शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

रोहयोच्या अपूर्ण विहिरींसाठी २५ टक्के अग्रीम रक्कम

By admin | Updated: May 3, 2015 00:15 IST

मग्रारोहयोअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या मात्र असून त्या अपूर्ण आहेत,

दिलासा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ मे पर्यंत कामे करावीतअमरावती : मग्रारोहयोअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या मात्र असून त्या अपूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांना विहिरीचे खोदकाम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकाच्या २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून देण्यात येणार आहे. सदर शेतकऱ्यांनी ३० मे पर्यंत कामे पूर्ण करावी. यासाठी लाभार्थींना रक्कम वाटपासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. मग्रारोहयोअंतर्गत जिल्हाभरात सध्या अपूर्ण व नवीन परंतु यापूर्वी रद्द झालेल्या विहिरींना शासनाने मंजुरी दिल्याने रोहयोअंतर्गत ही कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ३ हजार विहिरी पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. अशात जिल्ह्याभरात मग्रारोहयोच्या अपूर्ण विहिरींची संख्याही बरीच आहे. त्यामुळे ही कामे शेतकऱ्यांनी गतीने करावीत. यामध्ये २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे. ३० एप्रिल रोजी ग्राम रोजगार दिवसाचे आयोजन करुन नवीन कामाची मागणी नोंदवून मजुरांना कामे लगेच उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. अशा परिस्थितीत मजुरांच्या कामाची वाढती मागणी लक्षात घेता अंदाजपत्रक तयार केले जात आहे. यासाठी वर्ष २०१५-१६ साठी जिल्ह्याचा लेबर बजेटचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला. जिल्ह्यातून मजुरांचे स्थलांतर होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींच्या ५ किलोमीटर परिसरात मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्यावे,असे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहेत.