शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

300 चिमुकलेही डेंग्यूच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:36 IST

शहरातील हजारावर स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली असतानाच ३०० पेक्षा अधिक लहानग्यांनाही या जीवघेण्या आजाराने विळखा घातला असल्याचे धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे.

गणेश देशमुख

अमरावती : शहरातील हजारावर स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली असतानाच ३०० पेक्षा अधिक लहानग्यांनाही या जीवघेण्या आजाराने विळखा घातला असल्याचे धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे.महापालिका आणि शासनाचा आरोग्य विभाग डेंग्यूबाधितांचा आकड्याबाबत लपवाछपवी करीत असला तरी बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने जिल्हाभरात किमान २०० ते ३०० बालकांना डेंग्यू झाला असल्याचे निरीक्षण ‘लोकमत’शी बोलताना नोंदविले आहे.बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेशी जिल्हाभरातील ९५ बालरोगतज्ज्ञ जुळले आहेत. त्यातील ६५ शहरांत आहेत. उर्वरित ग्रामीण भागात आहेत. संघटनेशी जुळलेल्या या संदस्यांशिवाय आणखी काही बालरोगतज्ज्ञ असतीलच, तर ते वेगळे. काही बालरोगतज्ज्ञांची प्रॅक्टिस ओथंबून वाहते, तर काहींची उत्तम चालते. एका बालरोगतज्ज्ञांकडे सरासरी १० डेंग्यूबाधित बालरुग्ण आले असण्याची शक्यता वर्तविली जाते. तथापि, ही आकडेवारी केवळ प्रतिबालरोगतज्ज्ञ दोन ते तीन इतकीच अधोरेखित केली तरी बालरुग्णांची ही सरासरी संख्या १९० ते २८५ इतकी होते. या सूत्रानुसार, जिल्हाभरात आतापर्यंत डेंग्यूच्या सरासरी ३०० बालरुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे गणित बालरोगतज्ज्ञांच्या जिल्हा संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सोनाली शिरभाते यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना मांडले.खरा आकडा किती?डेंग्यूबाबत महापालिकेची कार्यप्रणाली खासगी डॉक्टरांमध्ये भीती निर्माण करणारी आहे. डेंग्यू असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितल्याचे जाहीर झाले रे झाले की, लगेच महापालिका त्यांना अधिकारांचा खाक्या दाखविते. 'कुठल्या वैद्यकीय शास्त्रानुसार तुम्ही रुग्णाला डेंग्यू असल्याचे जाहीर केले?' अशा शब्दांत महापालिकेतून डॉक्टरांना नोटीस बजावण्यात येतात. ‘दुधाने पोळलेले ताकही फुंकून पितात’ याच उक्तीप्रमाणे डॉक्टर डेंग्यूबाबतचा आकडा जाहीर करताना विशेष सावधगिरी बाळगतात. दवाखाने, रुग्णालये महापालिका हद्दीतच चालवायची असल्यामुळे ती फुल्ल असली तरी 'पानी में रह के मगरमच्छ से बैर' कोण घेणार, हा विचार डॉक्टरांवर मानसिक दडपण आणतो. खरा अधिकृत आकडा त्यामुळे बाहेर येत नाही. किमान आरोग्याबाबतची माहिती गढूळ होऊ नये, स्वच्छ सत्य बाहेर यावे, यासाठी आता जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे ‘तिसरे नेत्र’ डेंग्यू प्रकरणावर केंद्रित झाल्यास त्यातून प्रशासनाची लोकभिमुखता, लोकपयोगिता झळकू शकेल.