शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

३४ सरपंचांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:16 IST

केंद्र, राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबात शौचालय असणे बंधनकारक केले असताना गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचांनी शौचालय बांधकामाकरिता सहकार्य न केल्याने ....

विभागीय आयुक्तांचे आदेश : शौचालय बांधकामात सहकार्य नाहीलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : केंद्र, राज्य शासनाने प्रत्येक कुटुंबात शौचालय असणे बंधनकारक केले असताना गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचांनी शौचालय बांधकामाकरिता सहकार्य न केल्याने तालुक्यातील ३४ सरपंचांवर जि.प. अधिनियम अंतर्गत कारवाई व ग्रामसेवकाचे थेट निलंबन करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिले आहे़ग्रामस्वच्छता अभियानात घर तिथे शौचालयाला अधिक महत्त्व आहे़ केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्तांनी शौचालयासंदर्भात कडक भूमिका घेतली आहे़ गत आठवड्यात विभागातील पाचही जिल्ह्यांतील सर्व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तालुक्याचा लेखाजोखा घेतला असता केवळ २८ ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के शौचालय पूर्ण झाले असल्याचे निदर्शनास आले. यंदा दिलेल्या उदिष्टांपैकी आजपर्यंत ५ हजार ८२१ कुटुंबांकडे शौचालये नाहीत, याविषयी पंचायत समितीच्या प्रशासकीय विभागाने संबंधित ३४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना व सचिवांना वारंवार पत्र देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र सहकार्य करण्याऐवजी उडवाउडवीचे उत्तर स्थानिक लोकप्रतिनिधीने दिल्यामुळे विभागीय आयुक्ताने एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९(१) अन्वये कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी १ आॅगस्टपर्यंत ज्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रापसदस्य गावात शौचालय बांधण्याकरिता सहकार्य करीत नसेल अशा लोकप्रतिनिधींवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांना पाठविण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांना दिले आहे़ दरम्यान सोबत ग्रामसेवकांच्या कामाचा आढावा पाठवून त्यांच्यावर शौचालय उभारणी बाबत काय कारवाई केली याविषयी लेखी अहवाल पाठविण्याचे आदेश बैठकीत दिले आहे़तालुक्यातील ६ हजार कुटुंबांकडे शौचालय नसून या गावातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य गरजेचे आहे़ मात्र कोणतीही मदत ग्रामसेवकांना मिळत नसल्याने १ आॅगस्टनंतर विभागीय आयुक्तांना या गावाचा ग्रामपंचायत अधिनियम ३९ एक याप्रमाणे कारवाईचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे़- पंकज भोयर, गटविकास अधिकारी, धामणगाव रेल्वे