शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

सव्वातीन हजार शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे.

ठळक मुद्देदोन केंद्रे वाढली : कामाची गती वाढवा; खरिपाच्या तोंडावर कापूस घरीच

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पेरणी तोंडावर आली असताना तालुक्यातील सव्वतीन हजार शेतकरी कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदीचा वेग वाढावा म्हणून आणखी दोन केंद्रे २७ मेपासून वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ती सुरू झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे का, याची खारतजमा पथके नेमून केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे. यासाठी माहुली, शहापूर (वरूड) या केंद्रावर २७ मे पासून कापूस खरेदी सुरू असली तरी पावसाळ्यापूर्वी कापूस उचलणे कठीण झाले. पेरणी तोंडावर आली असताना विक्रीनंतरही चुकारे कधी मिळणार, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.दुसरीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा घरात कापूस आहे का, याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी सहायक निबंधकांना दिले असून, त्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषिउत्पन्न बाजार समितीकडून घेतली आहे. सत्यता पडताळणीसाठी पथके नेमली असून, ही पथके २७ मेपासून कामी लागल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचा कापूस मोजण्यासाठी शेतकºयांचे सातबारे वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रकारही प्रशासनाला दिसून पडत आहेत. हे याआधी झाले असते, तर आज व्यापाºयांऐवजी अनेक शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असते . या अभियानातून किती शेतकऱ्यांना न्याय मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.लेहेगाव केंद्रावर ३० ते ४० शेतकरी कापूस मोजणीसाठी बोलावले जात होते. २७ मे पासून माहुली आणि शहापूर (वरूड) ही दोन केंद्रे सुरू झाल्यामुळे निश्चितच खरेदीचा वेग वाढेल; परंतु सव्वातीन हजार नोंदी शिल्लक आहेत.मोर्शी, हिवरखेड भागातील शेतकऱ्यांना शहापूर केंद्र दिले जाईल. माहुलीनजीकच्या शेतकऱ्यांना या केंद्रावर बोलावले जाईल. खरीप हंगामाच्या तोंडावर ही केंदे्र वाढली. कापूस निघाल्यावर सुरुवातीपासून शासनाने दखल घेतली असती, तर शेतकऱ्यांची लूट थांबली असती. शासकीय खरेदीचा भाव ५ हजार ५०० असला तरी व्यापारी ४२००, ४३०० रुपयांनी शेतकऱ्यांकडून कापूस मागत आहेत, शिवाय फरदड कापूस खरेदी करून शेतकऱ्यांच्या सात-बारावर विकत आहेत.

टॅग्स :cottonकापूस