शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

कृषी केंद्रांमधून ३०० कोटींंची उलाढाल

By admin | Updated: June 21, 2015 00:27 IST

दरवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात शहरातील कृषी केंद्रे हाऊसफुल्ल असतात. मात्र, इतर वेळी कृषी केंद्रांत नगण्य गिऱ्हाईकी असते.

शहरात ६० केंद्र : चेन्नई, इंदूर, हैदराबादहून येतात रासायनिक खते मनीष कहाते अमरावतीदरवर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात शहरातील कृषी केंद्रे हाऊसफुल्ल असतात. मात्र, इतर वेळी कृषी केंद्रांत नगण्य गिऱ्हाईकी असते. शहरातील ६० कृषी केंद्रांमध्ये वर्षाकाठी ३०० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती आहे.शेतकऱ्यांची गरज म्हणजे कृषिकेंद्र आणि शेतकऱ्यांचा आत्मा म्हणजे विश्वास. कृषी केंद्रधारकांवर शेतकऱ्यांचा विश्वास बसला की दुकानदार म्हणेल ती बियाणी शेतकरी पेरतो. पेरणीनंतर निसर्गाने साथ दिली तर शेतकरी तरतो, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. देशात बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या विविध कंपन्या आहेत. कोणती कंपनी चांगली, कोणती वाईट याची शेतकऱ्यांना माहिती नसते. शहरात अधिकाधिक बियाणे आंध्र प्रदेश राज्यातून विक्रीकरिता येतात. या कंपन्यांचे काही प्रमुख वितरक व विक्रेते बाजारपेठेमध्ये आहेत. संपूर्ण जिल्ह्यात १५०० कृषी केंद्र परवानाधारक आहेत. सर्वच कृषी केंद्र धारकांना शहरातील काही अधिकृत डिलर्सकडून कृषी साहित्याची विक्री होते तर काही कृषी केंद्र संचालक थेट ओरिसा, गोवा, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, मुंबई, इंदौर या ठिकाणांहून येथे कृषी साहित्य विक्रीसाठी आणतात. त्यामुळे किंमतींमध्ये तफावत भासते. काही कंपन्या दुकानदारांना वेगवेगळ्या स्किम देऊन आपलाच माल बाजारात अधिकाधिक प्रमाणात कसा विक्री होईल, यासाठी प्रलोभन देतात. कृषी केंद्र चालक आणि शेतकऱ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले की, उधारीवर लाखो रुपयांचे बि-बियाणे, खते आणि कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उधारीच्या पैशांवर दुकानदार अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असल्याचे चित्र आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. एखाद्या वर्षी निसर्गाच्या अवकृपेने नापिकी झालीच तर शेतकरी दुकानदारांच्या पैशांची परतफेड करु शकत नसल्याचे आजवरचे चित्र आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. अशा स्थितीत शेतकरी उधारीची रक्कम परत करू शकत नाहीत. परिणामी त्याचा फटका कृषिकेंद्र चालकांना सहन करावा लागतो. कृषी केंद्रांचा परवाना मिळविण्याकरिता अनेक चकरा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागात माराव्या लागतात. जिल्ह्यातील संपूर्ण कृषिकेंद्र संचालक जिल्हा परिषदेच्या अख्त्यारित येतात. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृषी केंद्रांची बहुतांश कागदपत्रे आॅनलाईन झाली आहेत. दररोज जिल्हा परिषदेंतर्गत कृषी विभागाकडून कोणती ना कोणती माहिती मागितली जाते. तसेच तपासणीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीला कृषी केंद्र चालकाला समोर जावे लागते. या ससेमिऱ्याला कृषी केंद्रधारक कंटाळले आहेत. यंदा दुष्काळी स्थिती असल्याने कीटकनाशकाच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. एरवी पावसाळ्यात व्यवसाय तेजीत असतो. इतर वेळी माल बुकिंगचे काम सुरु असते. - नीलेश गांधी,सचिव, जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघ, अमरावती.बी-बियाण्यांच्या कंपन्या भरपूर आहेत. त्यामुळे दुकानदारांवर विश्वास ठेवूनच बियाणे खरेदी करावे लागतात.- आशिष गावंडे, शेतकरी, अमरावती.कृषी साहित्याचे भाव खूप वाढले आहे. त्यामुळे घरगुती बियाणेदेखील काही प्रमाणात पेरावे लागतात. काही बियाणी दुकानांमधून विकत घ्यावी लागतात. - बाबासाहेब गौरखेडेशेतकरी, अमरावती.