शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

300 चिमुकलेही डेंग्यूच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:36 IST

शहरातील हजारावर स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली असतानाच ३०० पेक्षा अधिक लहानग्यांनाही या जीवघेण्या आजाराने विळखा घातला असल्याचे धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे.

गणेश देशमुख

अमरावती : शहरातील हजारावर स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली असतानाच ३०० पेक्षा अधिक लहानग्यांनाही या जीवघेण्या आजाराने विळखा घातला असल्याचे धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे.महापालिका आणि शासनाचा आरोग्य विभाग डेंग्यूबाधितांचा आकड्याबाबत लपवाछपवी करीत असला तरी बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने जिल्हाभरात किमान २०० ते ३०० बालकांना डेंग्यू झाला असल्याचे निरीक्षण ‘लोकमत’शी बोलताना नोंदविले आहे.बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेशी जिल्हाभरातील ९५ बालरोगतज्ज्ञ जुळले आहेत. त्यातील ६५ शहरांत आहेत. उर्वरित ग्रामीण भागात आहेत. संघटनेशी जुळलेल्या या संदस्यांशिवाय आणखी काही बालरोगतज्ज्ञ असतीलच, तर ते वेगळे. काही बालरोगतज्ज्ञांची प्रॅक्टिस ओथंबून वाहते, तर काहींची उत्तम चालते. एका बालरोगतज्ज्ञांकडे सरासरी १० डेंग्यूबाधित बालरुग्ण आले असण्याची शक्यता वर्तविली जाते. तथापि, ही आकडेवारी केवळ प्रतिबालरोगतज्ज्ञ दोन ते तीन इतकीच अधोरेखित केली तरी बालरुग्णांची ही सरासरी संख्या १९० ते २८५ इतकी होते. या सूत्रानुसार, जिल्हाभरात आतापर्यंत डेंग्यूच्या सरासरी ३०० बालरुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे गणित बालरोगतज्ज्ञांच्या जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सोनाली शिरभाते यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना मांडले.खरा आकडा किती?डेंग्यूबाबत महापालिकेची कार्यप्रणाली खासगी डॉक्टरांमध्ये भीती निर्माण करणारी आहे. डेंग्यू असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल्याचे जाहीर झाले रे झाले की, लगेच महापालिका त्यांना अधिकारांचा खाक्या दाखविते. 'कुठल्या वैद्यकीय शास्त्रानुसार तुम्ही रुग्णाला डेंग्यू असल्याचे जाहीर केले?' अशा शब्दांत महापालिकेतून डॉक्टरांना नोटीस बजावण्यात येतात. ‘दुधाने पोळलेले ताकही फुंकून पितात’ याच उक्तीप्रमाणे डॉक्टर डेंग्यूबाबतचा आकडा जाहीर करताना विशेष सावधगिरी बाळगतात. दवाखाने, रुग्णालये महापालिका हद्दीतच चालवायची असल्यामुळे ती फुल्ल असली तरी 'पानी में रह के मगरमच्छ से बैर' कोण घेणार, हा विचार डॉक्टरांवर मानसिक दडपण आणतो. खरा अधिकृत आकडा त्यामुळे बाहेर येत नाही. किमान आरोग्याबाबतची माहिती गढूळ होऊ नये, स्वच्छ सत्य बाहेर यावे, यासाठी आता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे ‘तिसरे नेत्र’ डेंग्यू प्रकरणावर केंद्रित झाल्यास त्यातून प्रशासनाची लोकभिमुखता, लोकपयोगिता झळकू शकेल.