शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

२९ लाख हेक्टर वनजमीन गायब; बनावट अहवाल कुणाला फावला? विकासकामांच्या नावे कोट्यवधींचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:50 IST

Amravati : वनांच्या हद्दीतून जाणारे सर्व रस्ते 'राइट ऑफ वे' म्हणून दिले आहेत, हे वनकायद्यानुसार सिद्ध होते. या रस्त्यांच्या दुतर्फा राखीव, संरक्षित, झुडपी किंवा खासगी वनजमिनी असल्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे आवश्यक असते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या वनविभागातील तब्बल ६१ लाख हेक्टर वनजमिनींपैकी सुमारे २९ लाख हेक्टर वनजमिनींचा हिशेब जुळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामध्ये रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या १४ लाख हेक्टर राखीव, संरक्षित, झुडपी आणि अवर्गीकृत वनक्षेत्रासह वनहक्क कायद्यांतर्गत वाटप झालेल्या १५ लाख हेक्टर वनजमिनी गायब झाल्याचे समोर आले आहे. तरीदेखील वनविभागाने या जमिनी अद्याप ताब्यात असल्याचे दाखवून बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार राष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 

वनांच्या हद्दीतून जाणारे सर्व रस्ते 'राइट ऑफ वे' म्हणून दिले आहेत, हे वनकायद्यानुसार सिद्ध होते. या रस्त्यांच्या दुतर्फा राखीव, संरक्षित, झुडपी किंवा खासगी वनजमिनी असल्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेणे आवश्यक असते. मात्र, गेल्या ३० वर्षापासून ३६ जिल्हाधिकारी ते तलाठी या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या तरतुदीनुसार परवानगी देत घटनाबाह्य निर्णय घेतले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, भारतीय घटनेच्या कलम २५१, २५३ ते २६२, ३४८, ३५६ व ३६५ नुसार राज्य सरकार केंद्रीय कायद्यातील तरतुदी अधिक्रमित करू शकत नाही, तरीदेखील विकासकामांच्या नावाखाली वनजमिनींचे अनधिकृत वापर करून नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.

रस्त्यांच्या दुतर्फा असलेले क्षेत्र भारतीय वन कायदा कलम ८० (अ) नुसार सन १९५५ आणि १९६१ मध्ये विधिमंडळाच्या मंजुरीने संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, रस्ते रुंदीकरणासाठी गेलेल्या १४ लाख हेक्टर वनजमिनींचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी सादरच करण्यात आले नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे.

गेल्या ४५ वर्षात रस्ते दुतर्फा क्षेत्र रुंदीकरणासाठी सक्षम प्राधिकरणाची मंजुरी न घेता वनेतर कामांसाठी वापर करण्यात आला, तसेच या वनजमिनींवर उभ्या असलेल्या झाडोऱ्यावर दरोडा घालून बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तरीदेखील दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे नोंदविण्यात आलेले नाहीत.

"वनविभागाच्या ताब्यात ६१ लक्ष हेक्टर वनक्षेत्र आहे, अशा नोंदी भारतीय राज्य वन अहवाल २००१ ते २०२३ मध्ये नमूद आहेत; परंतु या वनजमिनी वनहक्क कायद्यांतर्गत १५ लाख हेक्टर आणि १४ लाख हेक्टर रस्ते रुंदीकरणासाठी वापरली असून, वनगुन्हेगारांनी हद्दीचे बुरुज हलविले आहे. यात एकूण २९ लाख हेक्टर हे वनजमिनी गायब असून, तशी तक्रार नोंदविली आहे."- हेमंत छाजेड, सेवानिवृत्त वरिष्ठ वनाधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : 2.9 Million Hectares of Forest Land Missing; Corruption Allegations Surface

Web Summary : A staggering 2.9 million hectares of forest land are unaccounted for in Maharashtra. Allegations of fabricated documents and misuse for development projects involving crores of rupees have surfaced, prompting complaints to top authorities.
टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभाग