शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

३५ उमेदवार, ६९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:21 IST

लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ३५ इच्छुक उमेदवारांनी ६९ अर्जांची उचल केली. यामध्ये राजकीय पक्षांचे १४ पदाधिकारी व २१ अपक्षांचा समावेश आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही.

ठळक मुद्देदाखल निरंक : राजकीय पक्षांच्या नावे १४ तर २१ अपक्ष इच्छुक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ३५ इच्छुक उमेदवारांनी ६९ अर्जांची उचल केली. यामध्ये राजकीय पक्षांचे १४ पदाधिकारी व २१ अपक्षांचा समावेश आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही.अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ पासून उमेदवारी अर्ज घेण्यास उमेदवारांकडून सुरुवात झाली. सर्वप्रथम अधिवक्ता चंद्रशेखर डोरले यांनी भाजप-शिवसेना युतीच्या नावे आनंदराव अडसूळ यांच्याकरिता चार अर्ज, तर युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांच्याकरिता कमलताई गवई यांनी चार अर्जाची उचल केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नावे राजू कोंडे व पंकज मेश्राम यांनी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नावे आनंद धवने व राहुल मोहोड, रिपब्लिकन सोशल मुव्हमेंटच्या नावे महेश तायडे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीच्या नावे प्रमोद खडसे, बहुजन समाज पार्टीच्या नावे बापू बोते, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया डेमोकॅ्रटिकच्या नावे राहुल देशमुख, भारिप-बहुजन महासंघच्या नावे दिलीप वासनिक यांनी गुणवंत देवपारे यांच्याकरिता अर्जाची उचल केली. भारतीय दलित आदिवासी पँथर सेनेच्या नावे जगदीश इंगळे व मानवी हक्क सुरक्षा दलाच्या नावे डॉ. रेखा रणबावणे व शीला मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज घेतले. २१ अपक्ष उमेदवारांनीदेखील पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जाची उचल केलेली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर अंतरात उमेदवारासह पाच व्यक्तींनाच प्रवेश तसेच तीन वाहनांना परवानगी, अर्ज उचल व दाखल प्रक्रिया ‘इनकॅमेरा’ असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांना शक्तिप्रदर्शनाचा मोह टाळावा लागणार आहे.अपक्षाला हवेत १० सूचकउमेदवारी अर्ज २६ मार्चपर्यंत दाखल करता येणार आहेत. यामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक (प्रस्तावक), तर अन्य राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना १० सूचक लागणार आहे. अर्जाची छाननी २७ मार्च, माघार २९ मार्च, तर १८ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.