शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जलप्रकल्प क्षमतेच्या ३४ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 24, 2015 00:43 IST

गतवर्षी पावसाळ्याच्या ३६ दिवसांत ७८० मि.मी. पाऊस पडला. एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत ही टक्केवारी ९६ टक्के आहे. ...

एकूण ७६ प्र्रकल्प : गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी साठागजानन मोहोड अमरावतीगतवर्षी पावसाळ्याच्या ३६ दिवसांत ७८० मि.मी. पाऊस पडला. एकूण सरासरी पावसाच्या तुलनेत ही टक्केवारी ९६ टक्के आहे. पाऊ स जरी कमी असला तरी मुख्य व मध्यम प्रकल्पांची साठवण क्षमता अधिक असल्याने जिल्ह्यातील एकूण ७६ प्रकल्पात सध्या ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा ५ टक्क्यांनी कमी आहे. जिल्ह्यात एक मुख्य, चार मध्यम व ७१ लघुप्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा संकल्पि जलसाठा ८६६.१७ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पात ३१९.९३ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. गेल्या आठवड्यात हा साठा ३२९.८८ द.ल.घ.मी. होता. गेल्या वर्षी याच दिनांकात ३५६.१४ द.ल.घ.मी. जलसाठा होता. या आठवड्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने बाष्पीभवन झाले. त्यामुळे पाण्याच्या पातळीत १० टक्क्यांनी घट आली. २०१० ते २०१४ या ४ वर्षांत आज दिनांकात ३०९.१२ द.ल.घ.मी. सरासरी साठा होता. जिल्ह्यात एकमेव मुख्य प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पित ५६४.०५ द.ल.घ.मी. साठ्याच्या तुलनेत १८४.२७ द.ल.घ.मी. जलसाठा आहे. ही ३२.६७ टक्केवारी आहे. गेल्या आठवड्यात १८८.९५ व गेल्या वर्षी या दिवशी २२५.८८ द.ल.घ.मी. जलसाठा होता. जिल्ह्यात शहानूर, चंद्रभागा, सपन व पूर्णा या चार मध्यम प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पित १६१.२६ द.ल.घ.मी. पाणी साठ्याच्या तुलनेत सध्या ९५.२१ द.ल.घ.मी. साठा शिल्लक आहे. ही ५९ टक्केवारी या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमिवर दिलासा देणारी आहे. गेल्या वर्षी याच दिनांकात ९८.३३ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक होता. ७१ लघु प्रकल्पात पाण्याची साठवणक्षमता कमी आहे. प्रकल्पीय संकल्पीत १६१ द.ल.घ.मी. साठ्याच्या तुलनेत ९५ द.ल.घ.मी. साठा शिल्लक आहे. बाष्पीभवनामुळे पातळीत झपाट्याने घटया आठवड्यात तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे प्रकल्पातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. गेल्या आठवड्यातील मुख्य, मध्यम व लघु यासर्व प्रकल्पांची ३२९.८८ द.ल.घ.मी. जलसाठा होता. आठ दिवसात १० द.ल.घ.मी.पाण्याचे बाष्पीभवन झाले. सध्या ३१९.९३ द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. मुख्य प्रकल्पात ४, मध्यम ३ व लघुप्रकल्पात २ द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.