शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

४६ दिवसांत तापाचे २,५११ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 22:04 IST

जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याला व्हायरल फिवरने कवेत घेतल्याची स्थिती ४६ दिवसांत २ हजार ५११ तापांच्या दाखल रुग्णांवरून निदर्शनास येत आहे. या रुग्णांपैकी ६७६ रुग्णांचे रक्तनमुने पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर टायफाईड निदान करण्यात आले. याशिवाय पोटाच्या आजाराचे तब्बल ७७७ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाले. ही शासकीय आकडेवारी जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. यावरील उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नरत असला, तरी ही स्थिती अत्यंत भयावह दिसत आहे.जिल्ह्यात डेंग्यूचा कहर आहे. स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले आहे. मात्र, आरोग्य यंत्रणा किती गांभीर्याने उपाययोजना करीत आहेत, ही बाब या धक्कादायक आकडेवारीवरूनच स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील आरोग्यविषयक स्थिती अशीच राहिली, तर नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्हासह अन्य जवळील तालुक्यांतील आरोग्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण तापाचेच असल्याचे दिसून येत आहे. १ आॅगस्ट ते १६ सप्टेंबरदरम्यान इर्विन रुग्णालयात ४० हजार ५६७ रुग्णांच्या नोंदी झाल्या आहेत. त्यामध्ये विविध रुग्णांचा समावेश आहे. आजारी, अपघातातील जखमी, सर्पदंश, विष प्राशन, श्वानदंश अशा आदी प्रकारच्या रुग्णांचा समावेश आहे. या कालावधीत २ हजार ५११ रुग्ण तापाचे आहेत, त्यापैकी ६७६ रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीअंती पॉझिटिव्ह आलेत. यावरून ६७६ रुग्ण टायफाईडचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व रुग्णांवर औषधोपचार करण्यात आल्यावर काही बरे होऊन घरी गेलेत, तर काहींवर अद्यापही उपचार सुरूच आहे.मलेरियाचा रुग्ण आढळलाइर्विन रुग्णालयात दाखल झालेल्या १ हजार ९१५ रुग्णांच्या रक्तजल नमुने तपासणी करण्यात आली असता, त्यात एक रुग्ण मलेरियाचीही आढळून आला आहे. शहरात डांसांचा उच्छाद मांडला असता डेंग्युसह मलेरियाचेही डांस असल्याचे निदर्शनास आले आहे.पोटाच्या विकाराचे ७७७ रुग्णजिल्ह्यातील दूषित पाण्यामुळे प्रभावीत नागरिकांच्या संख्या वाढत आहे. ४६ दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयात पोटाच्या विकाराचे तब्बल ७७७ रुग्ण दाखल झाले. दूषित पाण्यामुळे पोटाच्या आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.जिल्ह्यात सध्या व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्या अनुषंगाने इर्विन रुग्णालयात योग्यरीत्या औषधोपचार सुरू आहे. बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक