शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कॅलिफोर्नियातील २५ टक्के संत्राबागा ‘व्हेंटिलेटर’वर

By admin | Updated: June 30, 2017 00:09 IST

जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आता अस्मानी संकट : मृग बहार हातचा गेला, संत्रा उत्पादक हैराण लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यातील २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवरील संत्रा बागांपैकी २५ टक्के बागा सुकण्याच्या मार्गावर असून येथील संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत. तालुक्यातील ९ सिंचन प्रकल्पांना बुड लागले आहे. अद्याप मृगबहार सुद्धा फुटलेला नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आलेल्या संत्राफळांना गळती लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संत्रा उत्पादकांना शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्याती प्रमुख प्र्रकल्पांपैकी एक शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलितक्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४६१.७७ मीटर असून ओलितक्षमता ३७० हेक्टर आहे. सातनूर प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५००.७५ मीटर तर ओलीतक्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलितक्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलित क्षमता ६३६ हेक्टरची आहे. वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा होता. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिल्याने तापमानात सुद्धा वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन मे महिन्यात हे सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामुळे तालुक्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. तालुक्यात १४ पाणीवापर संस्था असून रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणीवापर संस्थांना पाणी द्यावे लागते. आतार नद्यांनासुद्धा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. यावर्षी केवळ पाईपलाईनव्दारे सिंचन करणाऱ्या कपिलेश्वर पाणीवापर संस्था वगळता इतर संस्थांना पाणीवाटप बंद करण्यात आले. यातच तापमानसुद्धा वाढल्याने संत्राबागा सुकल्या आहेत. मृग बहारानेसुद्धा पाठ दाखविल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तालुक्यातील २५ टक्के संत्राबागा सुकल्या. जामगाव, पिपलागढ, कारली, महेंद्री, धनोडी, पुसला, लिंगा, शेंदूरजनाघाट, टेंभुरखेडा, बारगाव, बेनोडा मांगरुळी, लोणी, राजुराबाजार, हातुर्णा, आमनेरसह आदी परिसराचा समावेश आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा बागा सुकल्याचे तसेच आणि मृग बहार फुटला नाही. यातच जानेवारी फेब्रुवारीमध्ये अतितापमानात आंबिया संत्राबहारसुध्द्धा ५० ते ६० टक्के गळाला. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.