शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ३२ कोटींचे आश्वासन

By admin | Updated: February 7, 2015 23:15 IST

अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी राज्य शासनाच्यावतीने ३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी राज्य शासनाच्यावतीने ३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.जिल्ह्यातील ४३ गावांचे नदीच्या महापुरामुळे नुकसान झाले. अनेकांच्या घरांची पडझड झाली. ४३ गावांतील नागरिक बेघर झालेत. अद्यापपर्यंत त्यांच्या कायम स्वरुपी निवाऱ्याचा प्रश्न शासनाने सोडविला नाही. आज या घटनेला तीन वर्षांचा अवधी लोटला असला तरी बेघर झालेल्या गावातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्त ४३ गावांच्या पुनर्वसनासाठी ४२ कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाची आवश्यकता असून आतापर्यंत केवळ १० कोटी एवढाच निधी महाराष्ट्र शासनाकडून पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी प्राप्त झाला आहे. मात्र उर्वरित ३२ कोटी रुपयांचा निधी ४३ पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाकरिता मंजूर केलेला नसल्यामुळे ४३ पूरग्रस्त गावांतील पुनर्वसनाचे काम रखडलेले असून ४३ पुरग्रस्त गावांचे ३ वर्षांनंतरही पुनर्वसन करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या ४३ पूरग्रस्त गावातील नागरिकांमध्ये शासनाबद्दल प्रचंड रोष आहे. आज ४३ पूरग्रस्त गावातील नागरिकांपुढे कायमस्वरुपी निवाऱ्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून अमरावती जिल्ह्यातील ४३ गावांतील हजारो पूरग्रस्त नागरिकांच्या निवाऱ्याच्या संबंधित आहे. संघटनेच्यावतीने या निवेदनाच्या माध्यमातून हा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने मांडला. दरम्यान या गंभीर प्रश्नाची दखल घेण्याची विनंतीही त्यांनी मुनगंटीवार यांना केली. तसेच अमरावती जिल्ह्यातील ४३ पूरग्रस्त गावांतील हजारो नागरिकांचा कायमस्वरुपी निवाऱ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने व या ४३ पूरग्रस्त गावांचे तात्काळ पुनर्वसन केले जावे. अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमित अढावू, हरिभाऊ ताथोड, गजानन ताथोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याकरिता मंजूर केलेल्या एकूण ४२ कोटी रुपयांचा निधीपैकी उर्वरित निधी ३२ कोटी रुपये या ४३ गावांचे पुनर्वसनाकरिता उपलब्ध करुन देण्यासंबंधीची तत्काळ अर्थसंकल्पात तरतूद करुन हा निधी उपलब्ध करुन देण्यासंबंधी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.