शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

२५ लाख झाडे देणार तुम्हाला प्राणवायू!, वनविभागाचे नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:56 IST

Amravati : जिल्ह्यात 'अमृत वृक्ष आपल्या दारी, एक पेड माँ के नाम' योजना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनविभागाने नाव संकल्प हाती घेत 'अमृत वृक्ष आपल्या दारी' ही योजना राबवायला सुरुवात केली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत योजनेत वनमहोत्सव घेण्यात येणार आहे. केंद्र शासनाने 'एक पेड माँ के नाम' योजनेचीही अमरावती जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. प्रादेशिक, सामाजिक वनीकरण या दोन्ही यंत्रणांच्या माध्यमातून २५ लाखांपेक्षा जास्त वृक्षलागवड केली जाणार आहे.

शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांना वृक्षारोपण उपक्रमासाठी वनमहोत्सवातून मोफत रोपे देण्यात येणार आहेत. या रोपांची लागवड करून भविष्यात आपापल्या परिसरात हिरवळ निर्माण करण्याबरोबर निसर्ग संपन्न वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी वनविभागाने तयारी सुरू केली आहे. वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत, रिकाम्या जागेत वृक्षारोपण करावे, यासाठी शाळा, महाविद्यालयांनी मागणी केली आहे.

कोणत्या विभागाला किती उद्दिष्ट?

  • कृषी विभाग : २५०००
  • रेशीम विकास विभाग : १३०००
  • सार्वजनिक बांधकाम विभाग : ३५०००
  • सहकार व पणन : १०५००
  • शालेय शिक्षण : ५००००
  • सामाजिक न्याय : १५०००

झाडांना वाढविण्याची जबाबदारी कोणाची?

  • वनविभागाकडून लागवड केल्यानंतर त्याची निगा राखणे, संगोपनाची जबाबदारी प्रादेशिक, सामाजिक वनीकरणच्या आरएफओंची असणार आहे 
  • शासकीय आस्थापनांनी लागवड केल्यानंतर त्या विभागाचे प्रमुख आणि शाळा, महाविद्यालयात जबाबदारी स्वीकारलेल्या शिक्षक, प्राचार्य व प्राध्यापकांची राहणार आहे.

यंदा २५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्टवनविभागाच्या चांदूर रेल्वे, वडाळी, मोर्शी, परतवाडा, वरूड वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक व सामाजिक वनीकरण विभागाने २५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. परतवाडा वनपरिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात मेळघाटच्या पायथ्याजवळ वनक्षेत्र येते. आरएफओंना त्यांच्या कार्यक्षेत्रात वृक्षलागवडीचे टार्गेट दिले आहे.

गतवर्षी लावली १० लाखगतवर्षी १० लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. मात्र, अपुऱ्या पावसाने काही रोपे मृतावस्थेतद्य गेल्याने याचा फटका वृक्षलागवडीला बसला. त्यामुळे ३० टक्केच वृक्षलागवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वनमहोत्सवासह केंदम व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी नेमक्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सातत्याने समन्वय सुरु ठेवला जाणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने बांबू लावगड केली जाणार आहे. 'मनरेगा'अंतर्गत येणारे घटक व संबंधित ग्रामपंचायतीच्या मदतीने लागवड जपली जाणारा आहे.- सौरभ कटियार, जिल्हाधिकारी 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती