शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढला धोका दुसऱ्या लाटेत तब्बल २९२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:01 IST

जिल्ह्यातील मेळघाटातील रुग्णांची अधिक गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची मर्यादा, खासगी रुग्णालयांची कमतरता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना कापावे लागणारे मोठे अंतर यामुळे कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरू झाली. या लाटेत जिल्ह्याच्या  ग्रामीण भागात मार्च ते २ मेपर्यंत २९२  जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.

ठळक मुद्देअधिक सतर्कतेची गरज; जिल्ह्यातील शहरी भागापेक्षा मृत्युदर अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे आकडे चिंताजनक आहेत. मार्च २०२१ नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल २९२  कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने पन्नास किलोमीटरहून अधिक दूर जाऊन रुग्णांना व नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे.जिल्ह्यातील मेळघाटातील रुग्णांची अधिक गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची मर्यादा, खासगी रुग्णालयांची कमतरता तसेच तालुक्याच्या ठिकाणी जाताना कापावे लागणारे मोठे अंतर यामुळे कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत. कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात सुरू झाली. या लाटेत जिल्ह्याच्या  ग्रामीण भागात मार्च ते २ मेपर्यंत २९२  जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य  यंत्रणा मर्यादित आहे.

जिल्ह्यात कोविड हॉस्पिटल आणि उपलब्ध बेडजिल्ह्यात दोन शासकीय रुग्णालयासह खासगी मिळून २७ कोविड हॉस्पिटल आहेत. यामध्ये इन्टेन्सिव्ह केअर युनिटची सुविधा असलेले ५०५ बेड आहेत. ६६६ ऑक्सिजन बेड, ५५३ जनरल बेड, १२५ व्हेंटिलेटर बेड आहेत. १४ तालुक्यांत १५  कोविड केअर सेंटर  कार्यरत आहेत. 

पन्नास किलोमीटरपेक्षा अधिक धावाधावधारणी तालुक्यातील चिखली, चाकर्दा, सावलीखेडा, हिरापूर, चिंचोना, काटकुंभ, चुरणी अशा गावांतील  ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना धारणी, अचलपूर किंवा अमरावतीला यावे लागते. हे अंतर ५० किलोमीटरपेक्षा अधिक आहे. तिथेही बेड मिळाला नाही, तर अन्य तालुक्यांना किंवा अमरावतीला १०० किलोमीटर अंतर कापावे लागते. अन्य काही तालुक्यांतील गावांनाही एवढेच अंतर कापून  जावे लागते. 

लक्षणे आढळल्यास लगेच कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. गंभीर बाधितांच्या अभ्यासाअंती बहुतांश जणांनी उशीर केल्यामुळे त्यांची तीव्रता वाढल्याचे दिसून येते. योग्यवेळी चाचणी व उपचार महत्त्वाचे आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोेग्य अधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू