शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ३२ कोटींचे आश्वासन

By admin | Updated: February 7, 2015 23:15 IST

अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी राज्य शासनाच्यावतीने ३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी राज्य शासनाच्यावतीने ३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.जिल्ह्यातील ४३ गावांचे नदीच्या महापुरामुळे नुकसान झाले. अनेकांच्या घरांची पडझड झाली. ४३ गावांतील नागरिक बेघर झालेत. अद्यापपर्यंत त्यांच्या कायम स्वरुपी निवाऱ्याचा प्रश्न शासनाने सोडविला नाही. आज या घटनेला तीन वर्षांचा अवधी लोटला असला तरी बेघर झालेल्या गावातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्त ४३ गावांच्या पुनर्वसनासाठी ४२ कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाची आवश्यकता असून आतापर्यंत केवळ १० कोटी एवढाच निधी महाराष्ट्र शासनाकडून पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी प्राप्त झाला आहे. मात्र उर्वरित ३२ कोटी रुपयांचा निधी ४३ पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाकरिता मंजूर केलेला नसल्यामुळे ४३ पूरग्रस्त गावांतील पुनर्वसनाचे काम रखडलेले असून ४३ पुरग्रस्त गावांचे ३ वर्षांनंतरही पुनर्वसन करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या ४३ पूरग्रस्त गावातील नागरिकांमध्ये शासनाबद्दल प्रचंड रोष आहे. आज ४३ पूरग्रस्त गावातील नागरिकांपुढे कायमस्वरुपी निवाऱ्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून अमरावती जिल्ह्यातील ४३ गावांतील हजारो पूरग्रस्त नागरिकांच्या निवाऱ्याच्या संबंधित आहे. संघटनेच्यावतीने या निवेदनाच्या माध्यमातून हा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मांडला. दरम्यान या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याची विनंतीही त्यांनी मुनगंटीवार यांना केली. तसेच अमरावती जिल्ह्यातील ४३ पूरग्रस्त गावांतील हजारो नागरिकांचा कायमस्वरुपी निवाऱ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने व या ४३ पूरग्रस्त गावांचे तात्काळ पुनर्वसन केले जावे. अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमित अढावू, हरिभाऊ ताथोड, गजानन ताथोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याकरिता मंजूर केलेल्या एकूण ४२ कोटी रुपयांचा निधीपैकी उर्वरित निधी ३२ कोटी रुपये या ४३ गावांचे पुनर्वसनाकरिता उपलब्ध करुन देण्यासंबंधीची तत्काळ अर्थसंकल्पात तरतूद करुन हा निधी उपलब्ध करुन देण्यासंबंधी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.