शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

पीककर्ज पुनर्गठनाला ३१ जुलै ‘डेडलाईन’

By admin | Updated: May 22, 2016 00:01 IST

शेतकऱ्यांना खरीप २०१६ हंगामासाठी पिक कर्ज मिळावे यासाठी शासनाने पिक कर्जाचे पुनर्गठन ३१ जुलै पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ....

मुख्यमंत्र्यांचे आदेश : शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग झाला सुकर गजानन मोहोड अमरावतीशेतकऱ्यांना खरीप २०१६ हंगामासाठी पिक कर्ज मिळावे यासाठी शासनाने पिक कर्जाचे पुनर्गठन ३१ जुलै पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व जिल्हा बॅँका व व्यावसायिक बॅँकांना दिले आहे. यापूर्वी शासनाने ३१ एप्रिलपर्यंत पुनर्गठन करण्याचे आदेश दिले होते. मात्र बुधवारी सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बॅँकांच्या कार्यकारी संचालकांच्या बैठकी हा निर्णय घेतला. सततच्या दुष्काळामुळे थकीत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा कसा करणार, असा प्रश्न करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर नागपूर खंडपीठाने शेतकऱ्यांना या हंगामासाठी कर्जपुरवठा करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार आहात, अशी विचारणा शासनाला केली होती. ‘सच रिपोर्ट’साठी मनमानी वसुली अमरावती : सर्च रिपोर्टसाठी ठरावीक शुल्क घेण्यात यावे, असे कुठलेही मापदंड बॅँकांनी ठरविलेले नाहीत. त्यामुळे विधिज्ञाद्वारा यासाठी मनमानी पद्धतीने आकारणी होत आहे. बॅँकाद्वारा शेतकऱ्यांना ठरावीक विधिज्ञाकडे पाठविण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो मागेल तेवढी शुल्क देऊन सर्च रिपोर्ट आणावा लागतो. विशिष्ट विधिज्ञांकडून सर्च रिपोर्ट आणावा, अशी सक्ती काही बॅँकाद्वारा केली जाते. जिल्हा उपनिबंधक, जिल्हा प्रशासन व अग्रणी बॅँकेच्या व्यवस्थापकाद्वारा सर्च रिपोर्ट आवश्यक नसल्याचे सांगण्यात आले. मात्र बॅँकाद्वारा सक्ती करण्यात येत असल्याने सर्च रिपोर्टच्या ५ हजारांसाठी उसनवार करून शेतकऱ्यांना तो आणावा लागत आहे. ७४८ कोटीच्या पीककर्जाचे पुनर्गठन जिल्ह्यात दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीकर्ज वसुलीस स्थगिती व सहकार्य कर्जाचा पुनर्गठन करण्याचा निर्णय २६ एप्रिल रोजी शासनाने घेतला व निर्णयाला ३ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ६९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यांच्या ७४८ कोटी रुपये पिककर्जाचे व्याजासह मध्यम मुदतीकर्जात ५ वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात येणार आहे. बँकांद्वारा शेतकऱ्यांची अडवणूक यंदाच्या खरिपाचा हंगाम तोंडावर आहे. मंगळवारपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे. यंदा शेतकरी आर्थिक संकटात असल्याने पीककर्जाशिवाय त्याची पेरणीची सोय नाही. अशातच १ लाखावर कर्जासाठी बॅँकांद्वारा सर्च रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे मागील व चालू कर्ज मिळून १ लाखाच्यावर असल्याने शेतकऱ्यांनी बॅँकांमध्ये अडवणूक होत असल्याचे चित्र आहे.काय आहे ‘सर्च’ रिपोर्ट ? सर्व बॅँकांद्वारे त्यांच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी विधिज्ञांची नेमणूक करतात. व या बॅँकाद्वारे त्यांनी कामासाठी नेमलेल्या वकिलाकडूनच सर्च रिपोर्ट आणावा, असे बॅँकांद्वारा सांगण्यात येते. वास्तविकत: सर्च रिपोर्ट म्हणजे ज्या मिळकतीवर कर्ज घ्यायचे, ती मिळकत आणखी कुठे गहाण ठेवली आहे काय, याचा शोध घेऊन त्याचा अहवाल सादर करणे होय.