शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

अमरावतीत यंदाच्या पावसाळ्यात वीज पडून ३१ व्यक्ती मृत; ४४ जखमी, ८३४ कुटुंब बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 22:26 IST

यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.

ठळक मुद्देयंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये ४४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर ८३४ कुटुंब बाधित झाले आहे.

अमरावती- यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये ४४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर ८३४ कुटुंब बाधित झाले आहे. या तीन महिन्याच्या कालावधित सर्वात जास्त २,७४३ शेतजमिनींचे नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे.यंदाच्या पावसाळ्यात एक जून ते १६ जून या कालावधित नैसर्गिक आपत्तीमुळे ४४ व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक २३ व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. अमरावती 6, अकोला 2, बुलडाणा १४ तर वाशिम जिल्हा निरंक आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सहाही व्यक्ती वीज पडून मृत झाल्या आहेत. अकोला येथे एक पुरात वाहून तर एक वीज पडून मृत झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या १६ व्यक्ती वीज पडून तर एक नाल्याच्या पुरात वाहून गेला आहेत. अकोला जिल्ह्यात एक अंगावर भिंत पडून, तर एक जण पुरात वाहून गेला आहे. वाशिम जिल्ह्यातील एक व्यक्ती पुरात वाहून गेली. तर बुलडाणा जिल्ह्यातील ११ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. या तीन महिन्याच्या आपत्तीमध्ये वाशिम जिल्ह्यात १.६० हेक्टर तर यवतमाळ जिल्ह्यात २,७४३.४८ हेक्टर मधील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे २० तालुक्यातील ८३४ कुटूंबे बाधित झाली आहेत. यामध्ये अमरावती १७०, अकोला नऊ व यवतमाळ जिल्ह्यात ६५५ कुटूंबाचा समावेश आहे.

मृतांच्या वारसाला मदतयंदाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या ३५ पैकी २७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली आहेत. तर सात प्रलंबित आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात तीन प्रकरणात १२ लाख, अकोला जिल्ह्यात दोन प्रकरणात आठ लाख, यवतमाळ जिल्ह्यात १५ प्रकरणात ६० लाख, बुलडाणा जिल्ह्यात आठ प्रकरणात ३२ लाख रूपयांची शासकीय मदत देण्यात आलेली आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये १५३ जनावरे मृतया कालावधित विभागात १५३ लहाल-मोठी जनावरे मृत झाली आहेत. यामध्ये ४५ मोठ्या दुधाळ जनावरांसाठी मालकास ८.९६ लाख, ६९ लहान दुधाळ जनावरांसाठी २.१२ लाख, ओढकाम करणाºया ३३ जनावरांसाठी ६.५० लाख तर ओढकाम करणाºया लहान जनावरांसाठी ७६ हजारांची मदत करण्यात आलेली आहे. या कालावधितील जिवित व वित्तहानीमध्ये सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे.