शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कॅलिफोर्नियातील २५ टक्के संत्राबागा ‘व्हेंटिलेटर’वर

By admin | Updated: June 30, 2017 00:09 IST

जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आता अस्मानी संकट : मृग बहार हातचा गेला, संत्रा उत्पादक हैराण लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : जून महिना उलटून गेला तरी पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तालुक्यातील २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवरील संत्रा बागांपैकी २५ टक्के बागा सुकण्याच्या मार्गावर असून येथील संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत. तालुक्यातील ९ सिंचन प्रकल्पांना बुड लागले आहे. अद्याप मृगबहार सुद्धा फुटलेला नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आलेल्या संत्राफळांना गळती लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संत्रा उत्पादकांना शासनाने त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे. तालुक्याती प्रमुख प्र्रकल्पांपैकी एक शेकदरी प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५१४.६५ मीटर असून ओलीत क्षमता १ हजार ३४० हेक्टर, पुसली प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १००.६० मीटर असून ओलितक्षमता ३०९ हेक्टर, वाई प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४६१.७७ मीटर असून ओलितक्षमता ३७० हेक्टर आहे. सातनूर प्रकल्पाची पूर्ण जलसंचयक्षमता ५००.७५ मीटर तर ओलीतक्षमता २९९ हेक्टर, पंढरी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता ४४८.३० मीटर तर ओलीत क्षमता १५३ हेक्टर, जामगाव प्रकल्पाची पूर्ण जलसंचय क्षमता ४८०.५० मीटर असून ओलितक्षमता १२१ हेक्टर, नागठाणा प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचयक्षमता ४८१.६० मीटर असून ओलीत क्षमता २१२ हेक्टर, जमालपूर प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मिटर असून ओलीत क्षमता १२२ हेक्टर, बेलसावंगी प्रकल्पामध्ये पूर्ण जलसंचय क्षमता १०४.१० मीटर असून ओलीत क्षमता १२१ हेक्टर, लोणी धवलगिरी प्रकल्पाची ओलित क्षमता ६३६ हेक्टरची आहे. वघाळ बंधारा असून ओलीत क्षमता ४९६ हेक्टर आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये या प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा होता. मात्र, त्यानंतर पावसाने दडी दिल्याने तापमानात सुद्धा वाढ झाल्याने जलसाठा कमी होऊन मे महिन्यात हे सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामुळे तालुक्यात सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. तालुक्यात १४ पाणीवापर संस्था असून रबी हंगामाकरिता सिंचन प्रकल्पातून पाणीवापर संस्थांना पाणी द्यावे लागते. आतार नद्यांनासुद्धा पाणी सोडण्याची वेळ आली आहे. यावर्षी केवळ पाईपलाईनव्दारे सिंचन करणाऱ्या कपिलेश्वर पाणीवापर संस्था वगळता इतर संस्थांना पाणीवाटप बंद करण्यात आले. यातच तापमानसुद्धा वाढल्याने संत्राबागा सुकल्या आहेत. मृग बहारानेसुद्धा पाठ दाखविल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे तालुक्यातील २५ टक्के संत्राबागा सुकल्या. जामगाव, पिपलागढ, कारली, महेंद्री, धनोडी, पुसला, लिंगा, शेंदूरजनाघाट, टेंभुरखेडा, बारगाव, बेनोडा मांगरुळी, लोणी, राजुराबाजार, हातुर्णा, आमनेरसह आदी परिसराचा समावेश आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा बागा सुकल्याचे तसेच आणि मृग बहार फुटला नाही. यातच जानेवारी फेब्रुवारीमध्ये अतितापमानात आंबिया संत्राबहारसुध्द्धा ५० ते ६० टक्के गळाला. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.