शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२५/१५ लेखाशीर्षाची विकासकामे रद्द

By admin | Updated: November 13, 2014 22:54 IST

राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला २५/१५ या लेखाशीर्षाखाली लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या

अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला २५/१५ या लेखाशीर्षाखाली लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या या हक्कावर आघाडी सरकारमधील आमदारांनी गदा आणली. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला होता. परंतु आता आघाडी सरकारच्या कार्यकाळातील उपरोक्त लेखाशीर्षाची कामे नव्या भाजपा सरकारने रद्द केल्याने काँग्रेस- राकाँच्या लोकप्रतिनिधींना चपराक बसली असून या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सन २०१४/१५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांसाठी जिल्ह्यातील आमदारांना तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने प्रत्येकी १० लाखांहून अधिक रक्कम मंजूर केली होती. यापूर्वी २५/१५ या लेखाशीर्षाचा निधी राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदांना दिला जात होता. परंतु आमदारांनी दबावगट तयार करुन शासनाकडून जिल्हा परिषदेच्या हक्काचा हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळता केला. त्यानंतर ही कामे जिल्हा परिषदे व्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या लेखाशीर्षांतर्गत जिल्ह्यातील आमदारांसाठी मंजूर लाखो रुपयांच्या निधीपैकी पहिला हप्ताही सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. या निधीत लोकप्रतिनिधींनी सूचविल्यापैकी काही कामे मंजूर होऊन ती सुरूही झाली.मात्र, काही कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. जिल्हा परिषदेच्या वाट्याला त्यापैकी ३० लक्ष रुपयांची कामे आली होती. त्यापैकी १८ लक्ष रुपयांचा निधी चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे आणि मोर्शी या मतदारसंघात वितरित करण्यात आला. परंतु आघाडी सरकारचा कार्यकाळ संपून राज्यात भाजपचे सरकारयेताच या शासनाने आघाडी सरकारच्या कार्यकाळात २५/१५ अंतर्गत मंजूर सर्वच कामांना स्थगिती देण्याचे आदेश ५ नोव्हेंबर रोजी जारी केले आहेत. त्यामुळे या कामांवर गदा आली आहे. या संदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे सहसचिव न.म. शिंदे यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषदांना कामांच्या स्थगितीबाबतचे आदेश धडकले आहेत. (प्रतिनिधी)