शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

२५ ग्रामपंचायतींमध्ये झाले ग्रामसेवकाविना ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:16 IST

तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आहे.

ठळक मुद्दे‘एक ग्रामपंचायत - एक सचिव’ कागदावर : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरच्या मेळघाटचे चित्र

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आहे.चिखलदरा तालुक्यात दीडशेवर गावांसाठी ५४ ग्रामपंचायती आहेत. त्यांचा कारभार केवळ २९ ग्रामसेवक सांभाळतात. त्यामुळे स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, महाराष्ट्र दिन सोहळ्याला ध्वजारोहणासाठी सचिव मिळत नसल्याची बोंब कायम आहे. चिखलदरा तालुका विस्ताराने सर्वाधिक मोठा असल्याने ८०ते १०० किलोमीटर अंतरावरील तीन ते चार ग्रामपंचायतीचा कारभार एका सचिवाकडे आहे. प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान चार ते पाच गावे आहेत. बुधवारी झालेल्या १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनी तब्बल २५ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची दरवर्षीप्रमाणे मदत घेण्यात आली. तालुक्यासाठी ग्रामसेवकांची ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी तीन ग्रामसेवक निलंबित, तर तीन बेपत्ता आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई सुरू आहे. प्रत्यक्षात आदिवासींच्या पाड्यांचा विकास कुठे थांबला, याची चिकित्सा स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी गाठण्यापूर्वी होणे गरजेचे ठरले आहे.शासकीय योजनांसाठी ससेहोलपटवीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ता या मूलभूत सुविधांचा अभाव मेळघाटच्या नशिबी आजही आहे. कुपोषणाने बालमृत्यूच्या आकडेरीत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य व बाल विकास प्रकल्प कार्यालयाची यंत्रणा त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च गेला तरी कुठे, असे म्हणायची वेळ आली आहे. अतिदुर्गम हतरू परिसरातील २० गावांमध्ये आजही रस्ता, वीज, पाणी या सुविधा बेपत्ता आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात सर्वाधिक टँकर जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात लागतात.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसgram panchayatग्राम पंचायत