शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जिल्ह्यात ३ लाख १० हजारांवर घरात नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST

केंद्र शासन पुरस्कृत राज्यात जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०१४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणीव्दारे ...

केंद्र शासन पुरस्कृत राज्यात जीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०१४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणीव्दारे दररोज प्रती लीटर किमान ५५ लीटर गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्याचे ध्येय आहे. हे स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुदत दिल्यानंतर योजना १८ ते ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये कामे पूर्ण करावयाची आहे. जिल्ह्याचा आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्याचा आराखडा जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून तयार केला आहे. ज्या कुटुंबांना घरात नळाद्वारे पाणी मिळत आहे. त्यांची नोंदणी ऑनलाइन केली जात आहे. जिल्ह्यातील ४ लाख ५६ हजार ६२१ कुटुंब आहेत. त्यातील ३ लाख १० हजार ६५३ कुटुंबांना घरांमध्ये पाणी मिळत आहे. ६८.०३ टक्के घरांमध्ये पाणी पोहोचले असून उर्वरित घरांसाठी नवीन योजना राबविण्याची गरज भासणार आहे. त्याचा आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यात १ लाख ४५ हजार ९६८ घरामध्ये पाणी पोहोचले नाही त्यांना २०२४ पर्यंत पाणी देण्यात येणार आहे.

बॉक्स

ऑनलाइन नोंदणी

अमरावती जिल्ह्याचा आराखडा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ज्या कुटुंबांना घरात नळाव्दारे पाणी मिळत आहे. त्यांची नोंदणी ऑनलाइन केली जात आहे.

बॉक्स

तालुकानिहाय नळजोडणी असलेले कुटुंब

चांदूर रेल्वे १५३५०,मोशी ३०९१७,अंजनगाव सुजी २०११७,भातकुली १९९३२,तिवसा १७७६९, वरूड ३२३८७,चांदूर बाजार ३४८४८,दर्यापूर २८४७९,धानगांवर रेल्वे १८९०९,अमरावती २४३२७,नांदगाव खंडेश्वर १८२३८,चिखलदार ८६३०,अचलपूर २६४०२,आणि धारणी १४३४९ या प्रमाणे नळजोडणी झालेली आहे. तर अद्याप १४ तालुक्यात १ लाख ४५ हजार ९६८ घरांना नळ जोडणी बाकी आहे.