शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावातील ३२ हजार ब्रास रेती तस्करांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:01 IST

लिलाव करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव जातो. त्यानंतर महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण विभागाचे पत्र पाठवून लिलावापूर्वी पावसाळ्यात सर्वेक्षण करण्यात येते. नदीपात्रात पाणी असल्याने रेतीघाटाचा लिलाव करणे योग्य नसल्याचे, तर दुसरीकडे पात्रात रेती असताना ती उपलब्ध नसल्याचेही नमूद केले जाते. पाणीपुरवठ्याला बाधा पोहोचून टंचाई निर्माण होऊ शकते, असा अहवाल दिला जातो.

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वर्धा  नदीतील चौदापैकी तब्बल आठ ते दहा रेतीघाटांचा मागील चार वर्षांमध्ये लिलाव  कधी पर्यावरण, तर कधी भूजल सर्वेक्षण यांच्या त्रुटीमुळे  झाला नाही. त्याचा फायदा घेत दरवर्षी ३२ हजार ब्रास रेती तस्कराच्या घशात जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यात वर्धा नदीच्या पात्रात आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, नायगाव, इसापूर, रायपूर कासारखेड, चिंचोली विटाळा हे रेतीघाट येतात. या घाटात दर पावसाळ्यात हजारो ब्रास रेती जमा होते. मात्र, उन्हाळ्यात हे पात्र रिते दिसते. नेमके या पत्रातील  रेती जाते कुठे, याविषयी महसूल प्रशासनाला माहिती नाही. पथके तयार करण्यात आली असली तरी कारवाई जेमतेम आहे. 

रेतीघाट लिलावाची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे.  भूजलकडून सर्वेक्षण होताना पात्रात पाणी अधिक असते. पाणी कमी झाल्यानंतर सर्वेक्षण  पुन्हा   होऊ शकतो. परंतु, महसूल प्रशासनाकडून पत्र मिळत नाही.  - हिमा जोशी, वरिष्ठ भूजल सर्वेक्षण अधिकारी, अमरावती

लिलाव न झालेल्या घाटातून रेतीची चोरी होऊ नये म्हणून महसूल व पोलिसांची भरारी पथके नेमली जातात. आतापर्यंत अनेक रेती तस्करांवर कारवाई करण्यात आली. यापुढे भरारी पथकाला जबाबदार धरण्यात येईल. - इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे

जबाबदारी स्वीकारणार कोण? आष्टा, वकनाथ प्रत्येकी १०००, गोकुळसरा ११८७ , बोरगाव निस्ताने ८४८०, चिंचोली १५००,  विटाळा १००० ब्रास या रेतीघाटातील वाळू दरवर्षी  लिलाव न करता बेपत्ता होते. 

या नियमामुळे नाकारली जातेय परवानगीलिलाव करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव जातो. त्यानंतर महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण विभागाचे पत्र पाठवून लिलावापूर्वी पावसाळ्यात सर्वेक्षण करण्यात येते. नदीपात्रात पाणी असल्याने रेतीघाटाचा लिलाव करणे योग्य नसल्याचे, तर दुसरीकडे पात्रात रेती असताना ती उपलब्ध नसल्याचेही नमूद केले जाते. पाणीपुरवठ्याला बाधा पोहोचून टंचाई निर्माण होऊ शकते, असा अहवाल दिला जातो. हा शेरा थेट मंत्रालयापर्यंत पाठविला जातो. 

साडेतीन हजार घरकुलधारकांची परवड राज्य शासनाने पंतप्रधान, रमाई, शबरी घरकुल योजनेत रेती मोफत देण्याची घोषणा केली. मात्र, धामणगाव तालुक्यात सर्वाधिक रेतीघाट असलेल्या भागातील तब्बल साडेतीन हजार लाभार्थींना कधी दुप्पट, तर कधी चौपटीने रेती खरेदी करावी लागली. अद्यापही दीड हजारांवर घरकुल रेतीमुळे अर्धवट आहे.

 

टॅग्स :sandवाळू