शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अमरावतीमधील ३३ टक्के पाणी दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 20:28 IST

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने अमरावती महापालिकेला पत्र दिले होते.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यातउपाययोजनेसाठी राज्य शासनाचे महापालिकेला पत्र

वैभव बाबरेकरअमरावती : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने चार महिन्यांत महापालिका हद्दीतील ६३३ पाणी नमुन्याची अनुजीव तपासणी केली. त्यात तब्बल १५२ पाणी नमुने दूषित आढळले. मे महिन्यात ३३ टक्के दूषित पाणी आढळून आल्याने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यावर उपाययोजनासंदर्भात अमरावती महापालिकेला पत्र दिले होते. दूषित पाण्याची वाढती टक्केवारी ८ लाख अमरावतीकरांसाठी धोक्याचीच घंटा मानली आहे.पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असून रोगराई पसरण्याची शक्यताही वाढते. शहरात सध्या या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगीमध्ये आबालवृद्धांचा ओघ वाढत आहे. याला दूषित पाणीच कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. अमरावती महापालिकेकडून शहरातील उपहार गृह, विहिरी, शाळा-महाविद्यालये, मंगल कार्यालये, कॅन, शीतपेयगृहे, कुपनलिका-बोअरवेलसह अन्य पाणी स्त्रोतांचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जातात. त्यात दर महिन्याला पाणी नमुने दूषित आढळून येत आहे. जुलै महिन्यात आरोग्य प्रयोगशाळेकडून महापालिका हद्दीतील दवाखान्यांचे २०८ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी २६ नमुने दूषित आहेत. या अनुषंगाने पुणे येथील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे तत्कालीन उपसंचालक (आरोग्य सेवा) सुहास बाकरे यांनी अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यात महापालिका क्षेत्रात ३३ टक्के पाणी दूषित आढळल्याने जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवून उपायायोजना करण्याचे निर्देश दिले आहे.एप्रिल ते जुलैपर्यंतची दूषित पाण्याची आकडेवारी- सार्वजनिक नळ १९७ पैकी २३ दूषित- खासगी नळ १३ पैकी ५ दूषित- सार्वजनिक विहिरी ८१ पैकी ३१ दूषित- हॉटेल ११३ पैकी २९ दूषित- शाळा-महाविद्यालये ३८ पैकी २२ दूषित- शीतपेयगृह १६ पैकी २ दूषित- मंगल कार्यालये १६ पैकी ४ दूषित-चाट भंडार ९ पैकी ३ दूषित-कॅनच्या २६ पैकी ८ दूषित-हातपंप व बोअर ३९ पैकी १८ दुषित-इतर ७१ पैकी ९ दुषित१५२ जणांना नोटीस, १६ जणांकडून दंड वसुलीदूषित पाणी आढळलेल्या १५२ जणांना महापालिकेकडून नोटीस बजावली असून, १६ जणांकडून दंड वसुलण्यात आला आहे. दूषित नमुने आढळलेली उपाहारगृहे, प्रतिष्ठान, संस्थांना महापालिका नोटीस बजावते, त्यानंतरही पाणी दूषित आल्यास दंड ठोठावते.दूषित पाणी आढळल्यास नोटीस व दंडदूषित पाणी आढळलेल्या आस्थापनाला महापालिकेकडून नोटीस व दंड ठोठावण्यात येते. मात्र, नोटीस व दंड दिला जात असतानाही दूषित पाणी आढळूनच येत नाही. त्यामुळे पाणी शुद्धतेबाबत महापालिका अमरावतीकरांना केव्हा हमी देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पाणी नमुने दूषित आढळल्यास संबंधित आस्थापनाला नोटीस बजावण्यात येते. पुन्हा पाणी दूषित आढळल्यास दंड दिला जातो. पाण्याची शुद्धता ठेवण्यासाठी सक्त ताकिद दिली जाते.- सीमा नैताम, आरोग्य अधिकारी, महापालिकादूषित पाणी आढळल्यास आमच्याकडून संबंधित महापालिकेला उपाययोजनांसाठी पत्र दिले जाते. याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनीही कळविण्यात येते.- तानाजी माने,उपसंचालक, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण