शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

अमरावतीत यंदाच्या पावसाळ्यात वीज पडून ३१ व्यक्ती मृत; ४४ जखमी, ८३४ कुटुंब बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 22:26 IST

यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे.

ठळक मुद्देयंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये ४४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर ८३४ कुटुंब बाधित झाले आहे.

अमरावती- यंदाच्या पावसाळ्यात विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तीन महिन्यात वीज पडून ३१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध घटनांमध्ये ४४ व्यक्ती गंभीर जखमी झाल्यात तर ८३४ कुटुंब बाधित झाले आहे. या तीन महिन्याच्या कालावधित सर्वात जास्त २,७४३ शेतजमिनींचे नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे.यंदाच्या पावसाळ्यात एक जून ते १६ जून या कालावधित नैसर्गिक आपत्तीमुळे ४४ व्यक्तींचा मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक २३ व्यक्ती यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. अमरावती 6, अकोला 2, बुलडाणा १४ तर वाशिम जिल्हा निरंक आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सहाही व्यक्ती वीज पडून मृत झाल्या आहेत. अकोला येथे एक पुरात वाहून तर एक वीज पडून मृत झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या १६ व्यक्ती वीज पडून तर एक नाल्याच्या पुरात वाहून गेला आहेत. अकोला जिल्ह्यात एक अंगावर भिंत पडून, तर एक जण पुरात वाहून गेला आहे. वाशिम जिल्ह्यातील एक व्यक्ती पुरात वाहून गेली. तर बुलडाणा जिल्ह्यातील ११ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला आहे. या तीन महिन्याच्या आपत्तीमध्ये वाशिम जिल्ह्यात १.६० हेक्टर तर यवतमाळ जिल्ह्यात २,७४३.४८ हेक्टर मधील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे २० तालुक्यातील ८३४ कुटूंबे बाधित झाली आहेत. यामध्ये अमरावती १७०, अकोला नऊ व यवतमाळ जिल्ह्यात ६५५ कुटूंबाचा समावेश आहे.

मृतांच्या वारसाला मदतयंदाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या ३५ पैकी २७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली आहेत. तर सात प्रलंबित आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात तीन प्रकरणात १२ लाख, अकोला जिल्ह्यात दोन प्रकरणात आठ लाख, यवतमाळ जिल्ह्यात १५ प्रकरणात ६० लाख, बुलडाणा जिल्ह्यात आठ प्रकरणात ३२ लाख रूपयांची शासकीय मदत देण्यात आलेली आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये १५३ जनावरे मृतया कालावधित विभागात १५३ लहाल-मोठी जनावरे मृत झाली आहेत. यामध्ये ४५ मोठ्या दुधाळ जनावरांसाठी मालकास ८.९६ लाख, ६९ लहान दुधाळ जनावरांसाठी २.१२ लाख, ओढकाम करणाºया ३३ जनावरांसाठी ६.५० लाख तर ओढकाम करणाºया लहान जनावरांसाठी ७६ हजारांची मदत करण्यात आलेली आहे. या कालावधितील जिवित व वित्तहानीमध्ये सर्वाधिक नुकसान यवतमाळ जिल्ह्यात झाले आहे.