शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

२५ लाख झाडे देणार तुम्हाला प्राणवायू!, वनविभागाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:56 IST

Amravati : जिल्ह्यात 'अमृत वृक्ष आपल्या दारी, एक पेड माँ के नाम' योजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनविभागाने नाव संकल्प हाती घेत 'अमृत वृक्ष आपल्या दारी' ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत योजनेत वनमहोत्सव घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 'एक पेड माँ के नाम' योजनेचीही अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. प्रादेशिक, सामाजिक वनीकरण या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून २५ लाखांपेक्षा जास्त वृक्षलागवड केली जाणार आहे.

शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांना वृक्षारोपण उपक्रमासाठी वनमहोत्सवातून मोफत रोपे देण्यात येणार आहेत. या रोपांची लागवड करून भविष्यात आपापल्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याबरोबर निसर्ग संपन्न वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी वनविभागाने तयारी सुरू केली आहे. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, रिकाम्या जागेत वृक्षारोपण करावे, यासाठी शाळा, महाविद्यालयांनी मागणी केली आहे.

कोणत्या विभागाला किती उद्दिष्ट?

  • कृषी विभाग : २५०००
  • रेशीम विकास विभाग : १३०००
  • सार्वजनिक बांधकाम विभाग : ३५०००
  • सहकार व पणन : १०५००
  • शालेय शिक्षण : ५००००
  • सामाजिक न्याय : १५०००

झाडांना वाढविण्याची जबाबदारी कोणाची?

  • वनविभागाकडून लागवड केल्यानंतर त्याची निगा राखणे, संगोपनाची जबाबदारी प्रादेशिक, सामाजिक वनीकरणच्या आरएफओंची असणार आहे 
  • शासकीय आस्थापनांनी लागवड केल्यानंतर त्या विभागाचे प्रमुख आणि शाळा, महाविद्यालयात जबाबदारी स्वीकारलेल्या शिक्षक, प्राचार्य व प्राध्यापकांची राहणार आहे.

यंदा २५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टवनविभागाच्या चांदूर रेल्वे, वडाळी, मोर्शी, परतवाडा, वरूड वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाने २५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. परतवाडा वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात मेळघाटच्या पायथ्याजवळ वनक्षेत्र येते. आरएफओंना त्यांच्या कार्यक्षेत्रात वृक्षलागवडीचे टार्गेट दिले आहे.

गतवर्षी लावली १० लाखगतवर्षी १० लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र, अपुऱ्या पावसाने काही रोपे मृतावस्थेतद्य गेल्याने याचा फटका वृक्षलागवडीला बसला. त्यामुळे ३० टक्केच वृक्षलागवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वनमहोत्सवासह केंदम व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी नेमक्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सातत्याने समन्वय सुरु ठेवला जाणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने बांबू लावगड केली जाणार आहे. 'मनरेगा'अंतर्गत येणारे घटक व संबंधित ग्रामपंचायतीच्या मदतीने लागवड जपली जाणारा आहे.- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती