शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

३५ उमेदवार, ६९ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:21 IST

लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ३५ इच्छुक उमेदवारांनी ६९ अर्जांची उचल केली. यामध्ये राजकीय पक्षांचे १४ पदाधिकारी व २१ अपक्षांचा समावेश आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही.

ठळक मुद्देदाखल निरंक : राजकीय पक्षांच्या नावे १४ तर २१ अपक्ष इच्छुक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ३५ इच्छुक उमेदवारांनी ६९ अर्जांची उचल केली. यामध्ये राजकीय पक्षांचे १४ पदाधिकारी व २१ अपक्षांचा समावेश आहे. मात्र, एकही उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल झाला नाही.अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अधिसूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ पासून उमेदवारी अर्ज घेण्यास उमेदवारांकडून सुरुवात झाली. सर्वप्रथम अधिवक्ता चंद्रशेखर डोरले यांनी भाजप-शिवसेना युतीच्या नावे आनंदराव अडसूळ यांच्याकरिता चार अर्ज, तर युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांच्याकरिता कमलताई गवई यांनी चार अर्जाची उचल केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नावे राजू कोंडे व पंकज मेश्राम यांनी, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या नावे आनंद धवने व राहुल मोहोड, रिपब्लिकन सोशल मुव्हमेंटच्या नावे महेश तायडे, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीच्या नावे प्रमोद खडसे, बहुजन समाज पार्टीच्या नावे बापू बोते, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया डेमोकॅ्रटिकच्या नावे राहुल देशमुख, भारिप-बहुजन महासंघच्या नावे दिलीप वासनिक यांनी गुणवंत देवपारे यांच्याकरिता अर्जाची उचल केली. भारतीय दलित आदिवासी पँथर सेनेच्या नावे जगदीश इंगळे व मानवी हक्क सुरक्षा दलाच्या नावे डॉ. रेखा रणबावणे व शीला मेश्राम यांनी उमेदवारी अर्ज घेतले. २१ अपक्ष उमेदवारांनीदेखील पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जाची उचल केलेली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १०० मीटर अंतरात उमेदवारासह पाच व्यक्तींनाच प्रवेश तसेच तीन वाहनांना परवानगी, अर्ज उचल व दाखल प्रक्रिया ‘इनकॅमेरा’ असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांना शक्तिप्रदर्शनाचा मोह टाळावा लागणार आहे.अपक्षाला हवेत १० सूचकउमेदवारी अर्ज २६ मार्चपर्यंत दाखल करता येणार आहेत. यामध्ये मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक (प्रस्तावक), तर अन्य राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना १० सूचक लागणार आहे. अर्जाची छाननी २७ मार्च, माघार २९ मार्च, तर १८ एप्रिलला सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने सांगितले.