शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आंतरजातीय विवाह करणारी ३५१ जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:14 IST

अमरावती : सामाजिक समतेचा संदेश, जाती, जातींमधील विषमतेची दरी कमी करण्यासाठी शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाजकल्याण ...

अमरावती : सामाजिक समतेचा संदेश, जाती, जातींमधील विषमतेची दरी कमी करण्यासाठी शासनाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविली जाते. याअंतर्गत ५० हजारांचे अर्थसहाय दिले जाते. त्यानुसार जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे २०-१९ ते २०२१ या कालावधीत ३५१ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, यात अर्थसहायासाठी शासनाकडून दीड वर्षांपासून निधीच उपलब्ध होत नसल्याने ही ही जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

सामाजिक न्याय विभागाकडून आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना राबविली जाते. या योजनेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी आदी मागास प्रवर्गातील, तर दुसरी व्यक्ती इतर मागास प्रवर्गातील किंवा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसोबत विवाहबद्ध झाल्यास त्या जोडप्यांना ५० हजारांचे अर्थसहाय दिले जाते. याकरिता झेडपी समाजकल्याण विभागाकडे सन २०१९-२० मध्ये २२२ आणि २०-२१ मध्ये १२९ प्रस्ताव अर्थसहाय्यासाठी दाखल करण्यात आले आहेत. मात्र, या योजनेसाठी शासनाकडून मागील दीड वर्षापासून समाजकल्याण विभागाला निधी उपलब्ध करून दिलेला नाही. परिणामी आंतरजातीय जोडपे अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु निधी नसल्याने अर्थसहाय कधी मिळणार याकरिता दररोज पात्र लाभार्थी समाजकल्याण विभागात चौकशीकरिता येत आहेत. परंतु निधीअभावी यंत्रणाही लाभार्थ्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरत आहे.

बॉक्स

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० पूर्वी आंतरजातीय विवाह झाला असल्यास १५ हजार रूपये आणि त्यानंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रूपयांचे अनुदान मिळते.

बॉक्स

केंद्र व राज्याकडून अनुदान

या योजनेअंतर्गत जोडप्यांना अनुदान देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के वाटा असतो.५० टक्याच्या हिस्यानुसार केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला मागणीनुसार निधी उपलब्ध करून देत असते.सन २०१९-२० मध्ये योजनेसाठी अनुदान मिळाले होते. त्यानंतर मात्र अदयापर्यतही अनुदान अप्राप्त आहे.

बॉक्स

तीन वर्षात झालेले आंतरजातीय विवाह

५२८

जोडप्यांना मिळालेली मदत

०००

कोट

आंतरजातीय विवाहित जोडप्यांचे गत दोन वर्षांत ३५१ प्रस्ताव पाप्त झाले. त्याअनुषंगाने अद्याप शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. निधीसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. निधी उपलब्ध होताचा लाभार्थांच्या वितरीत केला जाईल.

- सुधीर जिरापुरे,

समाजकल्याण अधिकारी