शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

४६ दिवसांत तापाचे २,५११ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:04 IST

जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाले. ही शासकीय आकडेवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यावरील उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असला, तरी ही स्थिती अत्यंत भयावह दिसत आहे.जिल्ह्यात डेंग्यूचा कहर आहे. स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा किती गांभीर्याने उपाययोजना करीत आहेत, ही बाब या धक्कादायक आकडेवारीवरूनच स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील आरोग्यविषयक स्थिती अशीच राहिली, तर नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्हासह अन्य जवळील तालुक्यांतील आरोग्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण तापाचेच असल्याचे दिसून येत आहे. १ आॅगस्ट ते १६ सप्टेंबरदरम्यान इर्विन रुग्णालयात ४० हजार ५६७ रुग्णांच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामध्ये विविध रुग्णांचा समावेश आहे. आजारी, अपघातातील जखमी, सर्पदंश, विष प्राशन, श्वानदंश अशा आदी प्रकारच्या रुग्णांचा समावेश आहे. या कालावधीत २ हजार ५११ रुग्ण तापाचे आहेत, त्यापैकी ६७६ रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीअंती पॉझिटिव्ह आलेत. यावरून ६७६ रुग्ण टायफाईडचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांवर औषधोपचार करण्यात आल्यावर काही बरे होऊन घरी गेलेत, तर काहींवर अद्यापही उपचार सुरूच आहे.मलेरियाचा रुग्ण आढळलाइर्विन रुग्णालयात दाखल झालेल्या १ हजार ९१५ रुग्णांच्या रक्तजल नमुने तपासणी करण्यात आली असता, त्यात एक रुग्ण मलेरियाचीही आढळून आला आहे. शहरात डांसांचा उच्छाद मांडला असता डेंग्युसह मलेरियाचेही डांस असल्याचे निदर्शनास आले आहे.पोटाच्या विकाराचे ७७७ रुग्णजिल्ह्यातील दूषित पाण्यामुळे प्रभावीत नागरिकांच्या संख्या वाढत आहे. ४६ दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयात पोटाच्या विकाराचे तब्बल ७७७ रुग्ण दाखल झाले. दूषित पाण्यामुळे पोटाच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.जिल्ह्यात सध्या व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्या अनुषंगाने इर्विन रुग्णालयात योग्यरीत्या औषधोपचार सुरू आहे. बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक