शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

अमरावतीमधील ३३ टक्के पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 20:28 IST

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अमरावती महापालिकेला पत्र दिले होते.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यातउपाययोजनेसाठी राज्य शासनाचे महापालिकेला पत्र

वैभव बाबरेकरअमरावती : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. मे महिन्यात ३३ टक्के दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यावर उपाययोजनासंदर्भात अमरावती महापालिकेला पत्र दिले होते. दूषित पाण्याची वाढती टक्केवारी ८ लाख अमरावतीकरांसाठी धोक्याचीच घंटा मानली आहे.पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असून रोगराई पसरण्याची शक्यताही वाढते. शहरात सध्या या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगीमध्ये आबालवृद्धांचा ओघ वाढत आहे. याला दूषित पाणीच कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. अमरावती महापालिकेकडून शहरातील उपहार गृह, विहिरी, शाळा-महाविद्यालये, मंगल कार्यालये, कॅन, शीतपेयगृहे, कुपनलिका-बोअरवेलसह अन्य पाणी स्त्रोतांचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जातात. त्यात दर महिन्याला पाणी नमुने दूषित आढळून येत आहे. जुलै महिन्यात आरोग्य प्रयोगशाळेकडून महापालिका हद्दीतील दवाखान्यांचे २०८ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी २६ नमुने दूषित आहेत. या अनुषंगाने पुणे येथील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे तत्कालीन उपसंचालक (आरोग्य सेवा) सुहास बाकरे यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यात महापालिका क्षेत्रात ३३ टक्के पाणी दूषित आढळल्याने जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवून उपायायोजना करण्याचे निर्देश दिले आहे.एप्रिल ते जुलैपर्यंतची दूषित पाण्याची आकडेवारी- सार्वजनिक नळ १९७ पैकी २३ दूषित- खासगी नळ १३ पैकी ५ दूषित- सार्वजनिक विहिरी ८१ पैकी ३१ दूषित- हॉटेल ११३ पैकी २९ दूषित- शाळा-महाविद्यालये ३८ पैकी २२ दूषित- शीतपेयगृह १६ पैकी २ दूषित- मंगल कार्यालये १६ पैकी ४ दूषित-चाट भंडार ९ पैकी ३ दूषित-कॅनच्या २६ पैकी ८ दूषित-हातपंप व बोअर ३९ पैकी १८ दुषित-इतर ७१ पैकी ९ दुषित१५२ जणांना नोटीस, १६ जणांकडून दंड वसुलीदूषित पाणी आढळलेल्या १५२ जणांना महापालिकेकडून नोटीस बजावली असून, १६ जणांकडून दंड वसुलण्यात आला आहे. दूषित नमुने आढळलेली उपाहारगृहे, प्रतिष्ठान, संस्थांना महापालिका नोटीस बजावते, त्यानंतरही पाणी दूषित आल्यास दंड ठोठावते.दूषित पाणी आढळल्यास नोटीस व दंडदूषित पाणी आढळलेल्या आस्थापनाला महापालिकेकडून नोटीस व दंड ठोठावण्यात येते. मात्र, नोटीस व दंड दिला जात असतानाही दूषित पाणी आढळूनच येत नाही. त्यामुळे पाणी शुद्धतेबाबत महापालिका अमरावतीकरांना केव्हा हमी देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पाणी नमुने दूषित आढळल्यास संबंधित आस्थापनाला नोटीस बजावण्यात येते. पुन्हा पाणी दूषित आढळल्यास दंड दिला जातो. पाण्याची शुद्धता ठेवण्यासाठी सक्त ताकिद दिली जाते.- सीमा नैताम, आरोग्य अधिकारी, महापालिकादूषित पाणी आढळल्यास आमच्याकडून संबंधित महापालिकेला उपाययोजनांसाठी पत्र दिले जाते. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनीही कळविण्यात येते.- तानाजी माने,उपसंचालक, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण