शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

धामणगावातील ३२ हजार ब्रास रेती तस्करांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:01 IST

लिलाव करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव जातो. त्यानंतर महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण विभागाचे पत्र पाठवून लिलावापूर्वी पावसाळ्यात सर्वेक्षण करण्यात येते. नदीपात्रात पाणी असल्याने रेतीघाटाचा लिलाव करणे योग्य नसल्याचे, तर दुसरीकडे पात्रात रेती असताना ती उपलब्ध नसल्याचेही नमूद केले जाते. पाणीपुरवठ्याला बाधा पोहोचून टंचाई निर्माण होऊ शकते, असा अहवाल दिला जातो.

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वर्धा  नदीतील चौदापैकी तब्बल आठ ते दहा रेतीघाटांचा मागील चार वर्षांमध्ये लिलाव  कधी पर्यावरण, तर कधी भूजल सर्वेक्षण यांच्या त्रुटीमुळे  झाला नाही. त्याचा फायदा घेत दरवर्षी ३२ हजार ब्रास रेती तस्कराच्या घशात जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तालुक्यात वर्धा नदीच्या पात्रात आष्टा, गोकुळसरा, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, नायगाव, इसापूर, रायपूर कासारखेड, चिंचोली विटाळा हे रेतीघाट येतात. या घाटात दर पावसाळ्यात हजारो ब्रास रेती जमा होते. मात्र, उन्हाळ्यात हे पात्र रिते दिसते. नेमके या पत्रातील  रेती जाते कुठे, याविषयी महसूल प्रशासनाला माहिती नाही. पथके तयार करण्यात आली असली तरी कारवाई जेमतेम आहे. 

रेतीघाट लिलावाची जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे.  भूजलकडून सर्वेक्षण होताना पात्रात पाणी अधिक असते. पाणी कमी झाल्यानंतर सर्वेक्षण  पुन्हा   होऊ शकतो. परंतु, महसूल प्रशासनाकडून पत्र मिळत नाही.  - हिमा जोशी, वरिष्ठ भूजल सर्वेक्षण अधिकारी, अमरावती

लिलाव न झालेल्या घाटातून रेतीची चोरी होऊ नये म्हणून महसूल व पोलिसांची भरारी पथके नेमली जातात. आतापर्यंत अनेक रेती तस्करांवर कारवाई करण्यात आली. यापुढे भरारी पथकाला जबाबदार धरण्यात येईल. - इब्राहिम चौधरी, उपविभागीय अधिकारी, चांदूर रेल्वे

जबाबदारी स्वीकारणार कोण? आष्टा, वकनाथ प्रत्येकी १०००, गोकुळसरा ११८७ , बोरगाव निस्ताने ८४८०, चिंचोली १५००,  विटाळा १००० ब्रास या रेतीघाटातील वाळू दरवर्षी  लिलाव न करता बेपत्ता होते. 

या नियमामुळे नाकारली जातेय परवानगीलिलाव करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचा ठराव जातो. त्यानंतर महसूल, पर्यावरण, भूजल सर्वेक्षण विभागाचे पत्र पाठवून लिलावापूर्वी पावसाळ्यात सर्वेक्षण करण्यात येते. नदीपात्रात पाणी असल्याने रेतीघाटाचा लिलाव करणे योग्य नसल्याचे, तर दुसरीकडे पात्रात रेती असताना ती उपलब्ध नसल्याचेही नमूद केले जाते. पाणीपुरवठ्याला बाधा पोहोचून टंचाई निर्माण होऊ शकते, असा अहवाल दिला जातो. हा शेरा थेट मंत्रालयापर्यंत पाठविला जातो. 

साडेतीन हजार घरकुलधारकांची परवड राज्य शासनाने पंतप्रधान, रमाई, शबरी घरकुल योजनेत रेती मोफत देण्याची घोषणा केली. मात्र, धामणगाव तालुक्यात सर्वाधिक रेतीघाट असलेल्या भागातील तब्बल साडेतीन हजार लाभार्थींना कधी दुप्पट, तर कधी चौपटीने रेती खरेदी करावी लागली. अद्यापही दीड हजारांवर घरकुल रेतीमुळे अर्धवट आहे.

 

टॅग्स :sandवाळू