शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत ३३.१७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 11:50 IST

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी ३३.१७ टक्केच पाणीसाठा राहिल्याने सिंचनासह, पिण्यासाठीसुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनियोजनाची गरज सिंचनासह, पिण्याच्या पाण्याचीही चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी ३३.१७ टक्केच पाणीसाठा राहिल्याने सिंचनासह, पिण्यासाठीसुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाला ठोस नियोजन करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ जाणकारांनी व्यक्त केले आहे.अमरावती जिल्ह्यातील एकमेव असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पांत फक्त २६.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा जलसंपदा विभागाचे अभियंते करीत असले तरी, सिंचनासाठी आता पाणी देता येणार नाही. त्यामुळे सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरण परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. यंदा यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्पांची स्थिती इतर प्रकल्पांच्या तुलनेत चांगली आहे. मात्र, या प्रकल्पांत आता ६९ टक्के पाणीसाठा आहे. अरुणावती प्रकल्पात ४६.५९ टक्के पाणीसाठा आहे. बेंबळा प्रकल्पात ३३.३७ टक्के पाणीसाठा आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ४९.८३ टक्के पाणी शिल्लक आहे, तर वानमध्ये ७०.४८ टक्के पाणी आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत यंदा बुलडाणा जिल्ह्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. नळगंगा प्रकल्पात १२.७४ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ६.१५ टक्के पाणीसाठा आहे. खळकपूर्णा प्रकल्पाचे कामे अपूर्ण असल्याने या प्रकल्पात पाणीसाठा नसल्याची नोंद जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद आहे. बुलडाणा जिल्ह्यावर सिंचनाचे संकट तर आलेच आहे. मात्र, उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.२४ मध्यम प्रकल्पांत ४६.२४ टक्के पाणीसाठापश्चिम विदर्भातील २४ मध्यम प्रकल्पांत ४६.२४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ४६९ लघु प्रकल्पांत २९.८६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोठे, मध्यम व लघु अशा ५०२ प्रकल्पांमध्ये सरासरी ३४.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई