शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 30 हजार कोटींचे रस्ते पहिल्यांदाच- चंद्रकांतदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 20:40 IST

अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

अमरावती : सरकारने तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासात्मक हाती घेतले असून राज्य शासनाने रस्ते विकासासाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. यापूर्वी तीन हजार कोटींच्यावर रस्त्यांवर बजेट नव्हते, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.येथील मुख्य अभियंता कार्यालयाच्या सभागृहात रविवारी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची त्यांनी बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. यावेळी रस्त्यांचा १० हजार किमींचा होत असलेल्या रस्त्याचा आढावा व हायब्रीड तत्त्वावरील रस्त्यांचाही त्यांनी माहिती घेतली. 'राज्यातील २७ जिल्ह्यांमध्ये मी आढावा घेत आहे. जेई टु ईई यांच्या समस्या व त्यांना काम करताना येत असलेली अडचण मी जाणून घेत आहे', असे ना.पाटील म्हणाले. रस्त्यांची ईफिसिएन्सी व लॉयल्टी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा करण्यात येत आहे.महाराष्ट्रात यापूर्वी ५ हजार किमीचे नॅशनल हायवे होते. गेल्या तीन वर्षांत दिल्लीत चकरा मारून व रस्त्यांच्या कामांचा पाठपुरवा करून ते २२ हजार किमीचे नॅशनल हायवे मंजूर करवून घेतले. २२ हजार किमीच्या नॅशनल हायवेला १ लाख ६ हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २० हजार कोटी आतापर्यंत प्राप्त झाले असून ते पैसे रस्त्यांच्या भूसंपादनासाठी उपयोगात येणार आहेत. तीन वर्षांत सदर रस्ते पूर्ण करण्यात येणार आहे.इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने रस्त्यांच्या कामांसाठी ३० हजार कोटी रूपये मंजूर केले आहे. रस्त्यांच्या कामाचे यापूर्वीचे बजेट कधीही तीन हजार कोटींच्यावर नव्हते. १० हजार किमीचे थ्री लाईन व नॅशनल हायवेची फोरलाई होती. महाराष्ट्रातील साडेसहा हजार किमीचे रस्ते नव्याने करण्यासाठी केंद्र शासनाने घेतले ते त्यांचे सहा पदरीकरण करणार आहेत. हे रस्ते जर रस्ते झाले, तर १५ ते २० वर्षांपर्यंत या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची लांब ही आता ९६ हजार किमी झाली आहे. तोपर्यंत या रस्त्यांना मेंटनन्स करणे आवश्यक आहे. आढावा बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंग, आ. अनिल बोंडे, मुख्य अभियंता चंदशेखर तुंगे, अधीक्षक अभियंता विवेक साळवे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.पॉझिटिव्ह काम करण्याचे अधिका-यांना आवाहनसर्व अधिका-यांनी पॉझिटिव्ह काम करा, खड्यांचे कामेही पॉझिटिव्ह होतील, असा कानमंत्रही ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. आपण जर चांगले काम केले तर त्यांचे समाधान व आनंद वेगळा मिळतो. अमरावतीच्या बाजारात आनंद विकत मिळतो काय, असा प्रश्न ना. पाटील यांनी करताच बैठकीत हशा पिकला. ना. पाटील यांनी खेळीमळीच्या वातावरणात अधिकाºयांशी संवाद साधत त्यांची अडचणी व समस्या जाणून घेतली. प्रास्ताविक मुख्य अभियंता चंद्रशेखर तुंगे यांच्या हस्ते करण्यात आले.मोबाईल फिल्ड लॅबचे उद्घाटनयावेळी ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोबाईल फिल्ड लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ही मोबाईल फिल्ड लॅब कुठल्याही कामांवर जाऊन कामांचे गुणनियंत्रण करणार आहे. यावेळी फित कापून त्यांनी उदघाटन केले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलAmravatiअमरावती