजकल्याण अधिकारी