शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

२९७ पं.स. निवडणुकीसाठी आयोगाची पूर्वतयारी

By admin | Updated: December 4, 2015 00:29 IST

राज्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

लगबग : २०१५ मधील निवडणुकांचे ‘इंडेक्स कार्ड’ तयार करणारगजानन मोहोड अमरावतीराज्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निर्भय, मुक्त वातावरणात व पारदर्शक वातावरणात या निवडणुका व्हाव्यात, यासाठी आयोगाने २६ नोव्हेंबरला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सन २०१५ मध्ये झालेल्या सर्व निवडणुकांचे ‘इंडेक्स कार्ड’ तयार करून ३१ जानेवारी २०१६ पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना ते आयोगाकडे पाठवावे लागणार आहे. आगामी निवडणुकीसाठी तसेच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असेल सन २०१५ मध्ये झालेल्या सर्व निवडणुकांच्या सांख्यिकी माहितीचे सर्वसमावेशक ‘डॉक्युमेंट’ तयार करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आयोगाने दिले आहेत. यामध्ये मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या, संवेदनशील मतदान केंद्र, मतदान कर्मचारी, पोलीस दल, करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई, आचारसंहितेचे उल्लंघन तसेच निवडणूक निकालांचे सर्व प्रकारचे विश्लेषण, निवडणुकीत राबविलेले नवीन प्रयोग, नवीन कल्पना, विशेष परिस्थिती हाताळणे आणि महत्त्वपूर्ण फोटो आयोगाने मागविले आहेत. राज्यात मार्च २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या २९७ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी आयोगाची पूर्वतयारी सुरू आहे. यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यामधील चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव, भातकुली व धारणी या पंचायत समितींचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, खामगाव, मेहकर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व लोणार येथे तर यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, नेर, यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, नागपूर जिल्ह्यात नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, पारशिवणी, रामटेक, मौदा, कामठी, नागपूर, ग्रामीण, हिंगणा उमरेड, कुही, भिवापूर, वर्धा जिल्ह्यात आष्टी, कारंजा, आर्वी, शेलू, वर्धा, समुद्रपूर, देवळी, हिंगणघाट, चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, मूल, सावली, पोभुर्णा, गोंडपिंपरी, बल्लारपूर, कोपणी, जेवती, राजुरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या पंचायत समितींचा समावेश आहे. नोडल अधिकाऱ्यांची होणार नियुक्तीजिल्हाधिकाऱ्यांद्वारा त्यांच्या कार्यालयामध्ये निवडणुकीचा व संगणकाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याला आयोग व ‘महाआॅनलाईन’शी सतत संपर्क ठेवावा लागेल. ‘महाआॅनलाईन’ने तयार केलेल्या सर्व सॉफ्टवेअरमध्ये योग्य ती दुरुस्ती करून फिल्ड ट्रायल एप्रिल-मे २०१६ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. जुलै ते सप्टेंबर २०१६ मध्ये मतदार नोंदणी मोहीमआयोगाच्या सूचनेप्रमाणे ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला होता. तशीच मोहीम जुलै ते सप्टेंबर २०१६ मध्ये घेण्यात येणार आहे. यापुढे मतदार यादी योग्य नाही, अशी तक्रार येता कामा नये, अशी तंबी आयोगाने दिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भरमतदानाची टक्केवारी नागरी क्षेत्रात कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापूर्वी झालेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी मतदान ६० टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवीन कल्पक योजना कराव्यात, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.