शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

रोहयोच्या अपूर्ण विहिरींसाठी २५ टक्के अग्रीम रक्कम

By admin | Updated: May 3, 2015 00:15 IST

मग्रारोहयोअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या मात्र असून त्या अपूर्ण आहेत,

दिलासा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ मे पर्यंत कामे करावीतअमरावती : मग्रारोहयोअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या मात्र असून त्या अपूर्ण आहेत, अशा शेतकऱ्यांना विहिरीचे खोदकाम पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकाच्या २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून देण्यात येणार आहे. सदर शेतकऱ्यांनी ३० मे पर्यंत कामे पूर्ण करावी. यासाठी लाभार्थींना रक्कम वाटपासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागविले जाणार आहेत. मग्रारोहयोअंतर्गत जिल्हाभरात सध्या अपूर्ण व नवीन परंतु यापूर्वी रद्द झालेल्या विहिरींना शासनाने मंजुरी दिल्याने रोहयोअंतर्गत ही कामे जूनअखेर पूर्ण करण्याच्या सूचना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ३ हजार विहिरी पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. अशात जिल्ह्याभरात मग्रारोहयोच्या अपूर्ण विहिरींची संख्याही बरीच आहे. त्यामुळे ही कामे शेतकऱ्यांनी गतीने करावीत. यामध्ये २५ टक्के रक्कम अग्रीम म्हणून दिली जाणार आहे. ३० एप्रिल रोजी ग्राम रोजगार दिवसाचे आयोजन करुन नवीन कामाची मागणी नोंदवून मजुरांना कामे लगेच उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. अशा परिस्थितीत मजुरांच्या कामाची वाढती मागणी लक्षात घेता अंदाजपत्रक तयार केले जात आहे. यासाठी वर्ष २०१५-१६ साठी जिल्ह्याचा लेबर बजेटचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला. जिल्ह्यातून मजुरांचे स्थलांतर होऊ नये म्हणून ग्रामपंचायतींच्या ५ किलोमीटर परिसरात मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्यावे,असे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहेत.