शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

४६ दिवसांत तापाचे २,५११ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:04 IST

जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाले. ही शासकीय आकडेवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यावरील उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असला, तरी ही स्थिती अत्यंत भयावह दिसत आहे.जिल्ह्यात डेंग्यूचा कहर आहे. स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा किती गांभीर्याने उपाययोजना करीत आहेत, ही बाब या धक्कादायक आकडेवारीवरूनच स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील आरोग्यविषयक स्थिती अशीच राहिली, तर नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्हासह अन्य जवळील तालुक्यांतील आरोग्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण तापाचेच असल्याचे दिसून येत आहे. १ आॅगस्ट ते १६ सप्टेंबरदरम्यान इर्विन रुग्णालयात ४० हजार ५६७ रुग्णांच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामध्ये विविध रुग्णांचा समावेश आहे. आजारी, अपघातातील जखमी, सर्पदंश, विष प्राशन, श्वानदंश अशा आदी प्रकारच्या रुग्णांचा समावेश आहे. या कालावधीत २ हजार ५११ रुग्ण तापाचे आहेत, त्यापैकी ६७६ रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीअंती पॉझिटिव्ह आलेत. यावरून ६७६ रुग्ण टायफाईडचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांवर औषधोपचार करण्यात आल्यावर काही बरे होऊन घरी गेलेत, तर काहींवर अद्यापही उपचार सुरूच आहे.मलेरियाचा रुग्ण आढळलाइर्विन रुग्णालयात दाखल झालेल्या १ हजार ९१५ रुग्णांच्या रक्तजल नमुने तपासणी करण्यात आली असता, त्यात एक रुग्ण मलेरियाचीही आढळून आला आहे. शहरात डांसांचा उच्छाद मांडला असता डेंग्युसह मलेरियाचेही डांस असल्याचे निदर्शनास आले आहे.पोटाच्या विकाराचे ७७७ रुग्णजिल्ह्यातील दूषित पाण्यामुळे प्रभावीत नागरिकांच्या संख्या वाढत आहे. ४६ दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयात पोटाच्या विकाराचे तब्बल ७७७ रुग्ण दाखल झाले. दूषित पाण्यामुळे पोटाच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.जिल्ह्यात सध्या व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्या अनुषंगाने इर्विन रुग्णालयात योग्यरीत्या औषधोपचार सुरू आहे. बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक