शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

२५ ग्रामपंचायतींमध्ये झाले ग्रामसेवकाविना ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:16 IST

तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आहे.

ठळक मुद्दे‘एक ग्रामपंचायत - एक सचिव’ कागदावर : स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरच्या मेळघाटचे चित्र

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील तब्बल २५ ग्रामपंचायतींमध्ये सचिवांअभावी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या मदतीने सरपंचांनी १५ आॅगस्ट रोजी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्याला ७२ वर्षे उलटून गेल्यानंतरही मेळघाटातील ग्रामपंचायतींना पूर्णवेळ सचिव नसल्याचे संतापजनक चित्र आहे.चिखलदरा तालुक्यात दीडशेवर गावांसाठी ५४ ग्रामपंचायती आहेत. त्यांचा कारभार केवळ २९ ग्रामसेवक सांभाळतात. त्यामुळे स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन, महाराष्ट्र दिन सोहळ्याला ध्वजारोहणासाठी सचिव मिळत नसल्याची बोंब कायम आहे. चिखलदरा तालुका विस्ताराने सर्वाधिक मोठा असल्याने ८०ते १०० किलोमीटर अंतरावरील तीन ते चार ग्रामपंचायतीचा कारभार एका सचिवाकडे आहे. प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत किमान चार ते पाच गावे आहेत. बुधवारी झालेल्या १५ आॅगस्ट या स्वातंत्र्य दिनी तब्बल २५ ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची दरवर्षीप्रमाणे मदत घेण्यात आली. तालुक्यासाठी ग्रामसेवकांची ३७ पदे मंजूर आहेत. यापैकी तीन ग्रामसेवक निलंबित, तर तीन बेपत्ता आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई सुरू आहे. प्रत्यक्षात आदिवासींच्या पाड्यांचा विकास कुठे थांबला, याची चिकित्सा स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी गाठण्यापूर्वी होणे गरजेचे ठरले आहे.शासकीय योजनांसाठी ससेहोलपटवीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ता या मूलभूत सुविधांचा अभाव मेळघाटच्या नशिबी आजही आहे. कुपोषणाने बालमृत्यूच्या आकडेरीत पुन्हा वाढ झाल्याने आरोग्य व बाल विकास प्रकल्प कार्यालयाची यंत्रणा त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च गेला तरी कुठे, असे म्हणायची वेळ आली आहे. अतिदुर्गम हतरू परिसरातील २० गावांमध्ये आजही रस्ता, वीज, पाणी या सुविधा बेपत्ता आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात सर्वाधिक टँकर जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यात लागतात.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसgram panchayatग्राम पंचायत