शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

२९७ पं.स. निवडणुकीसाठी आयोगाची पूर्वतयारी

By admin | Updated: December 4, 2015 00:29 IST

राज्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

लगबग : २०१५ मधील निवडणुकांचे ‘इंडेक्स कार्ड’ तयार करणारगजानन मोहोड अमरावतीराज्यात सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निर्भय, मुक्त वातावरणात व पारदर्शक वातावरणात या निवडणुका व्हाव्यात, यासाठी आयोगाने २६ नोव्हेंबरला मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सन २०१५ मध्ये झालेल्या सर्व निवडणुकांचे ‘इंडेक्स कार्ड’ तयार करून ३१ जानेवारी २०१६ पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना ते आयोगाकडे पाठवावे लागणार आहे. आगामी निवडणुकीसाठी तसेच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असेल सन २०१५ मध्ये झालेल्या सर्व निवडणुकांच्या सांख्यिकी माहितीचे सर्वसमावेशक ‘डॉक्युमेंट’ तयार करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आयोगाने दिले आहेत. यामध्ये मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची संख्या, संवेदनशील मतदान केंद्र, मतदान कर्मचारी, पोलीस दल, करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई, आचारसंहितेचे उल्लंघन तसेच निवडणूक निकालांचे सर्व प्रकारचे विश्लेषण, निवडणुकीत राबविलेले नवीन प्रयोग, नवीन कल्पना, विशेष परिस्थिती हाताळणे आणि महत्त्वपूर्ण फोटो आयोगाने मागविले आहेत. राज्यात मार्च २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या २९७ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी आयोगाची पूर्वतयारी सुरू आहे. यामध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यामधील चिखलदरा, चांदूरबाजार, मोर्शी, वरुड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव, भातकुली व धारणी या पंचायत समितींचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर, मोताळा, खामगाव, मेहकर, चिखली, बुलडाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व लोणार येथे तर यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड, महागाव, पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, नेर, यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी, झरी जामणी, केळापूर, घाटंजी, नागपूर जिल्ह्यात नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, पारशिवणी, रामटेक, मौदा, कामठी, नागपूर, ग्रामीण, हिंगणा उमरेड, कुही, भिवापूर, वर्धा जिल्ह्यात आष्टी, कारंजा, आर्वी, शेलू, वर्धा, समुद्रपूर, देवळी, हिंगणघाट, चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, मूल, सावली, पोभुर्णा, गोंडपिंपरी, बल्लारपूर, कोपणी, जेवती, राजुरा आणि गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या पंचायत समितींचा समावेश आहे. नोडल अधिकाऱ्यांची होणार नियुक्तीजिल्हाधिकाऱ्यांद्वारा त्यांच्या कार्यालयामध्ये निवडणुकीचा व संगणकाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याला आयोग व ‘महाआॅनलाईन’शी सतत संपर्क ठेवावा लागेल. ‘महाआॅनलाईन’ने तयार केलेल्या सर्व सॉफ्टवेअरमध्ये योग्य ती दुरुस्ती करून फिल्ड ट्रायल एप्रिल-मे २०१६ पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. जुलै ते सप्टेंबर २०१६ मध्ये मतदार नोंदणी मोहीमआयोगाच्या सूचनेप्रमाणे ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम राबविण्यात आला होता. तशीच मोहीम जुलै ते सप्टेंबर २०१६ मध्ये घेण्यात येणार आहे. यापुढे मतदार यादी योग्य नाही, अशी तक्रार येता कामा नये, अशी तंबी आयोगाने दिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भरमतदानाची टक्केवारी नागरी क्षेत्रात कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यापूर्वी झालेल्या तीन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी मतदान ६० टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवीन कल्पक योजना कराव्यात, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.